शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

बाळासाहेब भोळे होते, त्यांनी सत्तेसाठी तडजोड केली नाही; मनसेचा उद्धव ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 11:10 IST

बाळासाहेब ठाकरेंनी सत्तेसाठी कधीडी तडजोड केली नाही. राज ठाकरेंनीही केली नाही असं मनसेनं म्हटलं आहे.

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनाविरुद्ध मनसे असा सामना रंगल्याचं पाहायला मिळत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे(MNS Raj Thackeray) यांनी प्रखर हिंदुत्वाचा आधार घेत राजकीय सभांमधून लोकांना साद घालण्यास सुरुवात केली आहे. गुढी पाडवा मेळावा, उत्तर सभा आणि त्यानंतर औरंगाबादमध्ये झालेल्या सभेनंतर राज ठाकरे शिवसेनेचा हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जात असल्याचं सांगण्यात येत आहे. सत्तेसाठी शिवसेनेने हिंदुत्व सोडलं असा आरोप विरोधकांकडून केला जातो त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तोफ डागली होती.

उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) म्हणाले होते की, बाळासाहेब भोळे होते. त्यांना भाजपाने वेळोवेळी फसवले. हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे. त्यामुळे मी भाजपासोबत धुर्त वागत आहे. माझ्या रक्तात हिंदुत्व भिनवलं आहे. पण हिंदुत्वाच्या आडून भाजपा त्यांचे डाव साधत होते आणि बाळासाहेब त्यांच्याकडे कानाडोळा करत होते. मी तसं करणार नाही. प्रखर हिंदुत्वाच्या आधारे देशात आणि राज्यात लोकांची माथी भडकवण्याचं राजकारण सुरू आहे असा आरोप त्यांनी केला.

उद्धव ठाकरेंच्या या विधानावरून मनसे नेते डॉ. वागिश सारस्वत यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे जे बोलले ते खरे आहे. बाळासाहेब ठाकरे हिंदुह्दयसम्राट होते. त्यांचा वारसा कुणी सांभाळत नसल्याने राजसाहेब ठाकरे हा वारसा सांभाळत आहेत. तुम्ही सांभाळले असते तर ही वेळ आली नसती. बाळासाहेब ठाकरे भोळे होते तुम्ही नाही हे सत्य तुम्ही स्वीकारलं आहे. सत्तेसाठी तडजोड करणारे तुम्ही बनले आहेत. बाळासाहेब ठाकरेंनी सत्तेसाठी कधीडी तडजोड केली नाही. राज ठाकरेंनीही केली नाही. त्यामुळे बाळासाहेबांना हिंदुह्द्रयसम्राट म्हणून ओळखले जाते तर राज ठाकरेंना हिंदुजननायक संबोधले जाते असा टोला मनसेने शिवसेनेला लगावला आहे.   

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

हे विकृत, सडलेले राजकारण कदापि महाराष्ट्राची संस्कृती नव्हती. महाराष्ट्र हे कदापि मान्य करणार नाही. निवडणुकीत लोक यांचा निर्णय करतील, पण सडक्या, कुजक्या आणि नासलेल्या विचारांचा घाणेरडेपणा राजकारणात आणला, तर लोकच यांना जाब विचारतील, की कोठे नेताय महाराष्ट्र आमचा. हा आमचा महाराष्ट्र नाही. आमचा साधुसंतांचा, शिवरायांचा महाराष्ट्र असा नाहीये. असे सडके, नासके, सुडबुद्धीचे राजकारण मला किंवा महाराष्ट्राच्या जनतेला अपेक्षित नाही. तेही कशासाठी तर केवळ मला पाहिजे, या शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. लोकसत्ता आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

टॅग्स :MNSमनसेUddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरे