शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

खासगीकरणातून आरक्षण संपविण्याचे प्रयत्न- डॉ. सुखदेव थोरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2018 23:27 IST

आता सरकारकडूनच खासगीकरण आणि कंत्राटीकरण करून समाजाला मूळ प्रवाहात येण्यापासून रोखण्याचे मोठे षडयंत्र सुरू असल्याचे प्रतिपादन विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष तथा अर्थतज्ज्ञ डॉ. सुखदेव थोरात यांनी येथे केले.

जालना : समाजातील दलित, आदिवासी तसेच ओबीसींना मूळ प्रवाहात आणण्यासाठी राज्य घटनेने आरक्षण दिले होते. त्यामुळे समाजाची थोडी-बहुत प्रगतीही झाली. मात्र आता सरकारकडूनच खासगीकरण आणि कंत्राटीकरण करून समाजाला मूळ प्रवाहात येण्यापासून रोखण्याचे मोठे षडयंत्र सुरू असल्याचे प्रतिपादन विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष तथा अर्थतज्ज्ञ डॉ. सुखदेव थोरात यांनी येथे केले.थोरात यांच्या हस्ते शनिवारी मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात ३५ व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. संमेलनाचे अध्यक्ष डी. बी. जगत्पुरीया, अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस, माजी मंत्री आणि अ.भा. काँग्रेस समितीच्या मागासवर्गीय विभागाचे अध्यक्ष डॉ. नीतीन राऊत, स्वागताध्यक्ष डॉ. संजय लाखे पाटील, अस्मितादर्शच्या संपादिका आणि संवर्धक डॉ. निवेदिता पानतावणे आदी उपस्थित होते.थोरात म्हणाले, दलित साहित्याचा पाया महाराष्ट्रात असला तरी, त्याने केव्हाच सीमापार करून तो आज सातासमुद्रापार ते पोहोचले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विपूल साहित्य लिहिले, परंतु त्यावेळी आजच्या एवढा डाटा संकलन नव्हते. त्यामुळे चांगले तेच की, ज्यातून विचारांना प्रेरणा मिळून समाजाचे वास्तव त्यात असले पाहिजे असा त्यांचा मानदंड होता. दलित साहित्यात दलित अधिकाऱ्यांचाही सिंहाचा वाटा असल्याचा उल्लेख थोरांतांनी आवर्जून केला. आजही दलित समाजातील जवळपास ६५ टक्के लोक हे आपली उपजिविका मोलमजूरी करूनच भागवत आहेत. मनुस्मृतीमुळे त्यांना संपत्ती निर्मितीचा अधिकार नाकरल्याचे परिणाम आजही ते भोगत असल्याचे वास्तव असल्याचे थोरात म्हणाले.आरक्षणाच्या मुद्याला सुरूंग लावण्यासाठी शिक्षणाचे खासगीकरण झाले. गावोगाव इंग्रजी माध्यमांच्या शाळा तसेच काही संस्थांना विद्यापीठचा दर्जा दिला. व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्राधान्य देताना आरक्षण नसल्याने दलित समाजातील विद्यार्थ्यांना प्रवेश शक्य नसल्याने नवीन नीती अवंलंबिली जात असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :reservationआरक्षणNarendra Modiनरेंद्र मोदीGovernmentसरकार