शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

विधान परिषदेच्या आश्वासनावर भाजपवासी झालेल्या आयारामांची कारकिर्द पणाला !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 15:46 IST

राज्यात निर्माण झालेल्या महाविकास आघाडीमुळे विधान परिषदेसाठी इच्छूक असलेल्या नेत्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे. 

मुंबई - विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग झाली. या इनकमिंगला मेगा भरती असं नावही देण्यात आलं होतं. विरोधी पक्षांचे आव्हान संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या भाजपने काठावर असलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील नेत्यांना भाजपमध्ये घेऊन आपली ताकद वाढवली. मात्र ही ताकद सत्तास्थापनेसाठी भाजपला पुरेशी ठरली नाही. मात्र जे नेते मंत्रीपदाच्या किंवा विधान परिषदेच्या आश्वासनांवर भाजपमध्ये दाखल झाले, त्यांची राजकीय कारकिर्द धोक्यात आली आहे. 

भाजपचीच सत्ता येणार असे ओपिनियन पोल आल्यानंतर एकट्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील 30 हून अधिक मोठ्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्ये अनेक विद्यमान आमदारांचा समावेश होता. तर काही नेते पक्षात मोठ्या पदावर होते. या सर्व नेत्यांना आपल्या पक्षात घेऊन भाजपने राज्यात वर्चस्व निर्माण केले होते. 

विधानसभा निवडणुकीच्या काळात भाजपने आयारामांना विधान परिषदेचे आश्वासन दिले होते. तर नाराजांना देखील हेच आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे  भाजपमधून तिकीटासाठी बंडखोरी झाली नाही. जी काही बंडखोरी झाली, ती शिवसेनेला दिलेल्या मतदारसंघात झाली होती. दरम्यान विधानसभा निवडणुकीत सबुरीने घेणाऱ्या नेत्यांना विधान परिषदेचे वेध लागले. त्यानुसार या नेत्यांची तयारी होती. यापैकी अनेक नेते दुसऱ्या पक्षातून भाजपमध्ये दाखल झालेले आहेत. मात्र राज्यात निर्माण झालेल्या महाविकास आघाडीमुळे विधान परिषदेसाठी इच्छूक असलेल्या नेत्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे. 

2020 मध्ये विधान परिषदेच्या 26 जागा रिक्त होणार आहे. शिवसेना-भाजपची युती असती तर यातील किमान 13 जागा भाजपच्या वाट्याला येणार होत्या. मात्र आता सर्वच राजकीय समिकरण बदलले आहे. याचा लाभ शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या इच्छूकांना होणार असून विधान परिषदेवर निवडून येण्याची खात्री झाली आहे. तर भाजपकडून विधान परिषदेच्या आश्वासनांवर विधानसभेत गप्प बसलेल्या नेत्यांची राजकीय कारकिर्द पणाला लागली आहे.