शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
5
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
6
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
7
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
8
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
9
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
10
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
11
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
12
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
13
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
14
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
15
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
16
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
17
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
18
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
19
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
20
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019 : बारामती वाचली, पण शरद पवारांच्या तिसऱ्या पिढीला मतदारांनी नाकारले

By अतुल कुलकर्णी | Updated: May 24, 2019 05:56 IST

लोकसभा निवडणुकीच्या आधीच; सरपंचापासून ते जिल्हा परिषदेपर्यंतचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याजिल्ह्यातले नेटवर्क भाजपने पद्धतशीरपणे मोडून काढले.

- अतुल कुलकर्णीलोकसभा निवडणुकीच्या आधीच; सरपंचापासून ते जिल्हा परिषदेपर्यंतचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याजिल्ह्यातले नेटवर्क भाजपने पद्धतशीरपणे मोडून काढले. त्या जागी भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी कसे निवडून येतील याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले. निवडून येणाऱ्यांना ताकदही दिली. दुसरीकडे राष्ट्रवादीने मात्र त्याच त्या पारंपारिक निवडणूक पध्दतीवर भर देत सगळा प्रचार केला. भाजपने सोशल मिडीयाचा केलेला वापर राष्ट्रवादीला कळालाच नाही. एकीकडे स्वत:ला सेक्यूलर म्हणून घेत असताना दुसरीकडे मुस्लिम आणि दलित मते आपल्याकडे कशी वळतील याकडेच राष्ट्रवादीने सगळे लक्ष केंद्रीत केले त्यामुळे एकदिलाने काम करुनही या पक्षाला पराभव पहाण्याची वेळ आली.भाकरी फिरवली पाहिजे हा विचार मांडणाºया शरद पवार यांनी स्वत: हा विचार कृतीत आणला नाही. मुलगी बारामतीतून, नातू मावळमधून आणि स्वत: माढ्यातून उभे रहणार अशी भूमिका त्यांनी घेतली. आपला पक्ष म्हणजे आपल्या पलिकडे काहीच नाही असा संदेश त्यातून गेला. नंतर त्यांनी आपण निवडणूक लढवणार नाही असे सांगितले पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती.आपण आता सत्तेत नाहीत, विरोधकाची भूमिका आपल्याला बजावली पाहिजे हे या पक्षातल्या अनेक नेत्यांना शेवटपर्यंत कळाले नाही. हल्लाबोल यात्रा काढताना तरुण वर्ग आपल्यासोबत येताना दिसत नाही याचेही आकलन वेळीच या पक्षातल्या धुरिणांना झाले नाही. तरुण वर्ग धनंजय मुंडे सोबत जेवढा जोडला जातो तो अन्य नेत्यांसोबत का जात नाही हे ही पक्षनेतृत्वाला उमजले नाही. त्यातून संधी दिली ती देखील घरातल्याच तरुण नातवाला. नाही म्हणायला अमोल कोल्हे या तरुण अभिनेत्यास संधी दिली पण कोल्हे यांचे यश त्यांचे स्वत:चे अधिक होते. त्यात पक्षाचा वाटा कमी होते. भ्रष्टाचाराचे आरोप असणाºया छगन भूजबळ, अजित पवार यांच्या बोलण्यावर जनतेचा विश्वास बसत नव्हता. ज्यांच्या बोलण्यावर विश्वास वाटत होता, व ज्यांची पाटी कोरी होती त्यांच्या नेतृत्वावर पक्षातल्याच अन्य नेत्यांचा विश्वास नव्हता. यामुळे स्वत:च्याच कोंडीत राष्टÑवादीचे नेते सापडले. जे मतदार आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडेच पुन्हा पुन्हा जात, नवे लोक न जोडताच प्रचार करण्याचे काम केले परिणामी अपयश आले.>पराभवाकडे दुर्लक्ष करुन दुष्काळी भागात मदतीसाठी जाऊ..!आमचा ११ जागांचा अंदाज होता. आमच्या कार्यकर्त्यांनी चांगले काम केले आहे. कष्ट घेतले आहेत. त्यामुळे आम्ही व आमचे कार्यकर्ते पराभवाकडे दुर्लक्ष करून आगामी निवडणुकीच्या कामाला लागत आहोत. ज्या जागा आम्ही गमावल्या त्या कमी फरकाने गमावल्या आहेत. या पराभवाचा विचार नक्की करू. राज्यात दुष्काळ भीषण आहे. संकटग्रस्त लोकांना मदत करणार आहे. दुष्काळासंबंधी जो कार्यक्रम हाती घेतला आहे तो तसाच सुरु ठेवणार. - शरद पवार>तीन ठिकाणी विजयराष्ट्रवादी पक्षाने एकूण १९ जागा लढवल्या. त्यातल्या १० जागा भाजपाच्या तर ९ जागा शिवसेनेच्या विरोधात राष्टÑवादीने लढल्या. त्यातील ३ ठिकाणी त्यांनी भाजपला हरवण्याचे काम केले.पार्थ अजित पवार यांच्या उमेदवारीवरुन घातलेला घोळ, शरद पवार यांनी आधी लढणार, नंतर नाही लढणार अशी संभ्रमावस्था निवडणुका जाहीर झाल्यावर तयार केली त्याचाही फटका राष्टÑवादीला बसला.बारामती, सातारा, कोल्हापूर आणि माढा या चार जागा २०१४ साली राष्टÑवादीने जिंकल्या होत्या. त्यापैकी बारामती व सातारा त्यांना राखता आल्या पण कोल्हापूर व माढा मात्र गमवाव्या लागल्या.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९