शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
3
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
4
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
5
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
6
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
7
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
8
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
9
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
10
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
11
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
12
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
13
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
14
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
15
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
16
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
17
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
18
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
19
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
20
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...

कृषी पंपधारकांची फसवणूक; निवडणुकीपूर्वी वीज बिल शून्य, आता भरा थकबाकी

By भीमगोंड देसाई | Updated: February 12, 2025 12:23 IST

कालावधी न दाखवून बिलामध्ये दिशाभूल

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेनुसार विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची मते मिळवण्यासाठी एप्रिल ते जून २०२४ अखेरपर्यंतची साडेसात अश्व शक्तीपर्यंतच्या सर्व कृषी पंपधारकांना वीज बिले शासनाने शून्य करून दिली, परंतु आता डिसेंबरपासून पूर्ववत पोकळ थकबाकीसह बिले दिली आहेत. अनेकांची वीज बिले ५० हजारांच्यावर असल्याने कृषी पंपधारकांची झोप उडाली आहे.गेल्या अर्थसंकल्पाच्या अधिवेशनात अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साडेसात अश्वशक्तीपर्यंतचे थकीत आणि चालू वीज बिल माफ, अशी घोषणा केली. तोंडावर विधानसभा निवडणूक असल्यामुळे याची अंमलबजावणीही सुरू केली. त्यानंतरचे तीन महिन्यांचे कृषी पंपाचे वीज बिल शून्य म्हणून दिले आहे. कृषी पंपधारक बिलावर थकीत रक्कम नाही, चालू बिलही शून्य आहे, हे पाहून सुखावला आहे.निवडणुकीत मतदान करून पुन्हा महायुतीसरकारला निवडून दिले. महायुतीचेसरकार पुन्हा सत्तेवर आले. त्यावेळी उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री झाले आहेत. उपमुख्यमंत्री अर्थमंत्री त्यावेळचेच आहेत. तरीही, कृषी पंपधारकांना वीज बिल थकबाकीसह दिले आहे. चालू देयक शून्य, असे म्हटले आहे. यामुळे कृषी पंपधारकांची फसवणूक झाल्याची भावना तयार झाली आहे.

बिल आले, फोटो गायबमागील कोणत्याही थकीबाकीचा उल्लेख नाही, अशा शून्य वीज बिल आलेल्या बिलावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यावेळचे माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे ठळक फोटा होते. साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या शेती पंपांना मोफत वीज, १४ हजार ७६१ कोटींची तरतूद, असा आशय होता. आताचे बिल थकीबाकीसह आले आहे. त्या बिलावरून मागील बिलावरील फोटो मात्र गायब आहेत.

चालू बिलातून ग्राहकांची दिशाभूलचालू कृषी बिलात बिल कधीचे आहे, याची तारीख नाही. बिलावर फक्त डिसेंबर २०२४ असा उल्लेख आहे. बिलाच्या दर्शनी पानावर चालू बिल आहे की थकबाकी आहे, याचाही स्पष्ट उल्लेख नाही. १७ फेब्रुवारीअखेर देय बिल भरावे, असे त्यात स्पष्टपणे म्हटले आहे. मागील पानावर चालू वीज देयक शून्य म्हटले आहे. पण, चालू म्हणजे कधीचे, किती महिन्यांचे किती दिवसांचे याचाही उल्लेख नाही.

शासनाने थकबाकीसह बिले पाठवून शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक केली आहे. ते असेच करणार याची खात्री होती. वीज कंपनीला आजारी पडून ती अदानीच्या घशात घालण्याचा डाव आहे. - राजू शेट्टी, शेतकऱ्यांचे नेते

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAgriculture Sectorशेती क्षेत्रGovernmentसरकारelectricityवीजMahayutiमहायुती