शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
4
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
5
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
6
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
7
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
8
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
9
आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...
10
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
11
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
12
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
13
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
14
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
15
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण
16
"त्याला उचकी आली आणि...", 'अशी ही बनवा बनवी'मधील शंतनूचं असं झालं निधन, पत्नीचा खुलासा
17
वाद-प्रतिवाद सुरू असलेल्या भारताला आज स्वीकारमंत्र अंगीकारण्याची गरज -मोरारीबापू
18
Prithvi Shaw: सपना गिल विनयभंग प्रकरणात न्यायालयाने पृथ्वी शॉला ठोठावला १०० रुपयांचा दंड!
19
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
20
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना औरंगाबाद खंडपीठाची नोटीस

By admin | Updated: August 12, 2016 20:04 IST

शैक्षणिक वर्षात नवीन शाळा आणि दर्जावाढीसाठीच्या प्रलंबित प्रस्तावांवरील सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असताना शिक्षणमंत्र्यांनी ते प्रस्ताव अमान्य केले.

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 12 - २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात नवीन शाळा आणि दर्जावाढीसाठीच्या प्रलंबित प्रस्तावांवरील सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असताना शिक्षणमंत्र्यांनी ते प्रस्ताव अमान्य केले. याउलट २०१६-१७ मध्ये अर्ज केलेल्या व पात्र ठरलेल्या सर्व प्रस्तावांना मान्यता दिली. शिक्षणमंत्र्यांच्या या निर्णयास आव्हान देणाऱ्या याचिकेच्या अनुषंगाने औरंगाबाद खंडपीठाने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासह इतर प्रतिवाद्यांना नोटिसा बजावण्याचा आदेश दिला आहे. पुढील सुनावणी १८ आॅगस्ट रोजी होणार आहे. शिक्षणमंत्र्यांनी अमान्य केलेले जून २०१४ पासूनचे बहुतांश प्रस्ताव हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाशी संबंधित लोकांचे आहेत. हा पूर्वग्रह मनात ठेवून २०१५-१६ साठीचे सर्व प्रस्ताव शिक्षणमंत्र्यांनी फेटाळले. याउलट भाजप सरकारच्या काळातील सर्व प्रस्ताव मंजूर केले, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. औरंगाबादेतील विश्वास मल्टीपर्पज चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष जगदीश देसले यांनी अ‍ॅड. बी. एल. सगर किल्लारीकर यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल केली आहे. त्यांनी शिक्षणमंत्री (पदानिशी), शिक्षणमंत्री विनोद तावडे (नावानिशी), शिक्षण सचिव आणि प्रस्ताव छाननी समिती, औरंगाबाद यांना प्रतिवादी केले आहे. याचिकेची पार्श्वभूमीयाचिकाकर्ते औरंगाबादेत संस्कार विद्यालय नावाची सातवीपर्यंतची शाळा चालवितात. या शाळेत आठवी आणि नववीचे वर्ग सुरू करण्यासाठी (दर्जावाढीसाठी) २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. त्याची छाननी समितीने छाननी करून शिक्षण आयुक्तांमार्फत प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला होता. शासनाने काही प्रस्तावांना मान्यता दिली, तर काही प्रस्तावात त्रुटी असल्याच्या कारणाने प्रलंबित ठेवले. प्रस्ताव प्रलंबित असलेल्या संस्थांनी २०१६-१७ सालासाठी नव्याने प्रस्ताव दाखल करण्याची आवश्यकता नसल्याचे नोव्हेंबर २०१५ मध्ये एका परिपत्रकाद्वारे कळविले. त्यांना ह्यआॅनलाईनह्ण दुरुस्तीची परवानगी दिली. शिक्षणमंत्र्यांचा आदेशत्यानुसार राज्यातील जवळपास सर्वच संस्थांनी त्रुटी दूर केल्या. याचिकाकर्त्यासह राज्यातील वरील सर्वच संस्थांच्या प्रस्तावांवर मंत्रालयस्तरावर छाननी होऊन, शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांच्या मान्यतेसह सदर प्रस्ताव शिक्षणमंत्र्यांच्या अंतिम मान्यतेसाठी सादर करण्यात आले. त्यावर शिक्षणमंत्र्यांनी ह्य२०१५-१६ चे प्रलंबित शैक्षणिक प्रस्ताव असलेल्या संस्थांना (शाळांना) अपात्र असल्याचे कळविण्यात यावे. सन २०१६-१७ मध्ये अर्ज केलेल्या व पात्र असलेल्या सर्व प्रस्तावांना मान्यता द्यावीह्ण असा आदेश ३० मे २०१६ रोजी दिला.प्रस्ताव मान्य, अमान्येबाबत कायदेशीर तरतूदमहाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम, २०१२ या कायद्याच्या कलम ८(१) नुसार कुठल्याही शैक्षणिक संस्थेचा प्रस्ताव मान्य अथवा अमान्य करण्याचा निर्णय योग्य त्या कारणमीमांसेसह संबंधित संस्थेला कळविणे राज्य सरकारवर बंधनकारक आहे. याचा संदर्भ देऊन शिक्षणमंत्र्यांनी वरील तरतुदींचे पालन केले नसल्याचे याचिकाकर्त्याने म्हटले आहे. त्याचप्रमाणे शिक्षणमंत्र्यांनी राज्यघटनेच्या कलम १६३ नुसार ह्यनि:पक्ष व भेदभावविरहितह्ण काम करण्याची शपथ घेऊन अधिकार ग्रहण केला आहे. असे असताना प्रस्तुत प्रकरणात त्यांनी भेदाभेद केल्याचा आरोपही याचिकाकर्त्याने केला आहे. खंडपीठाने न्यायालयाच्या नोटिसीशिवाय याचिकाकर्त्याला स्वतंत्रपणे प्रतिवादींना नोटिसा बजावण्याची मुभा दिली आहे. आॅनलाईन पद्धतीने प्राप्त प्रस्तावशिक्षण संचालकांनी दिलेल्या जाहिरातीनुसार ५ आॅक्टोबर २०१५ ते ३० नोव्हेंबर २०१५ दरम्यान राज्यभरातून ह्यआॅनलाईनह्ण पद्धतीने एकूण ५३०१ प्रस्ताव शिक्षण विभागाला प्राप्त झाले होते. त्यापैकी ३७३३ प्रस्ताव पात्र ठरतात, तर १५५१ प्रस्ताव अपात्र ठरतात. तर १७ प्रस्ताव शासन निर्णयार्थ सादर केले होते. या प्रस्तावांवर शिक्षणमंत्र्यांनी वरीलप्रमाणे आदेश दिल्याची माहिती याचिकाकर्त्यास माहितीच्या अधिकार कायद्यांतर्गत देण्यात आली होती.