शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांशी संवादानंतर बच्चू कडूंचे आंदोलन मागे, पालकमंत्र्यांची शिष्टाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2017 20:22 IST

प्रहारचे सर्वेसर्वा आ. बच्चू कडू यांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेले अन्नत्याग आंदोलन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणीनंतर तब्बल चार दिवसांनी सोमवारी मागे घेतले.

अमरावती : प्रहारचे सर्वेसर्वा आ. बच्चू कडू यांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेले अन्नत्याग आंदोलन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणीनंतर तब्बल चार दिवसांनी सोमवारी मागे घेतले. त्याकरिता पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी यशस्वी शिष्टाई केली असून आंदोलनाची दखल घेत शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला, हे विशेष.

स्थानिक गाडगेनगरातील संत गाडगेबाबा समाधी मंदिरासमोरील प्रांगणात दिव्यांग, अनाथ, विधवा, परितक्त्या, शेतकरी, शेतमजूर व बेघरांच्या न्याय्य हक्कासाठी प्रहार संघटनेच्यावतीने १३ आॅक्टोबरपासून अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले. आ.बच्चू कडू हे स्वत: आंदोलनात सहभागी होते. आंदोलनस्थळी मुलांबाळांसह पालाच्या झोपडीत राहुट्या टाकून आंदोलनात नागरिक सहभागी झाले होते. दरम्यान पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या पुढाकाराने रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आ. कडूंच्या मागण्यांसंदर्भात बैठक घेतली. या बैठकीत जिल्हास्तरीय प्रश्न, समस्या मार्गी लावल्याचे आ.कडू यांना प्रशासनाने कळविले. मात्र, राज्यपातळीवर समस्या, प्रश्न मार्गी लागल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका आ.कडू यांनी घेतली. सोमवारपासून मौनव्रत आंदोलनास प्रारंभ होईल, असे पत्रपरिषदेत जाहीर केले. किंबहुना रविवारी रात्री १० वाजतादरम्यान आ. कडू यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने इर्विनच्या अतीदक्षता कक्षात  भरती करण्यात आले. यावेळी त्यांच्या पत्नी नैना कडूसुद्धा होत्या. त्यानंतर पालकमंत्री पोटे यांनी इर्विनचे शल्य चिकित्सक श्यामसुंदर निकम यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून आ.कडू यांच्या प्रकृतीबाबत काळजी घेण्याची सूचना केली.

कालांतराने ना.पोटे हे आ.बच्चू कडू यांची भेट घेण्यास ईर्विनमध्ये पोहचले. दरम्यान ना.पोेटेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला आणि आंदोलनाची माहिती दिली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार आ.बच्चू कडू यांच्या राज्यस्तरीय मागण्यांबाबत २४, २५ आॅक्टोबर अथवा त्यांच्या सोईनुसार मुंबईत बैठक घेऊन प्रश्न, समस्या सोडविल्या जातील, असे  पालकमंत्र्यांच्या स्वाक्षरीचे पत्र आ. कडूंना देण्यात आले. एवढेच नव्हे, तर पालकमंत्र्यांनी भ्रमणध्वनीद्वारे मुख्यमंत्र्यांशी आ.कडू यांचा संवाद करून दिला. आ.कडू हे मुख्यमंत्र्यासोबत बोलले आणि त्यांनी दिलेला शब्द अधोरेखित मानून सोमवारी मध्यरात्री अन्नत्याग आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक-दिव्यांग, विधवा, परितक्त्या तसेच पालघरांमधील नागरिक आदी विविध घटकांसाठीच्या कल्याणकारी योजनांची अपूर्ण कार्यवाही एका महिन्यात पूर्ण करावी, तसेच, दिव्यांगांसाठीचा तीन टक्के निधी खर्च न करणाºया संबंधित अधिकाºयांवर जबाबदारी निश्चित करावी, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोट यांनी रविवारी येथे दिले. दिव्यांग व विविध घटकांच्या प्रश्नांसाठी आ. बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आ.कडू व पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हा प्रशासनाची महत्त्वपूर्ण बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्यावेळी पोटे बोलत होते. जिल्हाधिकारी अभिजित बांगर, महापालिका आयुक्त हेमंतकुमार पवार, ग्रामीण विकास यंत्रणेचे के.एम. अहमद यांच्यासह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आदी उपस्थित होते.

आ.कडूंच्या आंदोलनाबाबत शनिवारी पत्र मिळाले. त्यानुसार विविध यंत्रणांची रविवारी बैठक  घेऊन स्थानिक प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना केल्यात. राज्यस्तरीय प्रश्न, समस्यांबाबत २४ व २५ आॅक्टोबर रोजी मुख्यमंत्री बैठक घेऊन त्या सोडवतील, असा निर्णय झाला.- प्रवीण पोटे, पालकमंत्री

टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडू