शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
4
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
5
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
6
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
7
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
8
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
9
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
10
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
11
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
12
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
13
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
14
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
15
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
16
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
17
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
18
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
19
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
20
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...

बालभारती, वन्स मोअर अन् भिंग भिंग भिंगरी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2024 12:38 IST

मोरोपंतांनी कविता वाचली आणि ते कमालीचे अस्वस्थ झाले. 

दुर्गेश सोनार, सहायक संपादक

मोरोपंतांच्या मोबाइलवर सक्काळी सक्काळी व्हॉट्सॲपचं नोटिफिकेशन आलं. त्यांनी डोळे चोळत चोळतच मोबाइल हातात घेतला आणि काय आलंय ते पाहिलं... त्यांचे डोळे विस्फारले... पहिलीच्या पाठ्यपुस्तकातली बालकविता कोणत्या तरी ग्रुपवर कुणी तरी धाडली होती. मोरोपंतांनी कविता वाचली आणि ते कमालीचे अस्वस्थ झाले. 

‘जंगलातली मैफिल’ कवितेतून मांडत असताना त्या कवयित्रीने केलेली शब्दांची ओढाताण पाहून मोरोपंतांचा रसभंग झाला. त्यांना जुन्या बालभारतीतल्या कविता आठवू लागल्या... खरंच, पूर्वीच्या (जुन्या काळातल्या) कविता अशा उथळ नव्हत्या. एकप्रकारचं नादमाधुर्य, लालित्य, कल्पनारम्यता, सहजता त्या जुन्या कवितांमध्ये होती. बालमनाला ‘भावे’ल अशा त्या कविता होत्या. पावसाची सर जशी झरझर यावी, तसे त्या कवितांमधले शब्द झरझर येत असत. त्यामुळेच तर त्या कवितांना पिढ्यान् पिढ्या ‘वन्स मोअर’ मिळत गेला आणि आजही त्या कविता इतक्या लख्ख लक्षात राहिल्या.  

देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश, सूर्य देतो... अहाहा... ग. ह. पाटलांची काय ती कविता होती... बालभारतीतल्या अशा एकेक कविता मोरोपंतांना आठवू लागल्या. त्यांचं मनातल्या मनात चिंतन सुरू झालं... 

इतकं सुंदर खरं तर लिहिता आलं पाहिजे. पण छोट्या मुलांच्या भावविश्वाला आपलंसं वाटेल असं सोप्पं, सहज लिहिणं हेच खरं म्हणजे अवघड असतं. तरी, ‘ट ला ट, र ला र... म्हणे मी कविता करणार...’ अशी यमके कवी काहीच्या काही लिहून कवितेला उथळ करून टाकतात. अशा सुमार कवितांमुळे मुलांमध्ये साहित्याबद्दल आवड तरी कशी निर्माण होणार? आधीच मुलं कवितांपासून, पुस्तकांपासून दूर हरवत चालली आहेत मोबाइलच्या दुनियेमध्ये... त्यांच्यासमोर आभासी मायाजाल तंत्रज्ञानाने पसरवलेलं आहे. त्यात मुलं अडकू नयेत, यासाठी उत्तम दर्जाचं बालसाहित्य त्यांच्यासमोर यायला हवं... मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना देईल, त्यांची सौंदर्यदृष्टी वाढवेल, त्यांचा भाषिक विकास करेल, अशा बालसाहित्याची गरज आहे. पण दुर्दैवाने सध्याच्या घडीला ही एक मोठी पोकळी मराठी बालसाहित्यात जाणवत आहे.

मोरोपंतांना ही सल प्रकर्षाने जाणवू लागली. त्यांना साने गुरूजींची आठवण झाली. ते म्हणाले होते, ‘करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयाचे...’  पण असे रंजनातून शिक्षण देणारे शिक्षक तरी आता कुठे राहिलेत शाळाशाळांमध्ये...? काही अपवाद नक्कीच असतील, पण तितकं पुरेसं नाही. बिनभिंतीच्या शाळेत बरंच काही शिकता येतं. पण त्याचं भान ना पालकांना ना इथल्या शिक्षण व्यवस्थेला... त्रिकोणी कुटुंबांमध्ये गोष्टी सांगणारे आजी-आजोबा घरात नाहीत, मग सांस्कृतिक संचिताचं बाळकडू मुलांना मिळणार तरी कसं?  असे एक ना अनेक प्रश्न पहिलीतल्या त्या एका बालकवितेने मोरोपंतांसमोर उभे ठाकले. बालभारतीतल्याच जुन्या कवितेतील भिंगरीप्रमाणे मोरोपंतांभोवती या प्रश्नांची भिंग भिंग भिंगरी फिरू लागली... आणि ते कमला पवार यांची ती कविता गुणगुणू लागले...

‘एक होती भिंगरी, भिंग भिंग भिंगरीतिचं नाव झिंगरी, झिंग झिंग झिंगरी तिला आहे एक पायपायावरती गिरकी खाय सारखी सारखी फिरते गोलफिरता फिरता जातो तोलगिरकी खाऊन आली चक्करभिंतीवरती मारली टक्कर’  

टॅग्स :Educationशिक्षण