शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

सावधान! प्लॅस्टिक पिशवी सापडल्यास दुकान कायमचे बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 17:01 IST

प्लॅस्टिक बंदी केल्यानंतरही बऱ्याच दुकानांमध्ये प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर सर्रास होत असल्याने अखेर पर्यावरण खात्याने कडक पाऊल उचलले आहे.

मुंबई : प्लॅस्टिक बंदी केल्यानंतरही बऱ्याच दुकानांमध्ये प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर सर्रास होत असल्याने अखेर पर्यावरण खात्याने कडक पाऊल उचलले आहे. यापुढे दुकानात प्लॅस्टिक पिशवी सापडल्यास ते दुकान कायमचे बंद करण्यात येणार असल्याची माहीती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली आहे.

राज्यात काही महिन्यांपूर्वी प्लॅस्टिक आणि थर्माकोलच्या वापरावर बंदी आणली होती. तसेच जुना स्टॉक संपविण्यासाठी तीन महिन्यांची मुदतही दिली होती. मात्र, दुकानदारांनी मुदत संपूनही प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापर सुरुच ठेवल्याने अखेर पर्यावरण खात्याने कडक पाऊल उचलले आहे. सुरुवातीला प्लॅस्टिक पिशवी सापडल्यास 5 हजारांचा दंड केला जात होता. याविरोधात दुकानदारांना तक्रारीही केल्या होत्या.

आता हा दंड घेण्यात येणार नसून थेट दुकानावरच कारवाई करण्यात येणार आहे. दुकानदारांना पुरेशी संधी दिली होती. आता एकजरी प्लॅस्टिकची पिशवी आढळल्यास थेट दुकानच कायमचे बंद करण्यात येणार असल्याची माहीती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली. यासाठी दुकानदारांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीRamdas Kadamरामदास कदमenvironmentवातावरण