शहरं
Join us  
Trending Stories
1
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
2
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
3
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
4
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
5
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
6
इतकी मोठी झाली उर्मिला-आदिनाथ कोठारेची लेक जिजा, दिसायला आहे आईची कार्बन कॉपी
7
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
8
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
9
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
10
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
11
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
12
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
13
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
14
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
15
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
16
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
17
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
18
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
19
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
20
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...

अपारंपरिक ऊर्जा निर्मितीत महाराष्ट्र पिछाडीवर, गेल्या तीन वर्षांतील आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 07:01 IST

महाराष्ट्राकडे अतिरिक्त वीज उपलब्ध असून, राज्यात कुठेही भारनियमन केले जात नसल्याचा दावा महावितरणकडून केला जात असतानाच, नवीन आणि अपारंपरिक ऊर्जा मंत्रालय व भारतीय विंड टर्बाइन उत्पादक संघटनेकडील माहितीनुसार, गेल्या तीन आर्थिक वर्षामध्ये महाराष्ट्र अपारंपरिक ऊर्जेच्या क्षेत्रात मागे पडला आहे.

मुंबई - महाराष्ट्राकडे अतिरिक्त वीज उपलब्ध असून, राज्यात कुठेही भारनियमन केले जात नसल्याचा दावा महावितरणकडून केला जात असतानाच, नवीन आणि अपारंपरिक ऊर्जा मंत्रालय व भारतीय विंड टर्बाइन उत्पादक संघटनेकडील माहितीनुसार, गेल्या तीन आर्थिक वर्षामध्ये महाराष्ट्र अपारंपरिक ऊर्जेच्या क्षेत्रात मागे पडला आहे. तुलनेने आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक आणि तामिळनाडू ही राज्ये महाराष्ट्रापेक्षा पुढे आहेत. या सर्व राज्यांमध्ये हरित ऊर्जेची वार्षिक वाढ किमान ४.५ टक्के ते कमाल ४३.५ टक्के आहे, तर महाराष्ट्रात हे प्रमाण ०.४ टक्के ते कमाल २.१ टक्के आहे.मोदी सरकारने २०२२ पर्यंत १७५ गिगावॅट इतक्या अपारंपरिक ऊर्जेच्या उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र, या उद्दिष्टाच्या दिशेने फार कमी वाटचाल झाली आहे. विश्वसनीय सूत्रांकडील माहितीनुसार, महाराष्ट्रात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे; कारण राज्य विद्युत विकास महामंडळ आणि आणि पवन ऊर्जा उत्पादक यांच्यात गेले दहा महिने वाद सुरू आहेत. महामंडळाने पवन ऊर्जेचे दर २.५२ रुपये प्रति युनिट असे ठरविले आहेत. मात्र, ऊर्जा खरेदीच्या सरासरी दरानुसारच आपल्यास किंमत मिळावी, अशी मागणी पवन ऊर्जा उत्पादकांची आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार २.५२ रुपये प्रति युनिट हे दर परवडण्याजोगे नाहीत.सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले नवीन टर्बाइन हे उच्च क्षमतेची ऊर्जा निर्माण करू शकतात. तथापि, त्यांचा खर्चही जास्त असतो. त्यामुळे हे दर परवडू शकत नाहीत. पवन ऊर्जेच्या जुन्या निर्मिती केंद्रामध्ये अत्याधुनिक टर्बाइन आणि ब्लेड यांचा वापर करावा लागणार आहे. त्यासाठी धोरणांमध्ये बदल आवश्यक आहे. ५०० मेगावॅट पवन ऊर्जा निर्माण करणारी केंद्रे राज्यात १३ वर्षांपूर्वी उभारण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्यासाठी तीन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली. सध्याच्या परिस्थितीत ५०० मेगावॅट पवन ऊर्जेचे टर्बाइन उभे करायचे झाल्यास, त्यासाठी साडेचार हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आवश्यक आहे.‘नफा कमविणे अशक्य’पवन ऊर्जेचे दर ठरविताना प्रकल्पांचा घसारा, प्रकल्पांचा खर्च, कर्जचा बोजा, कॅपॅसिटी युटिलायझेशन फॅक्टर, ऊर्जा निर्मितीचे चक्र या बाबींचा विचार आयोगाने केला नसल्याने ऊर्जानिर्मिती करणे तोट्यात जात आहे. ओपन एक्सेसबाबत सरकारी संस्थांची धोरणे पुरेशी स्पष्ट नाहीत. या सर्व घटकांमुळेच उत्पादकांना व्यवसाय करणे, नफा कमविणे अशक्य झाले असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र