शहरं
Join us  
Trending Stories
1
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
2
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
3
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
4
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
5
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
6
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
7
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
8
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
9
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
10
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
11
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
12
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
13
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
14
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
15
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
16
Chipi Airport: चिपी विमानतळ सेवा पुन्हा सुरू होणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
17
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
18
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
19
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
20
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!

सावधान! प्लॅस्टिक पिशवी सापडल्यास दुकान कायमचे बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 17:01 IST

प्लॅस्टिक बंदी केल्यानंतरही बऱ्याच दुकानांमध्ये प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर सर्रास होत असल्याने अखेर पर्यावरण खात्याने कडक पाऊल उचलले आहे.

मुंबई : प्लॅस्टिक बंदी केल्यानंतरही बऱ्याच दुकानांमध्ये प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर सर्रास होत असल्याने अखेर पर्यावरण खात्याने कडक पाऊल उचलले आहे. यापुढे दुकानात प्लॅस्टिक पिशवी सापडल्यास ते दुकान कायमचे बंद करण्यात येणार असल्याची माहीती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली आहे.

राज्यात काही महिन्यांपूर्वी प्लॅस्टिक आणि थर्माकोलच्या वापरावर बंदी आणली होती. तसेच जुना स्टॉक संपविण्यासाठी तीन महिन्यांची मुदतही दिली होती. मात्र, दुकानदारांनी मुदत संपूनही प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापर सुरुच ठेवल्याने अखेर पर्यावरण खात्याने कडक पाऊल उचलले आहे. सुरुवातीला प्लॅस्टिक पिशवी सापडल्यास 5 हजारांचा दंड केला जात होता. याविरोधात दुकानदारांना तक्रारीही केल्या होत्या.

आता हा दंड घेण्यात येणार नसून थेट दुकानावरच कारवाई करण्यात येणार आहे. दुकानदारांना पुरेशी संधी दिली होती. आता एकजरी प्लॅस्टिकची पिशवी आढळल्यास थेट दुकानच कायमचे बंद करण्यात येणार असल्याची माहीती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली. यासाठी दुकानदारांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीRamdas Kadamरामदास कदमenvironmentवातावरण