शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

गडकरी साहेब ‘या’ अधिकाऱ्यांना घरी पाठवा; पुणे-सातारा रस्त्याची दुरावस्था तरी ‘टोल’धाड कायम

By प्रविण मरगळे | Updated: October 28, 2020 12:25 IST

आता पुणे-सातारा रोडच्या दुरावस्थेबाबत प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. याबाबत पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना ईमेलद्वारे पत्र पाठवलं आहे

प्रविण मरगळे

मुंबई – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नव्या इमारतीचं उद्धाटन करण्यात आलं. परंतु या इमारतीच्या बांधकामाला तब्बल ९ वर्ष विलंब झाल्याने गडकरी अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले. २०११ मध्ये या इमारतीच्या बांधकामाची निविदा निघाली मात्र दोनशे अडीचशे कोटींचे काम नऊ वर्षांनी पूर्ण झाल्यानं गडकरींनी त्यांच्या शैलीत अधिकाऱ्यांना फटकारलं.

नितीन गडकरींच्या याच मुद्द्यावरुन आता पुणे-सातारा रोडच्या दुरावस्थेबाबत प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. याबाबत पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना ईमेलद्वारे पत्र पाठवलं आहे. या पत्रात म्हटलंय की, NHAI च्या दिल्लीतील इमारतबांधणीस ९ वर्षे लागल्याबद्दल संताप व्यक्त करुन यासाठी जबाबदार अधिकार्‍यांना घरी पाठवण्याच्या आपल्या मनोदयाचे स्वागतच, अशीच कारवाई पुणे सातारा रस्त्याचे काम १० वर्षे रखडल्याबद्ल महाराष्ट्रातील NHAI च्या अधिकाऱ्यांवरही करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.  

पुणे सातारा राष्ट्रीय महामार्ग चार पदरी होता, त्याच्या सहापदरीकरणाचे काम १ ऑक्टोबर २०१० रोजी सुरू झाले ज्याला आज १० वर्षे  पूर्ण  होऊन गेली आहेत. मूळ कंत्राटाप्रमाणे हे काम ३१ मार्च २०१३ पर्यंत संपणे अपेक्षित होते,  मात्र काम अद्याप सुरूच आहे. NHAI ने या कामाला सातत्याने मुदतवाढ देण्याशिवाय काहीही केलेले नाही, या अपूर्ण कामामुळे गेल्या १० वर्षात या रस्त्यावर शेकडो अपघात झाले, डझनावारी निष्पाप नागरिकांचा बळी गेला,  वाहतूक कोंडी मुळे हजारो कोटी रुपयांचे बहुमुल्य इंधन वाया गेले आणि लक्षावधी नागरिकांचे कोट्यावधी कामाचे तास वाया गेले, मात्र याची खेदखंत ना कंत्राटदाराला ना NHAI ला अशा शब्दात वेलणकर यांनी नाराजी 'लोकमत ऑनलाइन'शी बोलताना व्यक्त केली आहे.

तसेच निर्लज्ज पणाची कमाल अशी की NHAI दरवर्षी इमानेइतबारे कंत्राटदाराला टोलचे दर मात्र वाढवून देत आहे.  गडकरी साहेब आपणसुद्धा गेल्या सहा वर्षात या कामातील दिरंगाईबद्दल तीन वेळा असंतोष प्रकट केला आहे. NHAI च्या दिल्लीतील इमारतबांधणीस ९ वर्षे लागल्याबद्दल संताप व्यक्त करुन दिरंगाईस जबाबदार अधिकाऱ्यांना  घरी पाठवण्याचा मनोदय जाहीर केला आहे. हाच न्याय लावून अशीच कारवाई पुणे सातारा रस्त्याचे काम १० वर्षे रखडल्याबद्ल महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवरही करून त्यांना घरी पाठवावे अशी मागणी पत्रात केली आहे.

टॅग्स :Puneपुणेhighwayमहामार्गSatara areaसातारा परिसर