शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
3
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
4
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
5
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
6
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
7
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
8
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
9
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
10
नवा ट्रेंड! मूल नको, कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
11
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
12
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
13
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
14
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
15
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
16
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त
17
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
18
IAS Govind Jaiswal : लोकांनी खिल्ली उडवली पण 'तो' डगमगला नाही; रिक्षा चालकाच्या लेकाने IAS होऊन दिलं उत्तर
19
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?
20
"गर्लफ्रेंडमुळे तीन वर्षे जगायला मिळाली, आता..."; नाशिकमध्ये विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच आयुष्य संपवलं

जंकफूडवर बंदी योग्यच...

By admin | Updated: May 12, 2017 02:11 IST

शाळांमधील उपाहारगृहात जंकफूड विक्रीवर बंदी घालण्याच्या शासन निर्णयाचे मुख्याध्यापक आणि पालक संघटनेने स्वागत केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शाळांमधील उपाहारगृहात जंकफूड विक्रीवर बंदी घालण्याच्या शासन निर्णयाचे मुख्याध्यापक आणि पालक संघटनेने स्वागत केले आहे. मात्र निर्णय घेऊन सर्व जबाबदारी शासनाने मुख्याध्यापक व शाळा प्रशासनावर ढकलू नये, अशी मागणीही पुढे येत आहे. राज्य शासन आणि महापालिका प्रशासनानेही या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्याध्यापक संघ आणि पालक संघटनेने केले आहे.मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे सचिव प्रशांत रेडीज म्हणाले की, शाळा परिसरात शासनाने जंकफूडवर घातलेली बंदी योग्यच आहे. त्याचे मुख्याध्यापक संघटना स्वागत करते. मात्र मुख्याध्यापक किंवा शाळा प्रशासन यांची जबाबदारी ही शाळेच्या प्रवेशद्वारापर्यंत सीमित आहे. परिणामी, विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रवेशद्वाराबाहेर जाऊन जंकफूड खाल्ले, तर त्यावर नियंत्रण आणण्याचे काम हे महापालिकेचे असेल. त्यामुळेच महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना भेटून मुख्याध्यापक संघातर्फे शाळा परिसराच्या १०० मीटर परिसरातील जंकफूडची दुकाने बंद करण्याची मागणी केली जाईल. त्यासाठी लवकरच महापौरांची भेटही घेण्यात येईल.जंकफूडवर बंदी आणली असली तरी शाळा प्रशासनाने उपाहारगृहाचे कंत्राट देताना पीटीए (पालक-शिक्षक संघटना) सदस्यांसोबत चर्चा करावी, अशी मागणी मुंबई पालक-शिक्षक संघटनेच्या अध्यक्षा अरुंधती चव्हाण यांनी केली आहे. चव्हाण म्हणाल्या की, जंकफूडवरील बंदी स्वागतार्ह आहे. मात्र उपाहारगृहाचे कंत्राट देताना शासन निविदा काढते. त्यामुळे कमी गुंतवणुकीत जास्त पैसे कमावण्यासाठी कंत्राटदार जंकफूडवर अधिक भर देतात. याउलट पौष्टिक अन्न विद्यार्थ्यांना द्यायचे असेल, तर त्याबाबत मुलांच्या संपर्कात असलेल्या पालक आणि शिक्षकांना विश्वासात घेणे अधिक गरजेचे आहे. चपाती, भाजी हे पदार्थ विविध स्वरूपात अधिक आकर्षक आणि चविष्ट करण्याच्या कामात पालक-शिक्षकांचा सल्ला महत्त्वाचा ठरू शकतो. परिणामी, या निर्णयात पालक व शिक्षकांचा सहभाग नसेल तर विद्यार्थ्यांची उपासमार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.कारवाईसाठी प्रशासन सज्ज!सध्या तरी शाळांमधील उपाहारगृहे बंद आहेत. मात्र जून महिन्यात शाळा सुरू झाल्यावर मुख्याध्यापकांना शासन निर्णय कळवला जाईल. मुंबईतील शाळांमधील उपाहारगृहांची संख्या अधिक असून जंकफूडचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे शासन निर्णयाची अंमलबजावणी होतेय की नाही, याची खातरजमा करून घेण्याचे आदेश मुख्याध्यापकांना दिले जातील. शिवाय पीटीएच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करून त्यावर चर्चा करून बैठकीत पालकांचे समुपदेशन करण्यास शाळा प्रशासनाला सांगितले जाईल. त्यानंतरही एखाद्या शाळेतील उपाहारगृह दोषी आढळले, तर उपाहारगृह बंद करून मुख्याध्यापक आणि शाळा प्रशासनाला कारणे दाखवा नोटीस देण्यात येईल. त्यात मुख्याध्यापक दोषी असेल तर व्यवस्थापनाला मुख्याध्यापकावर कारवाई करण्याचे आदेशही दिले जातील. - बी. बी. चव्हाण (शिक्षण उपसंचालक, मुंबई विभाग)नियमित तपासणी आवश्यकचशासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होतेय की नाही, याची नियमित तपासणी होणे आवश्यक आहे. अन्यथा इतर कायद्यांप्रमाणे हा निर्णयही केवळ एक सोपस्कार ठरेल. गेल्या अनेक वर्षांपासून संघटना याबाबत पाठपुरावा करत होती. त्यामुळे महिन्यातून एकदा असे न ठरवता, अचानक टाकण्यात येणाऱ्या धाडींचा समावेश केला, तर नक्कीच निर्णयाची कडक अंमलबजावण पाहायला मिळेल.- अरुंधती चव्हाण (अध्यक्ष, पालक-शिक्षक संघटना)अंमलबजावणी काटेकोर हवी!-या निर्णयामुळे जंकफूडच्या आहारी चाललेल्या शहरी भागांतील लहानग्यांची जीवनशैली नक्कीच सुधारेल. मात्र निर्णयाची अंमलबजावणी करताना उपाहारगृहातील पदार्थांच्या नमुन्यांचे दर तीन महिन्यांनी पर्यवेक्षण केले पाहिजे. तेव्हाच राज्य शासनाने जंकफूडऐवजी सुचविलेले पदार्थ योग्यरीत्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतील. यासोबत उपाहारगृहात खजूर, तीळ, स्प्राऊट्स अशा लोहयुक्त पदार्थांचाही समावेश करता येईल. या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी केल्यास मेट्रो शहरांतील लहानग्यांची किमान ५० टक्के जीवनशैली आणि आहारपद्धती सुधारेल हे निश्चित आहे.- ध्वनी शहा, निसर्गोपचार आहारतज्ज्ञविद्यार्थी हितासाठी काहीही...!-पालकांसह शिक्षकांवर ही नवी जबाबदारी असेल. जूनच्या पहिल्याच आठवड्यात पालक सभा घेतली जाते. हीच समुवदेशनाची योग्य वेळ असेल. वर्षभरातील योजना, उपक्रम, शिस्त यांसोबत पालकांना विद्यार्थ्यांकडे डबा देण्याचा सल्ला आवर्जून द्यावा लागेल. समुपदेशन करताना शालेय पोषण आहाराचे धडेही देता येतील. विशेषत: नववी व दहावी इयत्तेमधील विद्यार्थ्यांचे व पालकांचे समुपदेशन गरजेचे आहे. शिक्षकांचे काम या निर्णयामुळे वाढणार असले, तरी विद्यार्थ्यांच्या हितासाठी हे अधिकचे काम करण्याची तयारी आहे.- अनिल बोरनारे,महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद