शहरं
Join us  
Trending Stories
1
Municipal Corporation Election: विदर्भात महायुतीचे ठरले! चार महापालिकांत शिंदेसेना, तर दोन ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत
2
खोपोलीत शिंदेसेनेच्या नगरसेविकेच्या पतीची हत्या! मुलाला शाळेत सोडून परत येत असताना केला हल्ला
3
तुमची इंडिगो फ्लाइट रद्द झाली होती का? आजपासून १०,००० रुपयांचे व्हाउचर मिळणार
4
Video : पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम उरकला अन् शोभेसाठी लावलेल्या झाडाच्या कुंड्या लोकांनी पळवल्या!
5
२७ महापालिकांत कुणाचे किती नगरसेवक? गेल्यावेळी भाजपचे...; ४३९ जागा जिंकून काँग्रेस होती तिसऱ्या क्रमांकावर
6
Stock Markets Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; Sensex १५० अंकांनी घरसला, BEL टॉप गेनर
7
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
8
विकी-कतरिनाच्या लेकाचा पहिला ख्रिसमस, अभिनेत्रीने शेअर केला फोटो; चाहते म्हणाले...
9
Investment Tips For Working Women: नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
10
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
11
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
12
संपादकीय: पुन्हा चुकू अन् फुटू नका, राज-उद्धव आणि भाजप...
13
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
14
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
15
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
16
पीछेहाट कम्युनिस्ट पक्षाची, विचारसरणीची नव्हे!
17
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
18
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
19
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
20
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
Daily Top 2Weekly Top 5

'चलो बारसू' राजू शेट्टींनी राज्यातील शेतकऱ्यांना दिली हाक; स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2023 16:12 IST

आंदोलनकर्त्यांची २ हात करायची तयारी सरकारने दाखवावी असं आव्हान शेट्टींनी शिंदे-फडणवीस सरकारला दिले आहे. 

कोल्हापूर - रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यात होणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाला बारसूच्या स्थानिकांनी विरोध केला आहे. गेल्या ४ दिवसांपासून याठिकाणी आंदोलन सुरू आहे. केंद्राकडून आलेल्या सर्वेक्षण पथकाला स्थानिकांनी विरोध केला आहे. या आंदोलनकर्त्यांनी बळजबरीने सर्वेक्षणस्थळी घुसण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा वापर केला. बारसूतील तणावग्रस्त परिस्थितीवर आता विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यात प्रामुख्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही सरकारला इशारा दिला आहे. 

माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की, रत्नागिरी बारसूतील शेतकरी एकाकी आहेत. म्हणून पोलीस दडपशाहीचा वापर करून जर हे आंदोलन मोडण्याचा प्रयत्न करत असेल. तर मी महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना हाक देतो. चला बारसूला, तेथील शेतकऱ्यांना वाचवूया. बघू यांच्याकडे गोळ्या किती, लाठ्या किती आहेत. पोलीस किती आहेत. आंदोलनकर्त्यांची २ हात करायची तयारी सरकारने दाखवावी असं आव्हान शेट्टींनी शिंदे-फडणवीस सरकारला दिले आहे. 

तसेच बारसू येथे झालेल्या पोलीस दडपशाहीचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. याठिकाणी आंदोलन करणाऱ्या शेतकरी स्त्री पुरुषावर बेशुद्ध होईपर्यंत प्रचंड लाठीचार्ज झालेला आहे. बारसू कोकणात आहे, महाराष्ट्रात आहे का की आणखी कुठे आहे हे कळत नाही. या लोकशाहीत जर एखाद्याला जमीन द्यायची नसेल अशी भूमिका भूमिपुत्रांनी घेतली आणि त्याला बेशुद्ध होईपर्यंत मारणार असाल तर पोलिसांना आणि त्यांना आदेश देणाऱ्या राज्यकर्त्यांना शरम वाटायला हवी अशा शब्दात राजू शेट्टींनी घणाघात केला. 

बारसू पेटलं...बारसू येथे रिफायनरी प्रकल्पाविरोधात महिला आणि युवक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. पोलिसांचा तगडा बंदोबस्त असताना ज्याठिकाणी सर्वेक्षण सुरू होते तिथे लोकांनी घुसण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्जचा वापर केला. आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले. परंतु पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये झटापट झाल्याचं दिसून आले. लोकांचा जमाव मोठ्या संख्येने असल्याने पोलिसांनी लाठीचार्जचा वापर केला. 

आंदोलन भडकवण्यामागे षडयंत्रकाहीजण लोकांची माथी भडकवण्याचे काम करत आहेत ते थांबवावे. शेतकऱ्यांना पुढे करून ज्यापद्धतीने राजकारण केले जातेय हे महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय घातक राजकारण आहे. खासदारांना काय शंका असतील त्या दूर करू. सर्वेक्षणाठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांना ताब्यात घेतले. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायला तयार आहोत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करू शकतात. पण लोकांची माथी भडकावू नका. राजापूरच्या गेस्टहाऊसला कुणाची बैठक झाली? यामागचे षडयंत्र काय हे समोर आणा. पोलीस आक्रमक झालेत हे दाखवून द्यायचे आहे असा आरोप पालकमंत्री उदय सामंत यांनी केला.  

टॅग्स :Barsu Refinery Projectबारसू रिफायनरी प्रकल्पRaju Shettyराजू शेट्टीFarmers Protestशेतकरी आंदोलन