शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

बाळासाहेब भोळे होते, त्यांनी सत्तेसाठी तडजोड केली नाही; मनसेचा उद्धव ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 11:10 IST

बाळासाहेब ठाकरेंनी सत्तेसाठी कधीडी तडजोड केली नाही. राज ठाकरेंनीही केली नाही असं मनसेनं म्हटलं आहे.

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनाविरुद्ध मनसे असा सामना रंगल्याचं पाहायला मिळत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे(MNS Raj Thackeray) यांनी प्रखर हिंदुत्वाचा आधार घेत राजकीय सभांमधून लोकांना साद घालण्यास सुरुवात केली आहे. गुढी पाडवा मेळावा, उत्तर सभा आणि त्यानंतर औरंगाबादमध्ये झालेल्या सभेनंतर राज ठाकरे शिवसेनेचा हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जात असल्याचं सांगण्यात येत आहे. सत्तेसाठी शिवसेनेने हिंदुत्व सोडलं असा आरोप विरोधकांकडून केला जातो त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तोफ डागली होती.

उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) म्हणाले होते की, बाळासाहेब भोळे होते. त्यांना भाजपाने वेळोवेळी फसवले. हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे. त्यामुळे मी भाजपासोबत धुर्त वागत आहे. माझ्या रक्तात हिंदुत्व भिनवलं आहे. पण हिंदुत्वाच्या आडून भाजपा त्यांचे डाव साधत होते आणि बाळासाहेब त्यांच्याकडे कानाडोळा करत होते. मी तसं करणार नाही. प्रखर हिंदुत्वाच्या आधारे देशात आणि राज्यात लोकांची माथी भडकवण्याचं राजकारण सुरू आहे असा आरोप त्यांनी केला.

उद्धव ठाकरेंच्या या विधानावरून मनसे नेते डॉ. वागिश सारस्वत यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे जे बोलले ते खरे आहे. बाळासाहेब ठाकरे हिंदुह्दयसम्राट होते. त्यांचा वारसा कुणी सांभाळत नसल्याने राजसाहेब ठाकरे हा वारसा सांभाळत आहेत. तुम्ही सांभाळले असते तर ही वेळ आली नसती. बाळासाहेब ठाकरे भोळे होते तुम्ही नाही हे सत्य तुम्ही स्वीकारलं आहे. सत्तेसाठी तडजोड करणारे तुम्ही बनले आहेत. बाळासाहेब ठाकरेंनी सत्तेसाठी कधीडी तडजोड केली नाही. राज ठाकरेंनीही केली नाही. त्यामुळे बाळासाहेबांना हिंदुह्द्रयसम्राट म्हणून ओळखले जाते तर राज ठाकरेंना हिंदुजननायक संबोधले जाते असा टोला मनसेने शिवसेनेला लगावला आहे.   

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

हे विकृत, सडलेले राजकारण कदापि महाराष्ट्राची संस्कृती नव्हती. महाराष्ट्र हे कदापि मान्य करणार नाही. निवडणुकीत लोक यांचा निर्णय करतील, पण सडक्या, कुजक्या आणि नासलेल्या विचारांचा घाणेरडेपणा राजकारणात आणला, तर लोकच यांना जाब विचारतील, की कोठे नेताय महाराष्ट्र आमचा. हा आमचा महाराष्ट्र नाही. आमचा साधुसंतांचा, शिवरायांचा महाराष्ट्र असा नाहीये. असे सडके, नासके, सुडबुद्धीचे राजकारण मला किंवा महाराष्ट्राच्या जनतेला अपेक्षित नाही. तेही कशासाठी तर केवळ मला पाहिजे, या शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. लोकसत्ता आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

टॅग्स :MNSमनसेUddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरे