बा विठ्ठला, पाऊस पाड रं..
By Admin | Updated: July 9, 2014 23:34 IST2014-07-09T23:34:16+5:302014-07-09T23:34:16+5:30
‘आता अंत न पाहता भरपूर पाऊस पडू दे आणि शेतकरी राजाला दिलासा मिळू दे..,’ अशी प्रार्थना भाविकांनी प्रतिपंढरपूर समजल्या जाणा:या विठुरायाच्या चरणी केली.

बा विठ्ठला, पाऊस पाड रं..
यवत : ‘आता अंत न पाहता भरपूर पाऊस पडू दे आणि शेतकरी राजाला दिलासा मिळू दे..,’ अशी प्रार्थना भाविकांनी प्रतिपंढरपूर समजल्या जाणा:या विठुरायाच्या चरणी केली.
दौंड, हवेली व पुरंदर तालुक्यांच्या सीमेवर असलेल्या प्रतिपंढरपूर डाळिंब (बन) येथे विठ्ठलाची महापूजा पुणो जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप यांनी सप}िक केली. या वेळी शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार, भीमा-पाटस कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल, पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे, दौंड पंचायत समितीच्या सभापती उषा चव्हाण, पुणो जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा वैशाली आबणो, पुणो जिल्हा भाजपाचे अध्यक्ष नामदेव ताकवणो, उद्योजक विकास ताकवणो, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती महादेव यादव, पंचायात समिती सदस्य दत्तात्रय थोरात, कुंडलिक खुटवड, डाळिंबच्या सरपंच मंगल सुतार, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र कांचन, दौंडचे तहसीलदार उत्तम दिघे, गटविकास अधिकारी संतोष हराळे, प्रा. के. डी. कांचन, ज्ञानोबा कांचन, महादेव कांचन आदी मान्यवर उपस्थित होते.
सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास श्री विठ्ठलाच्या महापूजेला सुरुवात झाली. पहाटेपासूनच हजारो भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले होते. निसर्गरम्य परिसर असलेल्या मंदिराभोवती मोठे वनक्षेत्र आहे. परंतु यंदा दुष्काळ असल्याने परिसरातील वनराईचे सौंदर्य काहीसे कमी झाल्याचे चित्र होते. त्यामुळे पावसासाठी भाविकांनी साकडं घातले.
देवस्थान ट्रस्टच्या वतीने यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. सकाळी 11 वाजता
श्रींच्या पालखीची मिरवणूक डाळिंबगाव ते श्री विठ्ठल मंदिरदरम्यान काढण्यात आली. दुपारी 12 ते 6 वाजेर्पयत भजनाचा कार्यक्रम, दुपारी 2 ते
5 दरम्यान विविध गावाचे ढोल-लेझीम खेळ व रात्री 9 वाजता गुरुदेव दत्त भजनी मंडळ (ओझर्ड, ता.
मावळ ) यांचा भजनी भारुडाचा कार्यक्रम झाला.
सायंकाळी उशीरार्पयत दर्शनासाठी भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती. (वार्ताहर)
4डाळिंब बनातील विठ्ठल मंदिर परिसर वनराईने नटलेला असतो. यंदा दुष्काळामुळे परिसराचे सौंदर्य कमी झाल्याचे चित्र होते. मात्र, तरीही भाविकांची उपस्थिती मात्र लक्षणीय होती.
4डाळिंब मंदिरात आषाढी एकादशी दिवशी होणा:या महापूजेच्या कार्यक्रमानंतर सभामंडपात मान्यवरांची भाषणो व सत्कार होतो. परंतु, याच कालावधीत दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. यामुळे सर्वसामान्य भाविकांची अडचण होते. याकडे देवस्थान ट्रस्ट दुर्लक्ष करते. यंदाही तोच अनुभव आला. सभामंडप अपुरा पडत असूनही तेथेच सदर कार्यक्रम उरकून घेण्यात आला. याबद्दल भाविकांनी नाराजी व्यक्त केली. हा कार्यक्रम पुढील वर्षीपासून मंदिराच्या सभामंडपात न घेता बाजूच्या मंडपात घेण्याची मागणी केली आहे.
4टाळ-मृदंगाच्या गजरात यावर्षीदेखील नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळाचे श्रीमती एस़ आऱ केदारी बालकमंदिर व श्री आनंदराव कुलकर्णी इंग्लिश मीडियम स्कूल यांनी एकत्रित बालदिंडी साजरी केली़ या दिंडीमध्ये चुमकल्या विद्याथ्र्यांनी वारकरी, संतांच्या व अनेक लेखकांच्या वेशभूषा परिधान करून या दिंडी सोहळ्यात सहभाग
घेतला होता़
4दरवर्षीप्रमाणो बालकमंदिरामध्ये यावर्षी ग्रंथदिंडी, गणपती, विठ्ठलाची आरती घेऊन माऊ लींच्या घोषात हा सोहळा संपन्न झाला़ यावेळी ग्रामोन्नती मंडळाचे विश्वस्त डॉ़ विश्वास व श्रीमती नंदाताई डांगे, उपकार्याध्यक्ष डॉ़ आनंद कुलकर्णी, कार्यवाह रवींद्र पारगावकर, अशोक शहा, डॉ़ संदीप डेळे, रमेश जुन्नरकर, रत्नदीप भरवीरकर, बालकमंदिर कमिटीचे चेअरमन अरविंद मेहेर, सौ़मेहेर तसेच पालक उपस्थित होत़े सूत्रसंचालन बांगर मॅडम व कामत मॅडम यांनी केल़े चौथीच्या मुलींनी उपस्थितांचे आभार मानल़े