शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
3
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
4
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
5
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
6
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
7
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
8
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
9
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
11
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
12
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
13
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
14
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
15
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
16
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
17
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
18
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
19
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
20
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

बच्चू कडू १८ जुलैला मोठा निर्णय घेणार; मंत्रिपदावरचा दावा सोडणार, की...?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 11:46 IST

...तर गुवाहटीला जाण्याची वेळ आली नसती!; कडूंनी सांगितलं कारण

Bacchu Kadu on Maharashtra Ministry: महाराष्ट्रात २०२२ मध्ये एक मोठे बंड झाले. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आणि अनेक आमदारांसोबत घेत भाजपाशी हातमिळवणी केली. त्यामुळे राज्यात शिवसेनेच्या शिंदे गटाची आणि भाजपाची सत्ता प्रस्थापित झाली. त्यानंतर शिंदे गटाचे ९ आणि भाजपाचे ९ अशा १८ मंत्र्यांचा शपथविधी होऊन त्यांनी विविध खाती मिळाली. मंत्रिमंडळाचा विस्तार होईल तेव्हा इतर मंत्र्यांना संधी मिळेल असे सांगितले जात होते. पण काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचा अजित पवार गटही शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाला. त्यामुळे, 'ज्यांना संपूर्ण भाकरी मिळणार होती, त्यांना आता अर्धी भाकरी मिळेल', अशा प्रकारची प्रतिक्रिया शिंदे गटाकडून दिली जात होती. तशातच प्रहाक संघटनेचे आमदार बच्चू कडूदेखील बरेच दिवसापासून मंत्रिपदाकडे डोळे लावून बसले होते. पण आता त्यांनी मंत्रिपदावर सध्या तरी दावा सांगणार नसले तरी सरकारमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट केले.

...तर गुवाहटीला जाण्याची वेळ आली नसती!

"2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी मला सहकार्य करायला सांगितले होते. उद्धव यांनी आम्हाला मंत्रिपदाचा शब्द दिला होता आणि तो त्यांनी पाळला. त्यानंतर मी दिव्यांग मंत्रालयासाठी उद्धव यांच्याकडे शब्द टाकला होता. पण ते त्यांनी केले नाही. ते झालं असतं तर गुवाहटीला जाण्याची वेळ आली नसती. एकनाथ शिंदे यांनी मात्र मुख्यमंत्री झाल्यावर मला दिव्यांग मंत्रालय दिले. त्यामुळे मी अजिबात नाराज नाही," असे कडू म्हणाले.

१८ जुलैला निर्णय घेणार!

"शिंदे-फडणवीस सरकार आले असताना त्यांनी दिव्यांग मंत्रालयाचा विचार केला. त्यामुळे या सरकारमध्ये तीन पक्षांचे नवे समीकरण सुरू झाले असताना आज मी निर्णय घेणार होतो. काल मी 'इतनी शक्ती हमें दे न दाता' ही प्रार्थना ऐकली आणि माझा मंत्रिपदाचा दावा सोडणार होतो, पण मुख्यमंत्री शिंदे यांनी मला सांगितले की दावा सोडू नये. १७ जुलैला मला त्यांनी भेटीची वेळ दिली आहे. त्यानंतर १८ जुलैला मी निर्णय जाहीर करणार आहे," असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

नाराज नाही, उलट खुश आहे!

"मी सध्याच्या राजकीय समीकरणाने नाराज नाही, उलट मी खुश आहे. सध्याच्या सरकारमध्ये तीन पक्ष एकत्र आहेत. अशा वेळी मी अजिबात नाराज नाही. सरकार स्थिर आहे याचा मला आनंद आहे. पण आमदार वाढल्याने किती जणांना मंत्रीपदं देणार हा प्रश्नच आहे. त्यामुळे एक कार्यकर्ता म्हणून मी एकनाथ शिंदेंची डोकेदुखी कमी व्हावी या हेतूने मंत्रिपदाचा दावा सोडणार होतो. पण शिंदे, उदय सामंत आणि शंभूराज देसाई यांनी मला फोन केले. त्यामुळे मी सध्या कुठलाही निर्णय घेत नसून १७ जुलैला शिंदे यांना भेटणार आहे. त्यानंतर पुढील गोष्टी ठरवेन," असेही कडू यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूEknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtraमहाराष्ट्रDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस