शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2018 03:08 IST

राज्य विधान परिषदेच्या ११ जागांसाठी होणारी निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू असून प्रमुख पक्ष त्यासाठी अनुकूल असल्याचे चित्र आहे.

मुंबई : राज्य विधान परिषदेच्या ११ जागांसाठी होणारी निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू असून प्रमुख पक्ष त्यासाठी अनुकूल असल्याचे चित्र आहे.सूत्रांनी सांगितले की स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही निवडणूक बिनविरोध व्हावी या मताचे आहेत. कारण निवडणूक झाली तर घोडेबाजार होणार हे उघड आहे. निवडणुकीतील हा घोडेबाजार टाळावा म्हणून पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनीही विधान परिषदेच्या निवडणुका बिनविरोध करण्यावर भर दिला होता. तोच पायंडा फडणवीस यांनीही कायम राखला आहे.निवडणूक बिनविरोध झाल्यास भाजपाच्या पाच, शिवसेनेच्या दोन, काँग्रेसच्या दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आमदार निवडून येईल. अकरावी जागा ही शेकापचे जयंत पाटील लढतील आणि सर्वपक्षीय संबंधांचा फायदा घेत तेही बिनविरोध निवडून येतील, असे मानले जात आहे.जयंत पाटील हे राष्ट्रवादीला पाठिंब्याची भूमिका घेतात. रायगड आणि आसपासच्या भागात भाजपा आणि शिवसेनेसाठी हे धोक्याचे आहे. त्यामुळे भाजपाने सहावा उमेदवार द्यावा आणि कसेही करून जयंत पाटील यांना पराभूत करावे, असा एक प्रवाहदेखील भाजपात आहे.काँग्रेसने शरद रणपिसे आणि मिर्झा वजाहत अख्तर यांना तर राष्ट्रवादीने बाबा जानी दुर्रानी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. शिवसेनेकडून अनिल परब यांना पुन्हा संधी दिली जाईल पण दुसरे नाव उद्या जाहीर केले जाईल. मिलिंद नार्वेकर यांना संधी दिली जाण्याची शक्यता कमीच आहे. भाजपाकडून विद्यमान मंत्री रासपाचे नेते महादेव जानकर आणि भाई गिरकर यांचे नाव नक्की आहे. माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांचे नाव चर्चेत होते मात्र त्यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद दिले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, ऐनवेळी भाजपात आणून एखाद्या नेत्याला उमेदवारी दिली जाऊ शकते.

टॅग्स :Vidhan Parishadविधान परिषद