बेलवाडीत अश्वरिंगणाने फेडले डोळय़ांचे पारणे

By Admin | Updated: June 29, 2014 22:43 IST2014-06-29T22:43:50+5:302014-06-29T22:43:50+5:30

विठ्ठल-ज्ञानोबा-तुकारामाचा जयघोष करीत वैष्णवांच्या जनसागरात, लाल मातीच्या गोल रिंगणधारी पांढ:याशुभ्र कडांवरून मानाचे अश्व धावले.

In the Belgaum, Ashwarinen paid back the eyes | बेलवाडीत अश्वरिंगणाने फेडले डोळय़ांचे पारणे

बेलवाडीत अश्वरिंगणाने फेडले डोळय़ांचे पारणे

>लासुण्रे : विठ्ठल-ज्ञानोबा-तुकारामाचा जयघोष करीत वैष्णवांच्या जनसागरात, लाल मातीच्या गोल रिंगणधारी पांढ:याशुभ्र कडांवरून मानाचे अश्व धावले. उत्साही, आनंदमय वातावरणात रिंगण सोहळा आज बेलवाडी (ता. इंदापूर) मध्ये रंगला. रिंगणाचा हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली होती.
भाग गेला शीण गेला, अवघा झाला आनंद! असाच अनुभव या वेळी उपस्थितीत असणा:या प्रत्येकाने घेतला. दहा दिवसांचा पायी प्रवास, ऊनवा:याची, पावसाची तमा न बाळगता भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन वारकरी  निगरुण  पांडुरगाच्या दर्शनाची आस घेऊन निघालेला आहे.  सर्व वारकरी, टाळकरी, माळकरी, ङोंडेकरी, तुळशीवाल्या महिला, वारकरी, वीणोकरी पालखीभोवती हरिनामाचा गजर करीत रिंगण सोहळा पार पडला. यानंतर पालखी भाविकांच्या दर्शनासाठी गावात हनुमान मंदिरात विसावली.  या वेळी तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज सोहळा प्रमुखांचे पुतणो पुंडलिक महाराज देहूकर, छत्रपतींचे संचालक कांतिलाल जामदार, गव्हर्नमेंट काँट्रॅक्टर अजरुन देसाई, उपसरपंच अनिल खैरे, सदस्य नवनाथ गणगे, मार्केट कमिटीचे संचालक अनिल पवार, इंदापूर अर्बन बँकेचे संचालक वसंत पवार, संजय पवार, शहाजी ¨शदे, विठ्ठल जाचक, केशव नगरे आदी उपस्थित होते. गावक:यांच्या वतीने पालखी सोहळ्यासाठी सर्व भाविकांसाठी पाणी, चहा, नाष्टा व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.  (वार्ताहर)
 
4पांडुरंगा भेटायची आस, आतुरले नयन, विठ्ठल वाणी विठ्ठल, ज्ञानोबा-तुकाराम ज्ञानोबा-तुकाराम असा जयघोष करीत संत तुकाराममहाराज पालखी सोहळा सणसर मुक्काम आटोपून बेलवाडीच्या प्रवेशद्वाराजवळ सकाळी 8 वाजून 1क् मि. दाखल झाला. पालखीचे स्वागत बेलवाडीच्या सरपंच शोभा 
गणगे यांनी केले. 
4पालखी सोहळा रिंगणाच्या ठिकाणी हरिनामाच्या जयघोषात दाखल झाला. या वेळी गावात भक्तिमय वातावरणात रिंगणसोहळा सुरू झाला. सुरुवातीला बेलवाडीचे शहाजी मचाले यांच्या मानाच्या मेंढय़ांचे रिंगण पार पडले. 
4यानंतर सर्व दिडय़ांनी पालखीला प्रदक्षिणा घातली. यानंतर विठू नामाचा गजर करीत ङोंडेकरी खांद्यावर पताका घेऊन धावले. त्यांच्यामागे डोक्यावर हंडा व तुळशी घेऊन महिला 
वारकरी  धावल्या. 
4नंतर विणोकरी धावले. शेवटी लक्ष लक्ष नयनांनी क्षण टिपावा असा क्षण आला. मानाचे अश्व धावण्यास सुरुवात झाली. या परिसरात फक्त विठू नामाचाच गजर कानावरती पडू लागला. एका पाठोपाठ एक असे तीन अश्व धावले. 
 

Web Title: In the Belgaum, Ashwarinen paid back the eyes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.