शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

राज-उद्धव यांनी एकत्र यावे, ही बाळासाहेबांची शेवटची इच्छा; नितीन गडकरींचा गौप्यस्फोट...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 21:21 IST

गेल्या काही दिवसांपासून राज्यात ठाकरे बंधुंनी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत.

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात अनपेक्षित घटना घडल्या आहेत. वर्षभरापूर्वी राज्यात शिवसेना शिंदे गट आणि भाजपचे युतीचे सरकार स्थापन झाले होते. एका वर्षापासून हे सरकार सुरळीत सुरू होते, पण अचानक एक मोठा भूकंप झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह सरकारमध्ये सामील झाले. या सर्व घडामोडीदरम्यान, मुंबईत अनेक ठिकाणी दोन्ही ठाकरे बंधुंनी एकत्र येण्याचे आवाहन करणारे बॅनर झळकत आहेत. यातच आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठा दावा केला आहे.

झी मराठीवर अवधुत गुप्ते 'खुपते तिथे गुप्ते' शो घेऊन आले आहेत. या शोमध्ये नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी हजेरी लावली. येत्या 9 तारखेला हा भाग रिलीज होणार आहे. या भागाचे काही प्रोमो समोर येत आहेत, अशाच एका प्रोमोमध्ये नितीन गडकरी यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे  (Balasaheb Thackeray) यांची शेवटची इच्छा बोलून अपूर्ण राहिल्याचे सांगितले. 

बाळासाहेबांची इच्छा अपूर्ण...

यावेळी नितीन गडकरी म्हणाले की, बाळासाहेबांचे माझ्यावर आणि माझे बाळासाहेबांवर खूप प्रेम होते. बाळासाहेब त्यांच्या अखेरच्या दिवसांत होते, तेव्हा मी त्यांना भेटायला गेले होतो. त्यावेळेस त्यांनी सर्वांना बाहेर जायलं सांगितलं आणि मला एकट्यात शेवटची इच्छा बोलून दाखवली. त्यांनी मला राज आणि उद्दव यांना एकत्र करण्यास सांगितले. राजकारण एका बाजुला, पण एक कुटुंब म्हणून एकत्र असल्यावर ताकत वाढत असते. बाळासाहेबांची ती इच्छा अद्याप अपूर्ण राहिली आहे, असा गौप्यस्फोट गडकरींनी केला.  

राज्यातील परिस्थितीवर भाष्ययाच कार्यक्रमात नितीन गडकरींनी राज्यातील परिस्थितीवरही भाष्य केले आहे. महाराष्ट्रातील राजकीय परंपरा ही खरेतर देशातील राजकारणापेक्षा वेगळी आहे. वैचारिक मतभेद असतील पण मनभेद नव्हते. मी 18 वर्षे विधिमंडळात होतो, कठोर टीका करायचो पण व्यक्तिगत मैत्री होती. थोडेसे आता जास्त झाल्यासारखे वाटते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्वसामान्य माणसाला याचा कंटाळा आलाय. याला खरे कारण नेत्यांपेक्षा मीडियाच कारणीभूत आहे. 

मतदारांना दिला मोलाचा सल्ला

या देशात विचारभिन्नता ही समस्या नाही तर विचारशून्यता समस्या आहे. तुम्ही कुठल्याही पक्षाच्या विचाराचे असाल, कम्युनिस्ट असाल, समाजवादी असाल पण तुम्ही विचारांशी प्रामाणिक राहिले पाहिजे. मूळात याला मतदार जबाबदार आहे. जसं मुलीसाठी नवरा बघता, सासू-सासरे कसे आहेत. घर कसे आहेत याचा विचार करता मग मत देताना का गांभीर्याने विचार करत नाही. हा माझ्या जातीचा, हा माझ्या भाषेचा म्हणून मतदान करता. ज्यादिवशी जनता ठरवेल की, आम्ही देणारे मत विचारपूर्वक देऊ. बिल्कुल चुकीच्या माणसाला देणार नाही. त्यादिवशी राजकारणात आपोआप बदल होतील, असंही गडकरी यावेळी म्हणाले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीRaj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेMNSमनसेShiv Senaशिवसेना