शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

Maharashtra Politics: “राहुल गांधीना गुजरातमध्ये जेवढा फायदा झाला, तेवढा फायदा उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रात होणार”

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2022 17:37 IST

Maharashtra News: सीमावादाबाबत महाराष्ट्र कधीही तडजोड करणार नाही, असे शिंदे गटातील मंत्र्यांनी ठामपणे सांगितले आहे.

Maharashtra Politics: शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटातील संघर्ष वाढत आहे. दोन्ही गटाचे नेते एकमेकांवर टीका, आरोप-प्रत्यारोपाची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. महाराष्ट्र कर्नाटक सीमावादप्रश्न अधिक तापताना दिसत आहे. यावरून ठाकरे गटासह महाविकास आघाडीचे नेते शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करत आहेत. तर, भाजप आणि शिंदे गटातील नेतेही प्रत्युत्तर देत आहेत. यातच काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांना गुजरातमध्ये जेवढा फायदा झाला, तेवढाच महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंना होईल, असा टोला शिंदे गटाकडून लगावण्यात आला आहे. 

शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार यांनी ठाकरे गटाकडून होत असलेल्या टीकेचा खरपूस समाचार घेतला. उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिलो असतो तर माझ्या नावसमोर माजी आमदार असे लागले असते. उद्धव ठाकरेंची तब्बेत बरी नाही म्हणून रश्मी वहिनींना मुख्यमंत्री खुर्चीवर बसवा असे सांगणारा मी होतो, असा दावाही अब्दुल सत्तार यांनी केला आहे. 

उद्धव ठाकरे यांच्या जालना दौऱ्यावरून टीकास्त्र

अब्दुल सत्तारांनी उद्धव ठाकरे यांच्या जालना दौऱ्यावर टीका केली. चांगली गोष्ट आहे प्रत्येकाने बाहेर फिरायला पाहिजे पक्षवाढीसाठी चांगले आहे. आता सर्वच बाहेर फिरत आहेत, राहुल गांधी तिकडे फिरत आहेत, त्यांना हिमाचल प्रदेश मध्ये फायदा झाला, असा टोला सत्तारांनी लगावला. तसेच राहुल गांधीना गुजरात मध्ये जेवढा फायदा झाला तेवढा फायदा उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रात होणार असल्याचा दावाही सत्तारांनी केला. 

दरम्यान, सीमावादाबाबत महाराष्ट्र कधीही तडजोड करणार नाही. दोन्ही बाजूला भाजप सरकार आहे. त्यामुळे अमित शाह तोडगा करतील. भविष्यात असे वाद होणार नाही, यासाठी केंद्र सरकारने लक्ष घालावे. राज्यातील सर्व पक्ष एकत्र आहेत. विरोधकांनी एकजूट होऊन महाराष्ट्रासाठी लढावे. केंद्र सरकार आपल्याला न्याय देईल. महाराष्ट्रच्या हिताचे जे बोलतील त्या सोबत आम्ही आहोत, असे अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारUddhav Thackerayउद्धव ठाकरे