शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

बाळासाहेब भोळे होते, त्यांनी सत्तेसाठी तडजोड केली नाही; मनसेचा उद्धव ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 11:10 IST

बाळासाहेब ठाकरेंनी सत्तेसाठी कधीडी तडजोड केली नाही. राज ठाकरेंनीही केली नाही असं मनसेनं म्हटलं आहे.

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनाविरुद्ध मनसे असा सामना रंगल्याचं पाहायला मिळत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे(MNS Raj Thackeray) यांनी प्रखर हिंदुत्वाचा आधार घेत राजकीय सभांमधून लोकांना साद घालण्यास सुरुवात केली आहे. गुढी पाडवा मेळावा, उत्तर सभा आणि त्यानंतर औरंगाबादमध्ये झालेल्या सभेनंतर राज ठाकरे शिवसेनेचा हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जात असल्याचं सांगण्यात येत आहे. सत्तेसाठी शिवसेनेने हिंदुत्व सोडलं असा आरोप विरोधकांकडून केला जातो त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तोफ डागली होती.

उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) म्हणाले होते की, बाळासाहेब भोळे होते. त्यांना भाजपाने वेळोवेळी फसवले. हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे. त्यामुळे मी भाजपासोबत धुर्त वागत आहे. माझ्या रक्तात हिंदुत्व भिनवलं आहे. पण हिंदुत्वाच्या आडून भाजपा त्यांचे डाव साधत होते आणि बाळासाहेब त्यांच्याकडे कानाडोळा करत होते. मी तसं करणार नाही. प्रखर हिंदुत्वाच्या आधारे देशात आणि राज्यात लोकांची माथी भडकवण्याचं राजकारण सुरू आहे असा आरोप त्यांनी केला.

उद्धव ठाकरेंच्या या विधानावरून मनसे नेते डॉ. वागिश सारस्वत यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे जे बोलले ते खरे आहे. बाळासाहेब ठाकरे हिंदुह्दयसम्राट होते. त्यांचा वारसा कुणी सांभाळत नसल्याने राजसाहेब ठाकरे हा वारसा सांभाळत आहेत. तुम्ही सांभाळले असते तर ही वेळ आली नसती. बाळासाहेब ठाकरे भोळे होते तुम्ही नाही हे सत्य तुम्ही स्वीकारलं आहे. सत्तेसाठी तडजोड करणारे तुम्ही बनले आहेत. बाळासाहेब ठाकरेंनी सत्तेसाठी कधीडी तडजोड केली नाही. राज ठाकरेंनीही केली नाही. त्यामुळे बाळासाहेबांना हिंदुह्द्रयसम्राट म्हणून ओळखले जाते तर राज ठाकरेंना हिंदुजननायक संबोधले जाते असा टोला मनसेने शिवसेनेला लगावला आहे.   

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

हे विकृत, सडलेले राजकारण कदापि महाराष्ट्राची संस्कृती नव्हती. महाराष्ट्र हे कदापि मान्य करणार नाही. निवडणुकीत लोक यांचा निर्णय करतील, पण सडक्या, कुजक्या आणि नासलेल्या विचारांचा घाणेरडेपणा राजकारणात आणला, तर लोकच यांना जाब विचारतील, की कोठे नेताय महाराष्ट्र आमचा. हा आमचा महाराष्ट्र नाही. आमचा साधुसंतांचा, शिवरायांचा महाराष्ट्र असा नाहीये. असे सडके, नासके, सुडबुद्धीचे राजकारण मला किंवा महाराष्ट्राच्या जनतेला अपेक्षित नाही. तेही कशासाठी तर केवळ मला पाहिजे, या शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. लोकसत्ता आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

टॅग्स :MNSमनसेUddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरे