शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
3
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
4
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
5
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
6
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
7
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
Ahmedabad Plane Crash Live: भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
9
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारती कोसळल्या, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
10
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
11
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
12
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
13
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
14
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
15
"...तोपर्यंत चहा उकळत राहील"; हुंड्यासाठी छळाचा आरोप, तरुणाने सासरीच सुरू केली टपरी
16
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
17
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
18
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
19
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
20
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?

बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 12:27 IST

Bachu Kadu Statement: महायुती विदर्भात ४५ पेक्षा जास्त जागा जिंकणार असल्याचा दावा करत आहे, यावर कडू यांनी त्यांनी लोकसभेतही असाच निर्धार केला होता पण यशस्वी झाले नाहीत हा गुजरात नाही, महाराष्ट्र आह, असा टोला लगावला. 

महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जोरबैठका सुरु असताना तिकडे तिसरी आघाडीही नावारुपाला येऊ लागली आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या बच्चू कडू, संभाजीराजे छत्रपती आणि प्रकाश आंबेडकर यांच्या बैठकीनंतर उद्या, गुरुवारी पुन्हा महाशक्तीची बैठक घेतली जाणार आहे, याबाबतची माहिती प्रहारचे नेते, आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे. 

यावेळी कडू यांनी महायुतीला चांगलेच फटकारे हाणले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत महाशक्ती म्हणून समोरे जाणार आहोत आणि 288 जागांवर लढणार आहोत. उद्या छत्रपती संभाजीनगर येथील बैठक झाल्यानंतर जागा वाटप ठरणार आहे, असे कडू म्हणाले. महायुती विदर्भात ४५ पेक्षा जास्त जागा जिंकणार असल्याचा दावा करत आहे, यावर कडू यांनी त्यांनी लोकसभेतही असाच निर्धार केला होता पण यशस्वी झाले नाहीत हा गुजरात नाही, महाराष्ट्र आह, असा टोला लगावला. 

 तसेच अजित पवारांच्या अर्थखात्याचा विरोध असतानाही करोडोंचा भूखंड माफक दरात चंद्रशेखर बावनकुळेंना देण्यात आल्यावरूनही कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हेतू चांगला असेल तर कधी कधी नियम बाजूला ठेवावे लागतात. परंतू, अशा कितीतरी जागा काँग्रेस आणि भाजपवाल्यांनी बळकवल्या आहेत, अशी टीका केली. 

अक्षय शिंदे एन्काउंटरवरून कडू यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी त्याचा एन्काउंटर कधी झाला याची आपल्याला कल्पना नाही. आम्ही गावाकडे राहतो, टीव्ही पाहत नाही अशी प्रतिक्रिया दिली. तसेच देवा भाऊ न्यायच्या बॅनरबाजीवरून कडू यांनी देवेंद्र फडणवीस यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पाहिले तर 75 टक्के ठाणेदार बिना पैशाचे काम करत नाहीत, अशी स्थिती आहे. महाराष्ट्र सोडा नागपूर येथील पोलीस पाहिले तर किती लोकांना त्रास देत आहेत, कशी कारवाई होते यावर एखाद्याची पीएचडी होईल असा टोला कडू यांनी लगावला. 

सरकारमधील कुठल्याही मंत्र्याचा महाराष्ट्रात वचक नाही. चारित्र्याचा दाखला मिळवण्यासाठी पोलीस 100 रुपये सुध्दा घेतात. जे चांगले पोलीस होते ते बाहेर फेकले गेले जे भ्रष्ट आहेत ते चांगल्या पोस्टवर आहेत, असा आरोप कडू यांनी केला. 

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूbadlapurबदलापूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस