शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019 : बारामती वाचली, पण शरद पवारांच्या तिसऱ्या पिढीला मतदारांनी नाकारले

By अतुल कुलकर्णी | Updated: May 24, 2019 05:56 IST

लोकसभा निवडणुकीच्या आधीच; सरपंचापासून ते जिल्हा परिषदेपर्यंतचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याजिल्ह्यातले नेटवर्क भाजपने पद्धतशीरपणे मोडून काढले.

- अतुल कुलकर्णीलोकसभा निवडणुकीच्या आधीच; सरपंचापासून ते जिल्हा परिषदेपर्यंतचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याजिल्ह्यातले नेटवर्क भाजपने पद्धतशीरपणे मोडून काढले. त्या जागी भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी कसे निवडून येतील याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले. निवडून येणाऱ्यांना ताकदही दिली. दुसरीकडे राष्ट्रवादीने मात्र त्याच त्या पारंपारिक निवडणूक पध्दतीवर भर देत सगळा प्रचार केला. भाजपने सोशल मिडीयाचा केलेला वापर राष्ट्रवादीला कळालाच नाही. एकीकडे स्वत:ला सेक्यूलर म्हणून घेत असताना दुसरीकडे मुस्लिम आणि दलित मते आपल्याकडे कशी वळतील याकडेच राष्ट्रवादीने सगळे लक्ष केंद्रीत केले त्यामुळे एकदिलाने काम करुनही या पक्षाला पराभव पहाण्याची वेळ आली.भाकरी फिरवली पाहिजे हा विचार मांडणाºया शरद पवार यांनी स्वत: हा विचार कृतीत आणला नाही. मुलगी बारामतीतून, नातू मावळमधून आणि स्वत: माढ्यातून उभे रहणार अशी भूमिका त्यांनी घेतली. आपला पक्ष म्हणजे आपल्या पलिकडे काहीच नाही असा संदेश त्यातून गेला. नंतर त्यांनी आपण निवडणूक लढवणार नाही असे सांगितले पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती.आपण आता सत्तेत नाहीत, विरोधकाची भूमिका आपल्याला बजावली पाहिजे हे या पक्षातल्या अनेक नेत्यांना शेवटपर्यंत कळाले नाही. हल्लाबोल यात्रा काढताना तरुण वर्ग आपल्यासोबत येताना दिसत नाही याचेही आकलन वेळीच या पक्षातल्या धुरिणांना झाले नाही. तरुण वर्ग धनंजय मुंडे सोबत जेवढा जोडला जातो तो अन्य नेत्यांसोबत का जात नाही हे ही पक्षनेतृत्वाला उमजले नाही. त्यातून संधी दिली ती देखील घरातल्याच तरुण नातवाला. नाही म्हणायला अमोल कोल्हे या तरुण अभिनेत्यास संधी दिली पण कोल्हे यांचे यश त्यांचे स्वत:चे अधिक होते. त्यात पक्षाचा वाटा कमी होते. भ्रष्टाचाराचे आरोप असणाºया छगन भूजबळ, अजित पवार यांच्या बोलण्यावर जनतेचा विश्वास बसत नव्हता. ज्यांच्या बोलण्यावर विश्वास वाटत होता, व ज्यांची पाटी कोरी होती त्यांच्या नेतृत्वावर पक्षातल्याच अन्य नेत्यांचा विश्वास नव्हता. यामुळे स्वत:च्याच कोंडीत राष्टÑवादीचे नेते सापडले. जे मतदार आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडेच पुन्हा पुन्हा जात, नवे लोक न जोडताच प्रचार करण्याचे काम केले परिणामी अपयश आले.>पराभवाकडे दुर्लक्ष करुन दुष्काळी भागात मदतीसाठी जाऊ..!आमचा ११ जागांचा अंदाज होता. आमच्या कार्यकर्त्यांनी चांगले काम केले आहे. कष्ट घेतले आहेत. त्यामुळे आम्ही व आमचे कार्यकर्ते पराभवाकडे दुर्लक्ष करून आगामी निवडणुकीच्या कामाला लागत आहोत. ज्या जागा आम्ही गमावल्या त्या कमी फरकाने गमावल्या आहेत. या पराभवाचा विचार नक्की करू. राज्यात दुष्काळ भीषण आहे. संकटग्रस्त लोकांना मदत करणार आहे. दुष्काळासंबंधी जो कार्यक्रम हाती घेतला आहे तो तसाच सुरु ठेवणार. - शरद पवार>तीन ठिकाणी विजयराष्ट्रवादी पक्षाने एकूण १९ जागा लढवल्या. त्यातल्या १० जागा भाजपाच्या तर ९ जागा शिवसेनेच्या विरोधात राष्टÑवादीने लढल्या. त्यातील ३ ठिकाणी त्यांनी भाजपला हरवण्याचे काम केले.पार्थ अजित पवार यांच्या उमेदवारीवरुन घातलेला घोळ, शरद पवार यांनी आधी लढणार, नंतर नाही लढणार अशी संभ्रमावस्था निवडणुका जाहीर झाल्यावर तयार केली त्याचाही फटका राष्टÑवादीला बसला.बारामती, सातारा, कोल्हापूर आणि माढा या चार जागा २०१४ साली राष्टÑवादीने जिंकल्या होत्या. त्यापैकी बारामती व सातारा त्यांना राखता आल्या पण कोल्हापूर व माढा मात्र गमवाव्या लागल्या.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९