शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

'नेत्यांची दिवसाढवळ्या हत्या होणं म्हणजे महाराष्ट्रातील गृहखातं फेल'; अजितदादांच्या आमदाराने देवेंद्र फडणवीसांच्या खात्याला फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2024 10:46 IST

Baba Siddique : माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची काल रात्री हत्या झाल्याची माहिती समोर आली.

Baba Siddique ( Marathi News ) : काल माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची हत्या झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली. या घटनेनंतर राज्यात खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. बाबा सिद्दिकी यांनी काही महिन्यापूर्वीच राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला होता. त्यांच्या हत्येनंतर आता राष्ट्रवादीतील अजित पवार गटातील नेत्यांनीही प्रतिक्रिया दिली आहे, आमदार अमोल मिटकरी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह खात्याला फटकारलं आहे. 

Rahul Gandhi : "महाराष्ट्रातील कायदा, सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली; सरकारने जबाबदारी स्वीकारली पाहिजे"

"एका आठवड्यात राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांच्या हत्या झाल्या. बाबा सिद्दिकी मोठे नेते होते.पंधरा दिवसापूर्वी त्यांना धमकी आली होती. यानंतर त्यांनी संरक्षणाची मागणी केली होती. मात्र त्यांना सुरक्षा व्यवस्था न पुरवल्याने त्यांची हत्या झाली. आज तीन आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीने हे भयंकर आहे. तितकच मुंबईच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे भयंकर आहे. सामान्य व्यक्तीबाबत असं घडलं तर आपण समजू शकतो पण, माजी मंत्री राहिलेल्या व्यक्तीची हत्या होणं म्हणजे गृहखात्याचं हे फेल्युअर आहे का? असा प्रश्न व्हायला वाव मिळतो, असं आमदार अमोल मिटकरी म्हणाले.

"या घटनेल मुंबई पोलिसच जबाबदार आहेत. मुंबई पोलिसांनी गांभीर्याने घेतले असते तर ही घटना झाली नसती. मात्र आज झालेली घटना राष्ट्रवादीसाठी मोठी घटना आहे. अजितदादांच्या विश्वासातील मित्र पक्षाने आज गमावला आहे. पोलिसांनी आता बिश्नोई गँगच्या दिशेने तपास सुरू केला आहे. बाबा सिद्दीकी सलमान खान आणि शाहरुख खान यांच्या परिवाराचे एक घटक होते. सलमान खान यांनाही तशी धमकी आली होती, त्या पद्धतीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे, असंही मिटकरी म्हणाले.  

राहुल गांधी यांनी केली पोस्ट

राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "बाबा सिद्दीकीजी यांचं निधन धक्कादायक आणि दुःखदायक आहे. या कठीण काळात माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबासोबत आहेत. या भीषण घटनेने महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असल्याचं दिसून येत आहे. सरकारने याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि न्याय मिळाला पाहिजे" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Baba Siddiqueबाबा सिद्दिकीAjit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAmol Mitkariअमोल मिटकरी