महाराष्ट्र महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांमध्ये भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या मोठ्या यशावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अत्यंत तिखट शब्दांत प्रतिक्रिया दिली. "बाप बडा न भैया, सब से बडा रुपैया" अशी हिंदीतील म्हण वापरत दानवे यांनी भाजपच्या विजयाला धनशक्तीचा विजय असल्याचे म्हटले आहे. या निवडणुकीत भाजपने आणि महायुतीने विकासाचा दावा केला असला तरी, अंबादास दानवे यांच्या या विधानामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
निकालांनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, "महाराष्ट्र महानगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपने मोठ्या प्रमाणात जागा जिंकल्या आहेत, पण हे यश रुपयाच्या जोरावर आले आहे. रुपया खूप मोठी कमाल करतो आणि या निवडणुकीत भाजपने सत्ता आणि संपत्तीचा वारेमाप वापर केला आहे. त्यामुळेच त्यांच्या जागा निवडून आल्या आहेत." अंबादास दानवे पुढे म्हणाले की, "जनतेचे अनेक प्रश्न आहेत, जे स्वतः भाजपनेच उपस्थित केले. सत्ता हाती आल्यावर भाजपने हे प्रश्न कसे मार्गी लावायचे, यासाठी त्यांनी कोणताही ठोस सल्ला दिला नाही. केवळ संपत्तीच्या बळावर निवडणुका जिंकल्या आहेत."
Web Summary : Ambadas Danve accused BJP of winning municipal elections through wealth, not development. He alleged the party excessively used money and power, ignoring public issues. Danve claims BJP lacked concrete solutions, relying solely on financial strength for victory.
Web Summary : अंबादास दानवे ने भाजपा पर धनबल से महानगरपालिका चुनाव जीतने का आरोप लगाया, विकास से नहीं। उन्होंने आरोप लगाया कि पार्टी ने अत्यधिक धन और शक्ति का उपयोग किया, सार्वजनिक मुद्दों को अनदेखा किया। दानवे का दावा है कि भाजपा के पास कोई ठोस समाधान नहीं था, केवल वित्तीय ताकत पर निर्भर थी।