शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019 : बारामती वाचली, पण शरद पवारांच्या तिसऱ्या पिढीला मतदारांनी नाकारले

By अतुल कुलकर्णी | Updated: May 24, 2019 05:56 IST

लोकसभा निवडणुकीच्या आधीच; सरपंचापासून ते जिल्हा परिषदेपर्यंतचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याजिल्ह्यातले नेटवर्क भाजपने पद्धतशीरपणे मोडून काढले.

- अतुल कुलकर्णीलोकसभा निवडणुकीच्या आधीच; सरपंचापासून ते जिल्हा परिषदेपर्यंतचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याजिल्ह्यातले नेटवर्क भाजपने पद्धतशीरपणे मोडून काढले. त्या जागी भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी कसे निवडून येतील याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले. निवडून येणाऱ्यांना ताकदही दिली. दुसरीकडे राष्ट्रवादीने मात्र त्याच त्या पारंपारिक निवडणूक पध्दतीवर भर देत सगळा प्रचार केला. भाजपने सोशल मिडीयाचा केलेला वापर राष्ट्रवादीला कळालाच नाही. एकीकडे स्वत:ला सेक्यूलर म्हणून घेत असताना दुसरीकडे मुस्लिम आणि दलित मते आपल्याकडे कशी वळतील याकडेच राष्ट्रवादीने सगळे लक्ष केंद्रीत केले त्यामुळे एकदिलाने काम करुनही या पक्षाला पराभव पहाण्याची वेळ आली.भाकरी फिरवली पाहिजे हा विचार मांडणाºया शरद पवार यांनी स्वत: हा विचार कृतीत आणला नाही. मुलगी बारामतीतून, नातू मावळमधून आणि स्वत: माढ्यातून उभे रहणार अशी भूमिका त्यांनी घेतली. आपला पक्ष म्हणजे आपल्या पलिकडे काहीच नाही असा संदेश त्यातून गेला. नंतर त्यांनी आपण निवडणूक लढवणार नाही असे सांगितले पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती.आपण आता सत्तेत नाहीत, विरोधकाची भूमिका आपल्याला बजावली पाहिजे हे या पक्षातल्या अनेक नेत्यांना शेवटपर्यंत कळाले नाही. हल्लाबोल यात्रा काढताना तरुण वर्ग आपल्यासोबत येताना दिसत नाही याचेही आकलन वेळीच या पक्षातल्या धुरिणांना झाले नाही. तरुण वर्ग धनंजय मुंडे सोबत जेवढा जोडला जातो तो अन्य नेत्यांसोबत का जात नाही हे ही पक्षनेतृत्वाला उमजले नाही. त्यातून संधी दिली ती देखील घरातल्याच तरुण नातवाला. नाही म्हणायला अमोल कोल्हे या तरुण अभिनेत्यास संधी दिली पण कोल्हे यांचे यश त्यांचे स्वत:चे अधिक होते. त्यात पक्षाचा वाटा कमी होते. भ्रष्टाचाराचे आरोप असणाºया छगन भूजबळ, अजित पवार यांच्या बोलण्यावर जनतेचा विश्वास बसत नव्हता. ज्यांच्या बोलण्यावर विश्वास वाटत होता, व ज्यांची पाटी कोरी होती त्यांच्या नेतृत्वावर पक्षातल्याच अन्य नेत्यांचा विश्वास नव्हता. यामुळे स्वत:च्याच कोंडीत राष्टÑवादीचे नेते सापडले. जे मतदार आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडेच पुन्हा पुन्हा जात, नवे लोक न जोडताच प्रचार करण्याचे काम केले परिणामी अपयश आले.>पराभवाकडे दुर्लक्ष करुन दुष्काळी भागात मदतीसाठी जाऊ..!आमचा ११ जागांचा अंदाज होता. आमच्या कार्यकर्त्यांनी चांगले काम केले आहे. कष्ट घेतले आहेत. त्यामुळे आम्ही व आमचे कार्यकर्ते पराभवाकडे दुर्लक्ष करून आगामी निवडणुकीच्या कामाला लागत आहोत. ज्या जागा आम्ही गमावल्या त्या कमी फरकाने गमावल्या आहेत. या पराभवाचा विचार नक्की करू. राज्यात दुष्काळ भीषण आहे. संकटग्रस्त लोकांना मदत करणार आहे. दुष्काळासंबंधी जो कार्यक्रम हाती घेतला आहे तो तसाच सुरु ठेवणार. - शरद पवार>तीन ठिकाणी विजयराष्ट्रवादी पक्षाने एकूण १९ जागा लढवल्या. त्यातल्या १० जागा भाजपाच्या तर ९ जागा शिवसेनेच्या विरोधात राष्टÑवादीने लढल्या. त्यातील ३ ठिकाणी त्यांनी भाजपला हरवण्याचे काम केले.पार्थ अजित पवार यांच्या उमेदवारीवरुन घातलेला घोळ, शरद पवार यांनी आधी लढणार, नंतर नाही लढणार अशी संभ्रमावस्था निवडणुका जाहीर झाल्यावर तयार केली त्याचाही फटका राष्टÑवादीला बसला.बारामती, सातारा, कोल्हापूर आणि माढा या चार जागा २०१४ साली राष्टÑवादीने जिंकल्या होत्या. त्यापैकी बारामती व सातारा त्यांना राखता आल्या पण कोल्हापूर व माढा मात्र गमवाव्या लागल्या.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९