औरंगाबाद: बेपत्ता तीन मुलांचे मृतदेह पाझर तलावात आढळले
By Admin | Updated: May 7, 2017 12:06 IST2017-05-07T12:06:15+5:302017-05-07T12:06:15+5:30
जोगेश्वरी येथून शुक्रवारपासून घरातून गायब असलेल्या तीन शाळकरी मुलांचे प्रेत रांजगाण येथील पाझर तलावात आढळल्याने खळबळ उडाली आहे.

औरंगाबाद: बेपत्ता तीन मुलांचे मृतदेह पाझर तलावात आढळले
>ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद: जोगेश्वरी येथून शुक्रवारपासून घरातून गायब असलेल्या तीन शाळकरी मुलांचे प्रेत रांजगाण येथील पाझर तलावात
आढळल्याने खळबळ उडाली आहे. पोहण्यासाठी पाण्यात उतरल्यानंतर पाण्यात बुडून त्यांचा अंत झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रेत बाहेर काढली. ही मुले पोहण्यासाठी पाण्यात उतरल्यानंतर बुडाली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रेत बाहेर काढली. राहुल सुभाष साबळे(१४), दीपक संजय अहिरे(१३) आणि प्रकाश विजय राजपूत(१३,सर्व रा.जोगेश्वरी,वाळूज महानगर)अशी मृत मुलांची नावे आहेत. प्राप्त माहिती अशी की, शुक्रवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास खेळण्यासाठी घराबाहेर पडलेली ही तिन्ही बालमित्र नंतर घरी परतली नव्हती. परिणामी त्यांच्या पालकांनी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात राहुल, दीपक आणि प्रकाश यांचे अज्ञातांनी अपहरण केल्याची तक्रार नोंदविली होती. पोलिसांसह त्यांची पालक आणि नातेवाईक त्या बालकांचा युद्धपातळीवर शोध घेत असताना रविवारी सकाळी रांजणगाव शेणपुंजी येथील पाझर तलावात या मुलांचे प्रेत पाण्यावर तरंगताना आढळली. ही बाब परिसरातील नागरीकांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी अग्निशमन दलाासह चिमुकल्यांच्या नातेवाईकांना बोलावून घेतले. त्यानंतर तलावातून या चिमुकल्यांची प्रेत बाहेर काढण्यात आली. या मुलांचे प्रेत शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात हलविण्यात आली आहे.
पोहोण्याचा मोह ?
शुक्रवारी दुपारी चार वाजता घराबाहेर पडल्यानंतर ही चिमुकले फिरत फिरत रांजणगाव येथील तलावावर गेले असावे. तलावातील थंडगार पाणी पाहुन त्यांना पोहण्यासाठी उतरले असावे आणि पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांना जलसमाधी मिळाली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलीस अधिका-यांनी व्यक्त केला.