शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2018 03:08 IST

राज्य विधान परिषदेच्या ११ जागांसाठी होणारी निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू असून प्रमुख पक्ष त्यासाठी अनुकूल असल्याचे चित्र आहे.

मुंबई : राज्य विधान परिषदेच्या ११ जागांसाठी होणारी निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू असून प्रमुख पक्ष त्यासाठी अनुकूल असल्याचे चित्र आहे.सूत्रांनी सांगितले की स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही निवडणूक बिनविरोध व्हावी या मताचे आहेत. कारण निवडणूक झाली तर घोडेबाजार होणार हे उघड आहे. निवडणुकीतील हा घोडेबाजार टाळावा म्हणून पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनीही विधान परिषदेच्या निवडणुका बिनविरोध करण्यावर भर दिला होता. तोच पायंडा फडणवीस यांनीही कायम राखला आहे.निवडणूक बिनविरोध झाल्यास भाजपाच्या पाच, शिवसेनेच्या दोन, काँग्रेसच्या दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आमदार निवडून येईल. अकरावी जागा ही शेकापचे जयंत पाटील लढतील आणि सर्वपक्षीय संबंधांचा फायदा घेत तेही बिनविरोध निवडून येतील, असे मानले जात आहे.जयंत पाटील हे राष्ट्रवादीला पाठिंब्याची भूमिका घेतात. रायगड आणि आसपासच्या भागात भाजपा आणि शिवसेनेसाठी हे धोक्याचे आहे. त्यामुळे भाजपाने सहावा उमेदवार द्यावा आणि कसेही करून जयंत पाटील यांना पराभूत करावे, असा एक प्रवाहदेखील भाजपात आहे.काँग्रेसने शरद रणपिसे आणि मिर्झा वजाहत अख्तर यांना तर राष्ट्रवादीने बाबा जानी दुर्रानी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. शिवसेनेकडून अनिल परब यांना पुन्हा संधी दिली जाईल पण दुसरे नाव उद्या जाहीर केले जाईल. मिलिंद नार्वेकर यांना संधी दिली जाण्याची शक्यता कमीच आहे. भाजपाकडून विद्यमान मंत्री रासपाचे नेते महादेव जानकर आणि भाई गिरकर यांचे नाव नक्की आहे. माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांचे नाव चर्चेत होते मात्र त्यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद दिले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, ऐनवेळी भाजपात आणून एखाद्या नेत्याला उमेदवारी दिली जाऊ शकते.

टॅग्स :Vidhan Parishadविधान परिषद