शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

उद्धव ठाकरेंनी राजसाहेबांना त्रास दिलाय, तो...: मनसे नेते अविनाश जाधवांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 12:30 IST

लोक निवडणुकीची वाट बघतायेत. लोकांना या गोष्टीचा संताप आहे. त्यामुळे निवडणुकीत जनता यातून सगळ्यांना उत्तर देईल असं अविनाश जाधव म्हणाले.

रत्नागिरी – ‘राजकारणाचा चिखल झालाय आता तरी साहेब एकत्र या’ असे पोस्टर्स राज्यातील विविध शहरात काही दिवसांपूर्वी झळकले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन भावांनी एकत्र यावे असं आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर मनसे-ठाकरे गटाच्या युतीच्या चर्चा सुरू झाल्या. राज-उद्धव ठाकरे एकत्र येणार का असा प्रश्न सर्वांना पडला. परंतु त्यावर दोन्ही भावांनी भाष्य करणे टाळले. परंतु मनसे नेते अविनाश जाधव यांनी केलेल्या विधानामुळे मनसे-ठाकरे गटाची युती सहज सोप्पी नाही याची प्रचिती येते.

मनसे नेते अविनाश जाधव म्हणाले की, मातोश्रीने जो राज ठाकरेंना त्रास दिलाय तो आम्ही कदापि विसरणार नाही. परंतु राज ठाकरेंनी जर उद्धव ठाकरेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला तर आम्ही त्यांच्यासोबत आहोत. जर साहेबांनी एकला चलोचा निर्णय घेतला तर आम्ही सगळेजण राज ठाकरेंच्या पाठिमागे खंबीर आहोत असं विधान त्यांनी केले आहे.

त्याचसोबत मुंबईतील आमचे ८० टक्के पदाधिकारी कोकणातले आहेत. मुंबईत मनसेला मानणारा खूप मोठा कोकणी माणसांचा वर्ग आहे. जो मुंबईत माणूस राहतो तो त्यांच्या गावातही काम करू शकतो. पुढील वर्षभरात कोकणात महाराष्ट्र नवनिर्माण सेना मजबूत झालेली दिसेल. राज ठाकरे हे रत्नागिरी, चिपळूण दौऱ्यावर आहे. मनसेला काय मिळणार हे लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या तर लोक आताच्या राजकारणाला कंटाळले आहेत. लोक निवडणुकीची वाट बघतायेत. लोकांना या गोष्टीचा संताप आहे. त्यामुळे निवडणुकीत जनता यातून सगळ्यांना उत्तर देईल असंही मनसे नेते अविनाश जाधव यांनी म्हटलं.

दरम्यान, मंत्रिमंडळाचा विस्तार किती करणार? शपथ होऊन १२ दिवस झाले तर खातेवाटप नाही. मंत्रिदालन, बंगले, वाहने भेटली. बिनखात्याचे मंत्री आहेत. कार्यालयात बसून काय काम करावे हे कुणाला माहिती नाही. हे सगळे दिशाभूल करणारे आहे. महाराष्ट्रातील जनता याला बळी पडणार नाही असेही अविनाश जाधव यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले.

टॅग्स :MNSमनसेUddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरे