शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंनी राजसाहेबांना त्रास दिलाय, तो...: मनसे नेते अविनाश जाधवांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 12:30 IST

लोक निवडणुकीची वाट बघतायेत. लोकांना या गोष्टीचा संताप आहे. त्यामुळे निवडणुकीत जनता यातून सगळ्यांना उत्तर देईल असं अविनाश जाधव म्हणाले.

रत्नागिरी – ‘राजकारणाचा चिखल झालाय आता तरी साहेब एकत्र या’ असे पोस्टर्स राज्यातील विविध शहरात काही दिवसांपूर्वी झळकले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन भावांनी एकत्र यावे असं आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर मनसे-ठाकरे गटाच्या युतीच्या चर्चा सुरू झाल्या. राज-उद्धव ठाकरे एकत्र येणार का असा प्रश्न सर्वांना पडला. परंतु त्यावर दोन्ही भावांनी भाष्य करणे टाळले. परंतु मनसे नेते अविनाश जाधव यांनी केलेल्या विधानामुळे मनसे-ठाकरे गटाची युती सहज सोप्पी नाही याची प्रचिती येते.

मनसे नेते अविनाश जाधव म्हणाले की, मातोश्रीने जो राज ठाकरेंना त्रास दिलाय तो आम्ही कदापि विसरणार नाही. परंतु राज ठाकरेंनी जर उद्धव ठाकरेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला तर आम्ही त्यांच्यासोबत आहोत. जर साहेबांनी एकला चलोचा निर्णय घेतला तर आम्ही सगळेजण राज ठाकरेंच्या पाठिमागे खंबीर आहोत असं विधान त्यांनी केले आहे.

त्याचसोबत मुंबईतील आमचे ८० टक्के पदाधिकारी कोकणातले आहेत. मुंबईत मनसेला मानणारा खूप मोठा कोकणी माणसांचा वर्ग आहे. जो मुंबईत माणूस राहतो तो त्यांच्या गावातही काम करू शकतो. पुढील वर्षभरात कोकणात महाराष्ट्र नवनिर्माण सेना मजबूत झालेली दिसेल. राज ठाकरे हे रत्नागिरी, चिपळूण दौऱ्यावर आहे. मनसेला काय मिळणार हे लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या तर लोक आताच्या राजकारणाला कंटाळले आहेत. लोक निवडणुकीची वाट बघतायेत. लोकांना या गोष्टीचा संताप आहे. त्यामुळे निवडणुकीत जनता यातून सगळ्यांना उत्तर देईल असंही मनसे नेते अविनाश जाधव यांनी म्हटलं.

दरम्यान, मंत्रिमंडळाचा विस्तार किती करणार? शपथ होऊन १२ दिवस झाले तर खातेवाटप नाही. मंत्रिदालन, बंगले, वाहने भेटली. बिनखात्याचे मंत्री आहेत. कार्यालयात बसून काय काम करावे हे कुणाला माहिती नाही. हे सगळे दिशाभूल करणारे आहे. महाराष्ट्रातील जनता याला बळी पडणार नाही असेही अविनाश जाधव यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले.

टॅग्स :MNSमनसेUddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरे