शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

खासगीकरणातून आरक्षण संपविण्याचे प्रयत्न- डॉ. सुखदेव थोरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2018 23:27 IST

आता सरकारकडूनच खासगीकरण आणि कंत्राटीकरण करून समाजाला मूळ प्रवाहात येण्यापासून रोखण्याचे मोठे षडयंत्र सुरू असल्याचे प्रतिपादन विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष तथा अर्थतज्ज्ञ डॉ. सुखदेव थोरात यांनी येथे केले.

जालना : समाजातील दलित, आदिवासी तसेच ओबीसींना मूळ प्रवाहात आणण्यासाठी राज्य घटनेने आरक्षण दिले होते. त्यामुळे समाजाची थोडी-बहुत प्रगतीही झाली. मात्र आता सरकारकडूनच खासगीकरण आणि कंत्राटीकरण करून समाजाला मूळ प्रवाहात येण्यापासून रोखण्याचे मोठे षडयंत्र सुरू असल्याचे प्रतिपादन विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष तथा अर्थतज्ज्ञ डॉ. सुखदेव थोरात यांनी येथे केले.थोरात यांच्या हस्ते शनिवारी मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात ३५ व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. संमेलनाचे अध्यक्ष डी. बी. जगत्पुरीया, अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस, माजी मंत्री आणि अ.भा. काँग्रेस समितीच्या मागासवर्गीय विभागाचे अध्यक्ष डॉ. नीतीन राऊत, स्वागताध्यक्ष डॉ. संजय लाखे पाटील, अस्मितादर्शच्या संपादिका आणि संवर्धक डॉ. निवेदिता पानतावणे आदी उपस्थित होते.थोरात म्हणाले, दलित साहित्याचा पाया महाराष्ट्रात असला तरी, त्याने केव्हाच सीमापार करून तो आज सातासमुद्रापार ते पोहोचले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विपूल साहित्य लिहिले, परंतु त्यावेळी आजच्या एवढा डाटा संकलन नव्हते. त्यामुळे चांगले तेच की, ज्यातून विचारांना प्रेरणा मिळून समाजाचे वास्तव त्यात असले पाहिजे असा त्यांचा मानदंड होता. दलित साहित्यात दलित अधिकाऱ्यांचाही सिंहाचा वाटा असल्याचा उल्लेख थोरांतांनी आवर्जून केला. आजही दलित समाजातील जवळपास ६५ टक्के लोक हे आपली उपजिविका मोलमजूरी करूनच भागवत आहेत. मनुस्मृतीमुळे त्यांना संपत्ती निर्मितीचा अधिकार नाकरल्याचे परिणाम आजही ते भोगत असल्याचे वास्तव असल्याचे थोरात म्हणाले.आरक्षणाच्या मुद्याला सुरूंग लावण्यासाठी शिक्षणाचे खासगीकरण झाले. गावोगाव इंग्रजी माध्यमांच्या शाळा तसेच काही संस्थांना विद्यापीठचा दर्जा दिला. व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्राधान्य देताना आरक्षण नसल्याने दलित समाजातील विद्यार्थ्यांना प्रवेश शक्य नसल्याने नवीन नीती अवंलंबिली जात असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :reservationआरक्षणNarendra Modiनरेंद्र मोदीGovernmentसरकार