साई मंदिरात पाण्याच्या बाटल्यांनाही बंदी
By Admin | Updated: June 20, 2014 02:36 IST2014-06-20T02:36:59+5:302014-06-20T02:36:59+5:30
जगाला मानवतेचा संदेश देणा:या साईबाबांच्या दरबारात आता मोबाइल नेणो सोपे आहे, मात्र पिण्याच्या पाण्याची बाटली नेणो संवेदनशील ठरत आह़े

साई मंदिरात पाण्याच्या बाटल्यांनाही बंदी
>शिर्डी (जि़ अहमदनगर) : जगाला मानवतेचा संदेश देणा:या साईबाबांच्या दरबारात आता मोबाइल नेणो सोपे आहे, मात्र पिण्याच्या पाण्याची बाटली नेणो संवेदनशील ठरत आह़े मंदिरातील दर्शन रांगेत पाण्याच्या बाटल्या आढळून आल्याने जवळपास 13 कंत्रटी सुरक्षा कर्मचा:यांना आठ दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आह़े
9 जून रोजी प्रभारी कार्यकारी अधिकारी म्हणून शिर्डीचे प्रांताधिकारी कुंदन सोनवणो यांनी पदभार स्वीकारला़ पहिल्याच दिवशी मंदिरात गेल्यानंतर त्यांना दर्शन रांगेत पाण्याच्या बाटल्या आढळून आल्या़ याची गंभीर दखल घेत त्यांनी दर्शनबारीतील पाच व मंदिरातील आठ महिला रक्षकांवर कारवाईचे आदेश दिल़े आदेशाची तब्बल नऊ दिवसांनी अंमलबजावणी करत कामगार विभागाच्या सूचनेवरून ठेकेदाराने संबंधित कर्मचा:यांना तोंडी आदेशाने गुरुवारी आठ दिवसांसाठी घरचा रस्ता दाखवला़ तर सहा कायम कर्मचा:यांना कारणो दाखवा नोटिसा बजावल्या़
एकीकडे आयबीसारख्या सुरक्षा यंत्रणांनी मंदिरात मोबाइल आणण्यावर प्रतिबंध घातलेला असताना मंदिर परिसरात सररास मोबाइल आणले जातात़ मात्र पाण्यासारख्या जीवनावश्यक वस्तूवर प्रतिबंध घातले जातात़दर्शनबारीत लहान मुले, वृद्धांना पाण्याची गरज असत़े अनेक भाविक पाण्याअभावी कासावीस होतात, भोवळ येऊन पडतात़
गर्दीत जेव्हा दर्शन रांगा शहरात लांबवर जातात तेव्हा उन्हातान्हात भाविकांना अव्वाच्या सव्वा दराने पाण्याच्या बाटल्या विकत घ्याव्या लागतात़ तेव्हा संस्थानची यंत्रणा सावली तर दूर पाण्याचीही सोय करत नाही़ या बाबींकडेही प्रशासनाने लक्ष देण्याची आवश्यकता कोते यांनी व्यक्त केली आह़े (वार्ताहर)
असा आहे दुटप्पीपणा
वास्तविक दर्शनबारीत संस्थान पाण्याच्या बाटल्यांची विक्री करत़े त्यानंतर शंभर पावलांवर सुरक्षारक्षक या बाटल्या पुन्हा जमा करून घेतात़ एकीकडे दर्शनबारीत बाटल्यांची विक्री करायची व भाविक त्या बाटल्या घेऊन मंदिरात आले तर सुरक्षारक्षकांवर कारवाई करायची, संस्थानचा हा दुटप्पीपणा असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष कैलास कोते यांनी केला आह़े