शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

बाळासाहेब थोरातांचा लेटरबॉम्ब, हायकमांडला पाठवलेल्या पत्रात म्हणाले, "असंच सुरू राहिल्यास काँग्रेसमध्ये दोन गट पडतील’’ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 09:24 IST

Balasaheb Thorat: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी समाधानकारक झाली असली तरी नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष निवडून आलेल्या सत्यजित तांबेंवरून पक्षात धमासान माजलेले आहे.

मुंबई - नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी समाधानकारक झाली असली तरी नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष निवडून आलेल्या सत्यजित तांबेंवरून पक्षात धमासान माजलेले आहे. पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर अपक्ष निवडणूक लढवत सत्यजित तांबे यांनी बाजी मारली होती. या विजयानंतर सत्यजित तांबे यांनी पक्षातील राजकारणावरून नाना पटोलेंवर निशाणा साधला होता. त्यानंतर आता बाळासाहेब थोरात यांनीही लेटरबॉम्ब टाकत महाराष्ट्र काँग्रेसच्या राजकारणात खळबळ उडवली आहे. 

सत्यजित तांबेंनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे काय बोलतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले होते. दरम्यान, बाळासाहेब थोरात यांनी सत्यजित तांबेंवरून जे राजकारण झालं, व्यथित करणारं असल्याचं म्हटलं आहे. तसेच नाना पटोलेंसोबत काम करणं अशक्य झालंय, असंच सुरू राहिल्यास काँग्रेसमध्ये दोन गट पडतील, असा सूचक इशाराही बाळासाहेब थोरात यांनी पक्षश्रेष्ठींना लिहिलेल्या पत्रामधून दिल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. 

दरम्यान, प्रसारमाध्यमांशी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की, राज्यात नुकतीच विधान परिषदेची निवडणूक झाली. त्यात खूप राजकारण झालं. या निवडणुकीत सत्यजित चांगल्या मताने विजयी झाला. त्याचं आम्ही अभिनंदन करतो. मात्र या निवडणुकीत जे राजकारण झालं ते मला व्यथित करणारं आहे. त्याबाबतच्या भावना मी पक्षश्रेष्ठींना कळवल्या आहेत, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

विधानसभेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघामध्ये काँग्रेसने सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र तिथून त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत सत्यजित तांबे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना पराभूत करत विजय मिळवला होता. 

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातSatyajit Tambeसत्यजित तांबेNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेस