शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
2
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
3
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
4
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
5
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
6
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
7
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
8
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
9
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
10
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
11
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
12
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय केले? तपशील सादर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
13
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
14
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
15
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
16
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
17
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
18
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
19
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
20
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!

बालभारती, वन्स मोअर अन् भिंग भिंग भिंगरी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2024 12:38 IST

मोरोपंतांनी कविता वाचली आणि ते कमालीचे अस्वस्थ झाले. 

दुर्गेश सोनार, सहायक संपादक

मोरोपंतांच्या मोबाइलवर सक्काळी सक्काळी व्हॉट्सॲपचं नोटिफिकेशन आलं. त्यांनी डोळे चोळत चोळतच मोबाइल हातात घेतला आणि काय आलंय ते पाहिलं... त्यांचे डोळे विस्फारले... पहिलीच्या पाठ्यपुस्तकातली बालकविता कोणत्या तरी ग्रुपवर कुणी तरी धाडली होती. मोरोपंतांनी कविता वाचली आणि ते कमालीचे अस्वस्थ झाले. 

‘जंगलातली मैफिल’ कवितेतून मांडत असताना त्या कवयित्रीने केलेली शब्दांची ओढाताण पाहून मोरोपंतांचा रसभंग झाला. त्यांना जुन्या बालभारतीतल्या कविता आठवू लागल्या... खरंच, पूर्वीच्या (जुन्या काळातल्या) कविता अशा उथळ नव्हत्या. एकप्रकारचं नादमाधुर्य, लालित्य, कल्पनारम्यता, सहजता त्या जुन्या कवितांमध्ये होती. बालमनाला ‘भावे’ल अशा त्या कविता होत्या. पावसाची सर जशी झरझर यावी, तसे त्या कवितांमधले शब्द झरझर येत असत. त्यामुळेच तर त्या कवितांना पिढ्यान् पिढ्या ‘वन्स मोअर’ मिळत गेला आणि आजही त्या कविता इतक्या लख्ख लक्षात राहिल्या.  

देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश, सूर्य देतो... अहाहा... ग. ह. पाटलांची काय ती कविता होती... बालभारतीतल्या अशा एकेक कविता मोरोपंतांना आठवू लागल्या. त्यांचं मनातल्या मनात चिंतन सुरू झालं... 

इतकं सुंदर खरं तर लिहिता आलं पाहिजे. पण छोट्या मुलांच्या भावविश्वाला आपलंसं वाटेल असं सोप्पं, सहज लिहिणं हेच खरं म्हणजे अवघड असतं. तरी, ‘ट ला ट, र ला र... म्हणे मी कविता करणार...’ अशी यमके कवी काहीच्या काही लिहून कवितेला उथळ करून टाकतात. अशा सुमार कवितांमुळे मुलांमध्ये साहित्याबद्दल आवड तरी कशी निर्माण होणार? आधीच मुलं कवितांपासून, पुस्तकांपासून दूर हरवत चालली आहेत मोबाइलच्या दुनियेमध्ये... त्यांच्यासमोर आभासी मायाजाल तंत्रज्ञानाने पसरवलेलं आहे. त्यात मुलं अडकू नयेत, यासाठी उत्तम दर्जाचं बालसाहित्य त्यांच्यासमोर यायला हवं... मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना देईल, त्यांची सौंदर्यदृष्टी वाढवेल, त्यांचा भाषिक विकास करेल, अशा बालसाहित्याची गरज आहे. पण दुर्दैवाने सध्याच्या घडीला ही एक मोठी पोकळी मराठी बालसाहित्यात जाणवत आहे.

मोरोपंतांना ही सल प्रकर्षाने जाणवू लागली. त्यांना साने गुरूजींची आठवण झाली. ते म्हणाले होते, ‘करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयाचे...’  पण असे रंजनातून शिक्षण देणारे शिक्षक तरी आता कुठे राहिलेत शाळाशाळांमध्ये...? काही अपवाद नक्कीच असतील, पण तितकं पुरेसं नाही. बिनभिंतीच्या शाळेत बरंच काही शिकता येतं. पण त्याचं भान ना पालकांना ना इथल्या शिक्षण व्यवस्थेला... त्रिकोणी कुटुंबांमध्ये गोष्टी सांगणारे आजी-आजोबा घरात नाहीत, मग सांस्कृतिक संचिताचं बाळकडू मुलांना मिळणार तरी कसं?  असे एक ना अनेक प्रश्न पहिलीतल्या त्या एका बालकवितेने मोरोपंतांसमोर उभे ठाकले. बालभारतीतल्याच जुन्या कवितेतील भिंगरीप्रमाणे मोरोपंतांभोवती या प्रश्नांची भिंग भिंग भिंगरी फिरू लागली... आणि ते कमला पवार यांची ती कविता गुणगुणू लागले...

‘एक होती भिंगरी, भिंग भिंग भिंगरीतिचं नाव झिंगरी, झिंग झिंग झिंगरी तिला आहे एक पायपायावरती गिरकी खाय सारखी सारखी फिरते गोलफिरता फिरता जातो तोलगिरकी खाऊन आली चक्करभिंतीवरती मारली टक्कर’  

टॅग्स :Educationशिक्षण