शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 16:38 IST

Bachchu Kadu : एकनाथ शिंदे यांनी माझ्याशी संपर्क केला आणि निवडणुकीबाबत माहिती घेतली, असे बच्चू कडू म्हणाले.

अमरावती : राज्यात नुकतीच विधानसभेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महायुतीशी थेट लढत असलेल्या महाविकास आघाडीचा धक्कादायक पराभव झाला. तर तिसरी आघाडी उघडलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनाही पराभवाचा धक्का बसला. अचलपूर विधानसभा मतदारसंघातून बच्चू कडू यांचा पराभव झाला. दरम्यान, पराभवानंतर एकनाथ शिंदे यांचा फोन आला होता, त्यांनी विचारपूस केली, असे बच्चू कडू यांनी सांगितले. 

एकनाथ शिंदे यांनी माझ्याशी संपर्क केला आणि निवडणुकीबाबत माहिती घेतली, असे बच्चू कडू म्हणाले. तसेच, विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर मला खूप कॉल आले, त्यामुळे आम्ही जनतेकडून अभिप्राय घेऊन आम्ही लोकांसमोर जाणार आहोत. गेल्या २० वर्षात लाखांपेक्षा अधिक लोकांच्या आम्ही शस्त्रक्रिया केल्या आहेत, कामात आम्ही महाराष्ट्रात अव्वल आहोत. पण, मुस्लिमांचा फतवा आणि कंटेंगे तो बटेंगे, यामुळे आमचा सेवेचा झेंडा हरला आहे, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.

दरम्यान, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्याने अमरावती जिल्ह्यातील राणा आणि कडू यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आला आहे. राणा दाम्पत्याने बच्चू कडूंना पाडण्यासाठी काम केल्याने बच्चू कडू यांचा पराभव झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, माझ्या पराभवाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न राणांनी करू नये, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. मला पाडण्याची राणांची लायकी नाही, अशी घणाघाती टीका बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यांवर केली. 

माझा पराभव त्यांनी करावा, एवढी राणा दाम्पत्याची औकाद नाही, असे म्हणत कोणताही मतदारसंघ निवडा तुम्ही बिगर पार्टीचे आणि मी बिगर पार्टीचा, असे थेट आव्हान बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्याला दिले. तसेच, व्हीएमच्या जागी बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या आणि आजमावून घ्या. खरे मर्द असाल तर पुन्हा निवडणूक घ्या, आत्ताच सांगावं राणांनी पाच वर्षे कशासाठी थांबता, अशा शब्दांत बच्चू कडू यांनी रवी राणा यांच्यावर निशाणा साधत आव्हान दिले आहे.

बच्चू हटाव हा नारा लोकांनीच दिला - रवी राणाआम्हाला श्रेय घेण्याची गरज नाही, लोकांनी त्यांना हटवलं आहे. बच्चू हटाव हा नारा लोकांनीच दिला, असे म्हणत रवी राणा यांनी बच्चू कडूंवर हल्लाबोल केला. बच्चू कडू म्हणाले होते की, मुख्यमंत्री होईन पण त्यांनी आता बोलणे बंद करायला हवं. पाच वर्षानंतर मी बच्चू कडू यांचे आव्हान स्वीकारेन, ते सांगतील तिथे मी उभा राहीन, असे सांगत बच्चू कडू यांचे आव्हान रवी राणा यांनी स्वीकारले आहे.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूRavi Ranaरवी राणाnavneet kaur ranaनवनीत कौर राणाAmravatiअमरावतीachalpur-acअचलपूरEknath Shindeएकनाथ शिंदे