शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

स्वायत्त संस्था भाषाकेंद्री होणे गरजेचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 02:04 IST

बहुजनांच्या स्वतंत्र स्वायत्त मराठी भाषाविषयक संस्था अद्याप मोठ्या प्रमाणावर स्थापन झालेल्याच नाहीत. त्या भाषेच्या, सामाजिक भाषाविज्ञानाच्या शास्त्रशुद्ध पायावर उभ्या होण्याची नितांत गरज आहे. त्याशिवाय मराठी टिकविण्यासाठी चाललेल्या प्रयत्नांमधला लोकसहभाग हा हवा तसा वाढता असणार नाही.

- श्रीपाद भालचंद्र जोशी(ज्येष्ठ साहित्यिक)मराठी भाषा व्यवहार हा अद्यापही स्वायत्त साहित्य संस्था असोत की शासनाच्या संस्था, मंडळे असोत, त्यांनी तो भाषाकेंद्री व संस्कृतीकेंद्री न करता, साहित्यकेंद्री तेवढाच राखल्याने मराठी भाषा, भाषा व्यवहार, भाषा माध्यम, भाषेचा जीवनाच्या विविध उपयोजित क्षेत्रांमध्ये मराठीचा आग्रही वापर, भाषेच्या नावावर केवळ साहित्याचे शिक्षण नव्हे, तर भाषेचे वैज्ञानिक शिक्षण, भाषा विज्ञानाचा अवलंब, भाषांच्या बोलींची समृद्धता, विविध भाषिक रूपे, संस्कृतीशी भाषेचे अंतर्निहित नाते, संस्कृती अध्ययन, संस्कृती विज्ञान हे सारे प्रत्यक्षात भाषेचे असणारे, साहित्याचे नव्हे, विविध आयाम अद्यापही मराठी भाषिक समाजापर्यंत पोहोचलेलेच नाहीत.ही भाषिक, सांस्कृतिक निरक्षरता मोठी आहे. कारण ते पोहोचविण्याची जबाबदारी असणाऱ्या शासकीय, अशासकीय यंत्रणा, संस्था, शिक्षण संस्था, प्राध्यापक, प्रशासन, शिक्षण अधिकारी इ. हे सारेच घटक या संदर्भात सारखेच अक्षम, असमर्थ तरी आहेत किंवा पूर्णपणे उदासीन तरी आहेत.या क्षेत्रातील ज्या स्वायत्त संस्थात्मक यंत्रणा आहेत, त्यांना त्यांच्या स्वत:च्याच घटनांमध्ये वर्णिलेली मूळ कार्ये करण्याऐवजी, केवळ व्यासपीठीय, उत्सवी, पुरस्कारानुवर्ती, सोहळेबाज आणि तात्कालिक स्वरूपाचीच कार्ये करत राहणे म्हणजेच मराठी भाषेचे कार्य करणे वाटते. त्यांचे हे अज्ञान दूर सारले जाण्याची गरज आहे. मात्र, ते त्यांना दूर सारायचेच नाही. त्यातच त्यांना सुख आहे, अशी स्थिती आहे. त्यांच्यातील काही धुरिणांना तर केवळ साहित्य संमेलन भरवणे, हेच तेवढे मराठी भाषेचे एकमेव संस्थात्मक काम वाटते. बाकी त्यांच्या दृष्टीने सारी रद्दी असते.या संस्थात्मक यंत्रणा मुळात निर्माण झालेल्या आहेत, त्या मराठी भाषा, संस्कृती, केवळ साहित्य नव्हे, यांच्या अभिवृद्धीसाठी. मराठीमधील महत्त्वाचे, तसेच मौलिक मराठी लेखन, पुन: केवळ साहित्य नव्हे, यास उत्तेजन देणे, त्यासाठी आवश्यक सहकार्य करणे, मिळविणे, शास्त्रीय विषयांची परिभाषा, कोश, संस्कृती, भाषाशास्त्र, सृजन, निर्मितीविषयक शास्त्रे इ.विषयांवरील ग्रंथ लिहून घेणे, प्रसिद्ध करणे आदींसह मराठी भाषा विकासाच्या आणि प्रसाराच्या मार्गातील अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करणे, मराठी भाषा बोलणाºया बृहत्समाजात अशा प्रश्नांविषयी जागृती करणे, अशा भाषाविषयक महत्त्वपूर्ण कार्यासाठी या संस्थात्मक स्वायत्त यंत्रणा निर्माण झालेल्या आहेत. याचे भान त्या त्या संस्थांच्या नेतृत्वाला, कार्यकारी मंडळालाच नसल्याने व त्यांना ते आणून देण्याची जबाबदारी घेणारा एखाद-दुसरा अपवाद सोडल्यास, जागृत सदस्य व मराठी भाषिक समाज अनुपस्थित असल्याने, मराठी भाषेच्या, भाषा म्हणून, माध्यम म्हणून, संस्कृती म्हणून चाललेल्या दुरवस्थेला हे सारेच मराठी शासनापेक्षाही अधिकच जबाबदार ठरतात.यांचीच भाषिक निरक्षरता दूर सारून त्यांचेच भाषिक प्रबोधन त्यांनीच अगोदर करून घेतल्याशिवाय अथवा ज्यांना ते करूनच घ्यायचे नाही, अशांना या यंत्रणांमधून दूर सारल्याशिवाय व या संस्थात्मक यंत्रणा ज्या कार्यासाठी निर्माण झालेल्या त्यासाठीच चालविल्याशिवाय, मराठी टिकविण्यासाठी दुसरे कोण काय करणार?या सर्व पार्श्वभूमीवर वर म्हटलेल्या संस्थांच्या बाहेरचे, गेल्या काही वर्षांत प्रस्तुत लेखकासारख्या व्यक्ती, वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळे लोक समूह, गट, समूह माध्यमांवरील गट मराठीच्या संवर्धनासाठी काम करत आहेत. चळवळ त्यामुळेच समर्थपणे उभी झाली आहे. मराठी वृत्तपत्रांनीही ती उचलून धरली आहे. नाही म्हणायला, ज्या संस्थांकडून हे होणे अपेक्षित आहे, पण होत नाही, त्यापैकी एखाद-दुसºया संस्थेचाही लक्षणीय सहभाग यात वाढला आहे, पण तो संस्थात्मक कमी आणि त्या संस्थांना अलीकडे लाभलेल्या नेतृत्वाच्या व्यक्तिगत आकांक्षांचा अधिक आहे. मराठी टिकण्या, टिकविण्यासाठी मात्र तो पुरेसा नाही. तो वाढला पाहिजे. तो संस्थात्मक अधिक असायला हवा.

टॅग्स :marathiमराठीMaharashtraमहाराष्ट्र