शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Bhagat Singh Koshyari vs NCP: भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्र सोडण्याअगोदर... ; राष्ट्रवादीकडून करण्यात आली 'ही' मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 16:32 IST

कोश्यारी यांचा राज्यपाल पदाचा राजीनामा मंजूर करण्यात आला

Bhagat Singh Koshyari vs NCP: महाराष्ट्राच्या राजकारणात राज्यपाल म्हणून सर्वाधिक चर्चेत आलेले नाव म्हणजे भगतसिहं कोश्यारी. वेगवेगळे राजकीय निर्णय आणि विधानांमुळे सातत्याने ते वादाच्या भोवऱ्यात सापडले. १५-२० दिवसांपूर्वी त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरून आपणास पदमुक्त करावे अशी विनंती केली होती. त्यानंतर, नुकताच भगतसिंह कोश्यारी यांचा राज्यपालपदाचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला. त्याजागी रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. कोश्यारी हे पदावरून पायउतार झाल्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आले असून त्यांच्याकडून एक मागणी करण्यात आली आहे.

राज्यपालपदी असताना भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईतील परप्रांतीयांबद्दल केलेले विधान वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. त्यानंतर एका कार्यक्रमात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानावरून वादंग निर्माण झाला होता. तसेच, आणखीही काही वेगळ्या धाटणीचे निर्णय घेतल्यामुळे त्यांच्यावर महाविकास आघाडीची नेतेमंडळी काही अंशी नाराज दिसले होते. याच्याच संदर्भात राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ता क्लाईड क्रास्टो यांनी कोश्यारींकडे एक मागणी केली आहे. "नेहमीच महाराष्ट्राची बदनामी आणि महापुरुषांचा अपमान केला... कुठलंही चांगलं काम केलं नाही.. मात्र जाता जाता एकतरी चांगलं काम करुन महाराष्ट्राचा त्यांनी निरोप घ्यावा... भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्र सोडण्याअगोदर जनतेची माफी मागावी..." अशी मागणी करणारे ट्विट राष्ट्रवादीकचे क्लाईड क्रास्टो यांनी केले आहे.

कोश्यारींनंतर महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण?

भगतसिंह कोश्यारी यांनी राजीनामा दिल्यानंतर आता राष्ट्रपतींकडून त्याजागी रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रमेश बैस हे मूळचे छत्तीसगढच्या राजपूरचे आहेत. त्यांचा जन्म २ ऑगस्ट १९४७ सालचा असून ते ७५ वर्षांचे आहेत. याआधी त्यांनी झारखंडचं राज्यपालपद भूषवलं आहे. तर त्याआधी त्रिपुराच्या राज्यपालपदाचाही कारभार सांभाळला आहे. भाजपचे सदस्य असून १९९९ मध्ये दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते केंद्रीय पर्यावरण आणि वन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) होते.

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtraमहाराष्ट्र