शहरं
Join us  
Trending Stories
1
'ठाकरे बंधूंचा वचननामा ४ जानेवारीला प्रसिद्ध करणार, नंतर एवढ्या संयुक्त सभा होणार', संजय राऊत यांनी दिली माहिती 
2
'AB फॉर्म'चा झोल केला! भाजपच्या बंडखोर उमेदवाराने पक्षालाच गंडवलं, अमित साटमांचे थेट अधिकाऱ्यालाच पत्र
3
सिगरेट, पान मसाला, तंबाखू महागणार, नवीन कर आणि सेस लागू होणार; १ फेब्रुवारीपासून किंमत वाढणार? जाणून घ्या
4
आजपासून 'भारत टॅक्सी'ची सुरुवात; स्वस्त प्रवास अन् 'नो सर्ज प्रायसिंग'ने प्रवाशांना मिळणार दिलासा
5
दोन वर्षांत १४ लाख पाकिस्तान्यांनी देश सोडला! कारण काय?
6
१ वर्षासाठी एफडीमध्ये १ लाख रुपये गुंतवून तुम्हाला किती परतावा मिळेल? कोणत्या बँकेत किती रिटर्न, पाहा
7
ईडीने धनकुबेराच्या घरीच छापा मारला; रोकड सोडा, दागिनेच एवढ्या कोटींचे सापडले की... घबाड पाहून अधिकारीही अवाक्
8
दूधात मिसळलं नळाचं पाणी, तेच ठरलं विष; ५ महिन्यांच्या अव्यानचा मृत्यू, १० वर्षांनी झालेला मुलगा
9
नवे वर्ष २०२६: आयुष्यातील नकारात्मकता दूर करण्यासाठी या वर्षात करा 'हे' ५ उपाय!
10
मुंबईकरांना वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य सेवा मोफत; ‘आप’ने दिली गॅरंटी, जाहीरनामा केला प्रसिद्ध
11
"भाजपच्या सांगण्यावरुनच कृपाशंकर यांनी..."; उत्तर भारतीय महापौर करण्याच्या विधानावरुन संजय राऊत आक्रमक
12
Success Story: कपडे धुवून कोट्यधीश बनली 'ही' व्यक्ती, एकेकाळी रिक्षाचं भाडं देण्यासही नव्हते पैसे, कसा होता आजवरचा प्रवास
13
शिंदेसेनेच्या २, उद्धवसेना, काँग्रेसच्या प्रत्येकी एका उमेदवाराचा अर्ज रद्द, ७१९ उमेदवार रिंगणात
14
विमानाचं तिकीट आता खिशाला परवडणार? विमान इंधनाच्या किमतीत मोठी कपात; पाहा काय आहेत नवीन दर?
15
तो काळ परत येणार नाही...! PCO चा बुथ ते 3G डोंगलचा वेग; स्मार्टफोन आणि ५जीच्या स्पीडने तुम्ही विसरलात का...?
16
प्रवाशांनो… २४ ट्रेनची वेळ बदलली, ६२ ट्रेनचा वेग वाढला; पुणे, मुंबईतील अनेक ट्रेनचा समावेश!
17
अर्ज छाननीचाही ‘रात्रीस खेळ चाले’; मुंबईत १६७ अर्ज बाद, भाईंदरमध्ये ६०० अर्ज वैध
18
'धुरंधर'च्या यशानंतरही रणवीर सिंह गायब? आता दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, 'पाजी खूप...'
19
बंडखोरी, नाराजी शमविण्यासाठी ठाकरे बंधूंचे नेते आता मैदानात
20
LPG Price Hike: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

'नेत्यांची दिवसाढवळ्या हत्या होणं म्हणजे महाराष्ट्रातील गृहखातं फेल'; अजितदादांच्या आमदाराने देवेंद्र फडणवीसांच्या खात्याला फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2024 10:46 IST

Baba Siddique : माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची काल रात्री हत्या झाल्याची माहिती समोर आली.

Baba Siddique ( Marathi News ) : काल माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची हत्या झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली. या घटनेनंतर राज्यात खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. बाबा सिद्दिकी यांनी काही महिन्यापूर्वीच राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला होता. त्यांच्या हत्येनंतर आता राष्ट्रवादीतील अजित पवार गटातील नेत्यांनीही प्रतिक्रिया दिली आहे, आमदार अमोल मिटकरी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह खात्याला फटकारलं आहे. 

Rahul Gandhi : "महाराष्ट्रातील कायदा, सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली; सरकारने जबाबदारी स्वीकारली पाहिजे"

"एका आठवड्यात राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांच्या हत्या झाल्या. बाबा सिद्दिकी मोठे नेते होते.पंधरा दिवसापूर्वी त्यांना धमकी आली होती. यानंतर त्यांनी संरक्षणाची मागणी केली होती. मात्र त्यांना सुरक्षा व्यवस्था न पुरवल्याने त्यांची हत्या झाली. आज तीन आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीने हे भयंकर आहे. तितकच मुंबईच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे भयंकर आहे. सामान्य व्यक्तीबाबत असं घडलं तर आपण समजू शकतो पण, माजी मंत्री राहिलेल्या व्यक्तीची हत्या होणं म्हणजे गृहखात्याचं हे फेल्युअर आहे का? असा प्रश्न व्हायला वाव मिळतो, असं आमदार अमोल मिटकरी म्हणाले.

"या घटनेल मुंबई पोलिसच जबाबदार आहेत. मुंबई पोलिसांनी गांभीर्याने घेतले असते तर ही घटना झाली नसती. मात्र आज झालेली घटना राष्ट्रवादीसाठी मोठी घटना आहे. अजितदादांच्या विश्वासातील मित्र पक्षाने आज गमावला आहे. पोलिसांनी आता बिश्नोई गँगच्या दिशेने तपास सुरू केला आहे. बाबा सिद्दीकी सलमान खान आणि शाहरुख खान यांच्या परिवाराचे एक घटक होते. सलमान खान यांनाही तशी धमकी आली होती, त्या पद्धतीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे, असंही मिटकरी म्हणाले.  

राहुल गांधी यांनी केली पोस्ट

राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "बाबा सिद्दीकीजी यांचं निधन धक्कादायक आणि दुःखदायक आहे. या कठीण काळात माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबासोबत आहेत. या भीषण घटनेने महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असल्याचं दिसून येत आहे. सरकारने याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि न्याय मिळाला पाहिजे" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Baba Siddiqueबाबा सिद्दिकीAjit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAmol Mitkariअमोल मिटकरी