शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरेंनी राजसाहेबांना त्रास दिलाय, तो...: मनसे नेते अविनाश जाधवांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 12:30 IST

लोक निवडणुकीची वाट बघतायेत. लोकांना या गोष्टीचा संताप आहे. त्यामुळे निवडणुकीत जनता यातून सगळ्यांना उत्तर देईल असं अविनाश जाधव म्हणाले.

रत्नागिरी – ‘राजकारणाचा चिखल झालाय आता तरी साहेब एकत्र या’ असे पोस्टर्स राज्यातील विविध शहरात काही दिवसांपूर्वी झळकले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन भावांनी एकत्र यावे असं आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर मनसे-ठाकरे गटाच्या युतीच्या चर्चा सुरू झाल्या. राज-उद्धव ठाकरे एकत्र येणार का असा प्रश्न सर्वांना पडला. परंतु त्यावर दोन्ही भावांनी भाष्य करणे टाळले. परंतु मनसे नेते अविनाश जाधव यांनी केलेल्या विधानामुळे मनसे-ठाकरे गटाची युती सहज सोप्पी नाही याची प्रचिती येते.

मनसे नेते अविनाश जाधव म्हणाले की, मातोश्रीने जो राज ठाकरेंना त्रास दिलाय तो आम्ही कदापि विसरणार नाही. परंतु राज ठाकरेंनी जर उद्धव ठाकरेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला तर आम्ही त्यांच्यासोबत आहोत. जर साहेबांनी एकला चलोचा निर्णय घेतला तर आम्ही सगळेजण राज ठाकरेंच्या पाठिमागे खंबीर आहोत असं विधान त्यांनी केले आहे.

त्याचसोबत मुंबईतील आमचे ८० टक्के पदाधिकारी कोकणातले आहेत. मुंबईत मनसेला मानणारा खूप मोठा कोकणी माणसांचा वर्ग आहे. जो मुंबईत माणूस राहतो तो त्यांच्या गावातही काम करू शकतो. पुढील वर्षभरात कोकणात महाराष्ट्र नवनिर्माण सेना मजबूत झालेली दिसेल. राज ठाकरे हे रत्नागिरी, चिपळूण दौऱ्यावर आहे. मनसेला काय मिळणार हे लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या तर लोक आताच्या राजकारणाला कंटाळले आहेत. लोक निवडणुकीची वाट बघतायेत. लोकांना या गोष्टीचा संताप आहे. त्यामुळे निवडणुकीत जनता यातून सगळ्यांना उत्तर देईल असंही मनसे नेते अविनाश जाधव यांनी म्हटलं.

दरम्यान, मंत्रिमंडळाचा विस्तार किती करणार? शपथ होऊन १२ दिवस झाले तर खातेवाटप नाही. मंत्रिदालन, बंगले, वाहने भेटली. बिनखात्याचे मंत्री आहेत. कार्यालयात बसून काय काम करावे हे कुणाला माहिती नाही. हे सगळे दिशाभूल करणारे आहे. महाराष्ट्रातील जनता याला बळी पडणार नाही असेही अविनाश जाधव यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले.

टॅग्स :MNSमनसेUddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरे