शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

कृषी पंपधारकांची फसवणूक; निवडणुकीपूर्वी वीज बिल शून्य, आता भरा थकबाकी

By भीमगोंड देसाई | Updated: February 12, 2025 12:23 IST

कालावधी न दाखवून बिलामध्ये दिशाभूल

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेनुसार विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची मते मिळवण्यासाठी एप्रिल ते जून २०२४ अखेरपर्यंतची साडेसात अश्व शक्तीपर्यंतच्या सर्व कृषी पंपधारकांना वीज बिले शासनाने शून्य करून दिली, परंतु आता डिसेंबरपासून पूर्ववत पोकळ थकबाकीसह बिले दिली आहेत. अनेकांची वीज बिले ५० हजारांच्यावर असल्याने कृषी पंपधारकांची झोप उडाली आहे.गेल्या अर्थसंकल्पाच्या अधिवेशनात अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साडेसात अश्वशक्तीपर्यंतचे थकीत आणि चालू वीज बिल माफ, अशी घोषणा केली. तोंडावर विधानसभा निवडणूक असल्यामुळे याची अंमलबजावणीही सुरू केली. त्यानंतरचे तीन महिन्यांचे कृषी पंपाचे वीज बिल शून्य म्हणून दिले आहे. कृषी पंपधारक बिलावर थकीत रक्कम नाही, चालू बिलही शून्य आहे, हे पाहून सुखावला आहे.निवडणुकीत मतदान करून पुन्हा महायुतीसरकारला निवडून दिले. महायुतीचेसरकार पुन्हा सत्तेवर आले. त्यावेळी उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री झाले आहेत. उपमुख्यमंत्री अर्थमंत्री त्यावेळचेच आहेत. तरीही, कृषी पंपधारकांना वीज बिल थकबाकीसह दिले आहे. चालू देयक शून्य, असे म्हटले आहे. यामुळे कृषी पंपधारकांची फसवणूक झाल्याची भावना तयार झाली आहे.

बिल आले, फोटो गायबमागील कोणत्याही थकीबाकीचा उल्लेख नाही, अशा शून्य वीज बिल आलेल्या बिलावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यावेळचे माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे ठळक फोटा होते. साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या शेती पंपांना मोफत वीज, १४ हजार ७६१ कोटींची तरतूद, असा आशय होता. आताचे बिल थकीबाकीसह आले आहे. त्या बिलावरून मागील बिलावरील फोटो मात्र गायब आहेत.

चालू बिलातून ग्राहकांची दिशाभूलचालू कृषी बिलात बिल कधीचे आहे, याची तारीख नाही. बिलावर फक्त डिसेंबर २०२४ असा उल्लेख आहे. बिलाच्या दर्शनी पानावर चालू बिल आहे की थकबाकी आहे, याचाही स्पष्ट उल्लेख नाही. १७ फेब्रुवारीअखेर देय बिल भरावे, असे त्यात स्पष्टपणे म्हटले आहे. मागील पानावर चालू वीज देयक शून्य म्हटले आहे. पण, चालू म्हणजे कधीचे, किती महिन्यांचे किती दिवसांचे याचाही उल्लेख नाही.

शासनाने थकबाकीसह बिले पाठवून शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक केली आहे. ते असेच करणार याची खात्री होती. वीज कंपनीला आजारी पडून ती अदानीच्या घशात घालण्याचा डाव आहे. - राजू शेट्टी, शेतकऱ्यांचे नेते

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAgriculture Sectorशेती क्षेत्रGovernmentसरकारelectricityवीजMahayutiमहायुती