शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics: “आम्ही सदैव मिलिंद नार्वेकरांच्या पाठीशी उभे राहू, शिंदे गटात येत असतील तर स्वागतच करू”

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2022 08:44 IST

Maharashtra News: मिलिंद नार्वेकरांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी आम्ही तयार आहोत, असे शिंदे गटातील मंत्र्यांनी म्हटले आहे.

Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटाला राज्यभरातून पाठिंबा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. केवळ शिवसेना नाही, तर काँग्रेस, राष्ट्रवादीमधीलही नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर शिंदे गटात प्रवेश करताना दिसत आहेत. पक्ष संघटना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) बैठका, दौरे यांवर भर देत आहेत. यातच मातोश्रीचे निष्ठावंत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सचिव आणि उद्धव ठाकरेंचे एकदम खास मानले जाणारे मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) नाराज असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. यातच शिंदे गटाच्या मंत्र्यांनी एक सूचक विधान केले आहे. 

महाविकास आघाडीच्या विविध नेत्यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय नुकताच राज्य सरकारने घेतला. मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत मात्र वाढ करण्यात आली आहे. या निर्णयानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, तर्क-वितर्क लढवले जात आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मिलिंद नार्वेकर यांच्याविषयी एक महत्त्वाचे विधान केले आहे.

मिलिंद नार्वेकर शिंदे गटात येत असतील तर स्वागतच करू

प्रसारमाध्यमांशी बोलताना उदय सामंत म्हणाले की, मिलिंद नार्वेकर यांच्या जीवावर जर कोणी उठले असेल किंवा कोणी वाईटावर असेल तर आम्ही सदैव मिलिंद नार्वेकर यांच्या पाठीशी उभे राहू. नार्वेकर यांना हवी ती सर्व मदत करायला आम्ही तयार आहोत. जर मिलिंद नार्वेकर शिंदे गटामध्ये येत असतील तर आम्ही त्यांचे स्वागतच करू, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे. तसेच मिलिंद नार्वेकर हे एमसीएमध्ये सर्वाधिक मतांनी निवडून आले आहेत. त्यांचे मेरिट आणि क्रेडिट आहे, त्यांचे कौतुक केले पाहिजे. नार्वेकर यांच्यासारखी व्यक्ती जर मला सापडली असती तर मी रोज सकाळी-संध्याकाळी त्यांचे कौतुक केले असते. पण नार्वेकर यांचं कौतुक केल्यामुळे काही लोकांना भीती वाटते, असा खोचक टोला उदय सामंत यांनी लगावला.

एकनाथ शिंदे यांची राजकीय कारकीर्द घडवण्यात मोठा वाटा

मिलिंद नार्वेकर एक व्यक्ती म्हणून लोकप्रिय आहेत. मिलिंद नार्वेकरांना आमची गरज भासली तर नक्कीच आम्ही सर्वजण नार्वेकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. एक व्यक्ती म्हणून नार्वेकरांचे राजकारणापलीकडे सर्वांशी चांगले संबंध आहेत. राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलो त्यावेळी त्यांनीच माझी भेट उद्धव ठाकरे यांच्याशी करून दिली होती. इतकेच नव्हे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राजकीय कारकीर्द घडवण्यातही मिलिंद नार्वेकर यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे नार्वेकर यांचे शिंदे गटासोबतच नव्हे तर सर्वच राजकीय पक्षांसोबत चांगले संबंध आहेत, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Milind Narvekarमिलिंद नार्वेकरUday Samantउदय सामंत