शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
3
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
4
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
5
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
6
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
7
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
8
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
9
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
10
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
11
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
12
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
13
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
14
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
15
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
16
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
17
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
18
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
19
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
20
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी

Ramdas Kadam: “पक्ष फुटला तरी चालेल, पण काँग्रेस-NCPची साथ सोडायची नाही ही उद्धव ठाकरेंची भूमिका होती”

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 16:17 IST

Ramdas Kadam: विरोधकांनी आरोप करण्यापेक्षा सिद्ध करून दाखवावे, असे आव्हान रामदास कदम यांनी ‘५० खोके’च्या दाव्यावरून दिले आहे.

Ramdas Kadam: बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होताना पाहायला मिळत आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी दोन्ही गट सोडत नसल्याचे दिसत आहे. विविध मुद्द्यांवरून शिंदे गट आणि ठाकरे गटाचे दावे-प्रतिदावे सुरू आहेत. यातच शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. पक्ष फुटला तरी चालेल, पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ सोडायची नाही ही उद्धव ठाकरेंची भूमिका होती, असा गौप्यस्फोट रामदास कदम यांनी केला.

अनिल परब यांच्याविरोधात दापोलीत  गुन्हा नोंद झाल्यानंतर रामदास कदम यांनी रत्नागिरीतील खेडमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी रामदास कदम यांनी अनिल परब यांच्यावर सडकून टीका केली. तसेच उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. 

काँग्रेस-NCPची साथ सोडायची नाही ही उद्धव ठाकरेंची भूमिका होती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खोके देतात. पण ते जनतेच्या विकासकामांसाठी देत असल्याचे त्यांनी म्हटले. विरोधकांनी आरोप करण्यापेक्षा सिद्ध करून दाखवावे, असे आव्हान रामदास कदम यांनी दिले आहे. तसेच पक्ष फुटला तरी चालेल पण राष्ट्रवादी आणि काँग्रेसची साथ सोडायची नाही ही उद्धव ठाकरेंनी भूमिका घेतली होती, असा मोठा दावा रामदास कदम यांनी केला. 

अनिल परब यांना अजूनपर्यंत अटक का केली जात नाही? 

माजी परिवहन मंत्री अनिल परब यांना अजून पर्यंत अटक का केली जात नाही असा सवाल रामदास कदम यांनी केला. अनिल परब यांनी शिवसेना संपवण्याचे काम केले. त्यांना लवकर अटक करायला हवी. दापोली-मंडणगडची नगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात होती. ही नगरपालिका त्यांनी राष्ट्रवादीच्या घशात घातली. माझा मुलगा योगेश कदमला परब यांनी खूप त्रास दिला. उद्धव ठाकरे यांनाही अशीच माणसे आपल्याभोवती लागतात. सुभाष देसाई हे उद्धव यांचे कान भरतात, या शब्दांत रामदास कदम यांनी घणाघाती टीका केली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना