शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

सहकार क्षेत्रात राज्य माघारले! सूतगिरण्यांचे हाल, बंद साखर कारखान्यांची संख्या वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2018 4:29 AM

सहकार क्षेत्रात राज्य माघारल्याचे चित्र राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात समोर आले आहे. साखर कारखाने बंद पडणे सुरूच असताना सहकारी दूध संस्थांची संख्या घटली आहे. तर सूतगिरण्यांची दुरावस्थाही संपलेली नाही.

- विशेष प्रतिनिधीमुंबई -  सहकार क्षेत्रात राज्य माघारल्याचे चित्र राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात समोर आले आहे. साखर कारखाने बंद पडणे सुरूच असताना सहकारी दूध संस्थांची संख्या घटली आहे. तर सूतगिरण्यांची दुरावस्थाही संपलेली नाही.२०१५ मध्ये राज्यात उत्पादन सुरू असलेले साखर कारखाने ९९ इतके होते. आज ८७ कारखान्यांमध्येच उत्पादन सुरु आहे. २०१६ मध्ये राज्यातील सहकारी दूध संस्थांची संख्या १४ हजार ९२१ होती ती २०१७ मध्ये ११ हजार ५९७ इतकी खाली आली. सभासद संख्याही ११.६ लाखावरून ९.१५ लाख इतकी घसरली. तोट्यातील संस्थांची संख्या मात्र कमी झाली. २०१६ मध्ये हा आकडा ५ हजार ६१२ इतका होता तो पुढल्या वर्षी ४९७३ झाला.सहकारी दूध संघांचा विचार करता तोट्यातील संघांची संख्या २१६ च्या तुलनेने (२५) ती २०१७ मध्ये (२१) कमी झाली. सहकारी हातमाग उद्योगाचा तोटा २०१६ मध्ये ३.८९ कोटी इतका होता तो पुढील वर्षी ६.१ कोटी रुपयांवर गेला.कर्जदार शेतकरी वाढलेकृषी कर्जाची व्याप्ती वाढवून त्याचा लाभ अधिकाधिक शेतकºयांना देण्याची भूमिका राज्य सरकारने सातत्याने मांडलेली आहे. तथापि, प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांच्या माध्यमातून कर्ज घेणाºया शेतकºयांच्या एकूण संख्येत २.४ टक्के इतकीच वाढ झाली आहे.2017मध्ये प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांनी अल्प व अत्यल्प भूधारक शेतकºयांना वितरितकेलेल्या कर्जात6.4%वाढ झाली.सहकारी दूध संस्थांपैकी ४२.९ टक्के तोट्यात होत्या तर २८.४ टक्के सहकारी दूध संघ तोट्यात होते.सहकारी यंत्रमागांचा तोटा ११.२७ कोटींवरून १३.०९ कोटींवर गेला. तोट्यातील सूतगिरण्यांची संख्या २०१६ मध्ये ६० होती नंतरच्या वर्षी ती ६३ झाली. सहकारी सूतगिरण्यांचा तोटा २०१६ मध्ये १५९४ कोटी रुपये इतका होता. नंतरच्या वर्षी तो १९७० कोटी रुपयांवर गेला.राज्यात एकूण सहकारी संस्थांची संख्याही कमी होताना दिसते. २०१५ मध्ये ती २ लाख २५ हजार ७२१ इतकी होती. २०१६ मध्ये ती १ लाख ९६ हजार ९०७ इतकी झाली तर २०१७ मध्ये १ लाख ९५ हजार ३०१ पर्यंत खाली आली. सहकारी संस्थांमधील ठेवी वाढल्या अन् तोटाही कमी झाला.२०१५मधील तोटा ९२९४ कोटीरु. होता. पुढल्या वर्षी तो ९ हजार ८ कोटी इतका होता. २०१७मध्ये ८ हजार ३४४ कोटी रुपये इतका तोटा राहिला.प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था मुख्यत्वे अल्पमुदती कृषी कर्ज देतात.३१ मार्च २०१७अखेर राज्यात21089प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था होत्या. त्यातील56.3%तोट्यात होत्या.

टॅग्स :Maharashtra Budget 2018महाराष्ट्र अर्थसंकल्प २०१८