शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
4
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
5
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
6
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
7
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
8
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
9
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
10
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
11
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
12
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
13
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
14
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
15
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
16
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
17
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
18
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
19
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
20
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!

Bhagat Singh Koshyari vs NCP: भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्र सोडण्याअगोदर... ; राष्ट्रवादीकडून करण्यात आली 'ही' मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 16:32 IST

कोश्यारी यांचा राज्यपाल पदाचा राजीनामा मंजूर करण्यात आला

Bhagat Singh Koshyari vs NCP: महाराष्ट्राच्या राजकारणात राज्यपाल म्हणून सर्वाधिक चर्चेत आलेले नाव म्हणजे भगतसिहं कोश्यारी. वेगवेगळे राजकीय निर्णय आणि विधानांमुळे सातत्याने ते वादाच्या भोवऱ्यात सापडले. १५-२० दिवसांपूर्वी त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरून आपणास पदमुक्त करावे अशी विनंती केली होती. त्यानंतर, नुकताच भगतसिंह कोश्यारी यांचा राज्यपालपदाचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला. त्याजागी रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. कोश्यारी हे पदावरून पायउतार झाल्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आले असून त्यांच्याकडून एक मागणी करण्यात आली आहे.

राज्यपालपदी असताना भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईतील परप्रांतीयांबद्दल केलेले विधान वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. त्यानंतर एका कार्यक्रमात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानावरून वादंग निर्माण झाला होता. तसेच, आणखीही काही वेगळ्या धाटणीचे निर्णय घेतल्यामुळे त्यांच्यावर महाविकास आघाडीची नेतेमंडळी काही अंशी नाराज दिसले होते. याच्याच संदर्भात राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ता क्लाईड क्रास्टो यांनी कोश्यारींकडे एक मागणी केली आहे. "नेहमीच महाराष्ट्राची बदनामी आणि महापुरुषांचा अपमान केला... कुठलंही चांगलं काम केलं नाही.. मात्र जाता जाता एकतरी चांगलं काम करुन महाराष्ट्राचा त्यांनी निरोप घ्यावा... भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्र सोडण्याअगोदर जनतेची माफी मागावी..." अशी मागणी करणारे ट्विट राष्ट्रवादीकचे क्लाईड क्रास्टो यांनी केले आहे.

कोश्यारींनंतर महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण?

भगतसिंह कोश्यारी यांनी राजीनामा दिल्यानंतर आता राष्ट्रपतींकडून त्याजागी रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रमेश बैस हे मूळचे छत्तीसगढच्या राजपूरचे आहेत. त्यांचा जन्म २ ऑगस्ट १९४७ सालचा असून ते ७५ वर्षांचे आहेत. याआधी त्यांनी झारखंडचं राज्यपालपद भूषवलं आहे. तर त्याआधी त्रिपुराच्या राज्यपालपदाचाही कारभार सांभाळला आहे. भाजपचे सदस्य असून १९९९ मध्ये दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते केंद्रीय पर्यावरण आणि वन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) होते.

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtraमहाराष्ट्र