शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

Maharashtra Politics: “राहुल गांधीना गुजरातमध्ये जेवढा फायदा झाला, तेवढा फायदा उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रात होणार”

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2022 17:37 IST

Maharashtra News: सीमावादाबाबत महाराष्ट्र कधीही तडजोड करणार नाही, असे शिंदे गटातील मंत्र्यांनी ठामपणे सांगितले आहे.

Maharashtra Politics: शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटातील संघर्ष वाढत आहे. दोन्ही गटाचे नेते एकमेकांवर टीका, आरोप-प्रत्यारोपाची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. महाराष्ट्र कर्नाटक सीमावादप्रश्न अधिक तापताना दिसत आहे. यावरून ठाकरे गटासह महाविकास आघाडीचे नेते शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करत आहेत. तर, भाजप आणि शिंदे गटातील नेतेही प्रत्युत्तर देत आहेत. यातच काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांना गुजरातमध्ये जेवढा फायदा झाला, तेवढाच महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंना होईल, असा टोला शिंदे गटाकडून लगावण्यात आला आहे. 

शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार यांनी ठाकरे गटाकडून होत असलेल्या टीकेचा खरपूस समाचार घेतला. उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिलो असतो तर माझ्या नावसमोर माजी आमदार असे लागले असते. उद्धव ठाकरेंची तब्बेत बरी नाही म्हणून रश्मी वहिनींना मुख्यमंत्री खुर्चीवर बसवा असे सांगणारा मी होतो, असा दावाही अब्दुल सत्तार यांनी केला आहे. 

उद्धव ठाकरे यांच्या जालना दौऱ्यावरून टीकास्त्र

अब्दुल सत्तारांनी उद्धव ठाकरे यांच्या जालना दौऱ्यावर टीका केली. चांगली गोष्ट आहे प्रत्येकाने बाहेर फिरायला पाहिजे पक्षवाढीसाठी चांगले आहे. आता सर्वच बाहेर फिरत आहेत, राहुल गांधी तिकडे फिरत आहेत, त्यांना हिमाचल प्रदेश मध्ये फायदा झाला, असा टोला सत्तारांनी लगावला. तसेच राहुल गांधीना गुजरात मध्ये जेवढा फायदा झाला तेवढा फायदा उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रात होणार असल्याचा दावाही सत्तारांनी केला. 

दरम्यान, सीमावादाबाबत महाराष्ट्र कधीही तडजोड करणार नाही. दोन्ही बाजूला भाजप सरकार आहे. त्यामुळे अमित शाह तोडगा करतील. भविष्यात असे वाद होणार नाही, यासाठी केंद्र सरकारने लक्ष घालावे. राज्यातील सर्व पक्ष एकत्र आहेत. विरोधकांनी एकजूट होऊन महाराष्ट्रासाठी लढावे. केंद्र सरकार आपल्याला न्याय देईल. महाराष्ट्रच्या हिताचे जे बोलतील त्या सोबत आम्ही आहोत, असे अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारUddhav Thackerayउद्धव ठाकरे