शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

Maharashtra Political Crisis: “चित्रा वाघ यांनी संजय राठोडांना राखी बांधावी, अन्यथा...”; बंजारा समाजाचा थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 12:30 IST

Maharashtra Political Crisis: विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जात असताना या घडामोडींमध्ये बंजारा समाजाने उडी घेतल्याने एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शपथ घेऊन ३८ दिवस झाल्यानंतर अखेर मंत्रिमंडळाच्या मुहुर्ताला मूर्त रुप आले. यात भाजपच्या ९ आणि शिंदे गटातील ९ आमदारांनी शपथ घेतली. मात्र, पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी मागील मंत्रिमंडळातून राजीनामा द्याव्या लागलेल्या संजय राठोड यांना नव्या सरकारने पुन्हा एकदा मंत्री केल्यावरून विरोधकांनी नव्या शिंदे-भाजप सरकारवर टीकेचे आसूड ओढले आहे. यातच आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांना राखी बांधावी, असे आवाहन बंजारा समाजाकडून करण्यात आले आहे. 

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांनी शिंदे सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे, ते आता देवेंद्र फडणवीस आणि चंदकांत पाटील यांच्यासोबत मंत्रिमंडळात दिसणार आहे. ज्या भाजपने त्यांच्या राजीनाम्यासाठी राळ उठवली होती, आंदोलने केली होती तेच आता भाजपसोबत मंत्री असणार आहेत. त्यामुळे, भाजपची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

चित्रा वाघ यांनी नमती भूमिका घेतली तरच हा वाद मिटेल

चित्रा वाघ यांनी नमती भूमिका घेतली तरच हा वाद मिटेल अन्यथा हा अन्याय समाजाकडून सहन केला जाणार नाही, असा इशाराही बंजारा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे. संजय राठोड यांच्यावर वेळोवेळी करण्यात येणाऱ्या टीकेनंतर बंजारा समाजाने आता याप्रकरणी विरोधी भूमिका घेतली असून, चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांना राखी बांधावी, अन्यथा रस्त्यावर उतरु असा इशारा बंजारा समाजाकडून देण्यात आला आहे. संजय राठोडांवर केली जाणारी टीका देशातील सबंध बंजारा समाजावर केली जात आहे. त्यामुळे चित्रा वाघ यांच्याविरोधात बंजारा समाजाच्या महंतांनी नाराजीचा सूर आळवला असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळ विस्तारात संजय राठोड यांना संधी देण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. राठोड यांच्या शपथविधीनंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. तसेच विरोधकांकडून सरकावर टीकेची झोड उठवली जात असताना आता या सर्व घडामोडींमध्ये बंजारासमाजाने उडी घेतली आहे. त्यामुळे आता आणखी एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळChitra Waghचित्रा वाघSanjay Rathodसंजय राठोड