शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

केळी उत्पादकांना हेक्टरी १८ हजारांचा मोबदला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 04:43 IST

अतिवृष्टीमुळे जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून त्यांना प्रति हेक्टरी १८ हजार रुपयाची नुकसान भरपाई देण्याची घोषणा मदत व पुनर्वसन राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी गुरुवारी विधानसभेत केली.

नागपूर : अतिवृष्टीमुळे जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून त्यांना प्रति हेक्टरी १८ हजार रुपयाची नुकसान भरपाई देण्याची घोषणा मदत व पुनर्वसन राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी गुरुवारी विधानसभेत केली. परंतु सदस्यांचे यावरही समाधान झाले नाही, तेव्हा ही मदत वाढवण्याचाही विचार शासन करेल, असेही त्यांनी जाहीर केले.राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश टोपे यांनी जळगाव जिल्ह्यात चक्रीवादळाने केळी उत्पादक शेतकºयांच्या नुकसानीसंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर उत्तर देताना राज्यमंत्री कांबळे यांनी सांगितले की, जळगाव जिल्ह्यात १, ५ व ६ जून रोजी वादळी वारा व पावसामुळे जिल्ह्यातील रावेर, मुक्ताईनगर, यावल व चोपडा या तालुक्यातील केळी पिकांचे एकूण ४४१३.१४ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे. या नुकसानीमुळे बाधित शेतकºयांच्या मदत देण्याच्या दृष्टीन्ीे संयुक्त पंचनामे करण्यात आले आहेत. केळी उत्पादक शेतकºयांना मदत देण्यासाठी शासन सकारात्मक आहे. यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, हरिभाऊ जावळे यांनी सहभाग घेतला.> मध्य प्रदेशात एक लाखाची मदतभाजपचे ज्येष्ठ सदस्य एकनाथ खडसे यांनी यावेळी केळी उत्पादक शेतकºयांची व्यथा मांडली. ते म्हणाले या वादळी पावसामुळे जो भाग प्रभावित झाला तो मध्य प्रदेश राज्याच्या सीमेला लागून आहे. त्यातील काही शेती मध्य प्रदेशातही आहे. त्यांच्या राज्यातील केळी उत्पादकांचेही मोठे नुकसान झाले. तेथील सरकारने प्रभावित भागाचा दौरा करून मदतीचे पॅकेज जाहीर केले. त्यात प्रत्येकी १ लाख रुपयाची मदत जाहीर करण्यात आली. यासोबत विजेचे बिल माफ करीत खाली पडलेली केळी सरकारतर्फे हटविण्याची घोषणाही करण्यात आली. त्या तुलनेत महाराष्ट्र सरकारची मदत म्हणजे शेतकºयांची ‘टिंगलटवाळी’ होय. तेव्हा मध्य प्रदेश सरकारप्रमाणे मदत करणार का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.>आजवर कधीचमागितली नाही मदतराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सुद्धा शासकीय मदत अपूर्ण असल्याचे सांगत राज्यातील केळी उत्पादकांनी आजवर कधीच शासनाकडे मदत मागितली नाही. चिकू, आंबा, काजू उत्पादकही मदत मागत नाही. सरकार नेहमीच धान, कापूस, सोयाबीनला मदत देत असते. तेव्हा हा कोकण आणि उत्तर महाराष्ट्रावर अन्याय आहे.

टॅग्स :nagpurनागपूरNagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८