शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

सुशातसिंह राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरेंच्या बदनामीचा प्रयत्न, दीपक केसरकरांचा नारायण राणेंवर आरोप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 16:33 IST

Deepak Kesarkar : आदित्यठाकरेंची बदनामी करण्यासाठी भाजपचे नेते आणि मंत्री नारायण राणे यांचा सहभाग होता, असा गंभीर आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला आहे.

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची बदनामी केली गेली. आदित्य ठाकरेंची बदनामी करण्यासाठी भाजपचे नेते आणि मंत्री नारायण राणे यांचा सहभाग होता, असा गंभीर आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला आहे. याचबरोबर, महाराष्ट्रातील सत्तांतराबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. यावरही दीपक केसरकर यांनी सावध भाष्य केले आहे.

दीपक केसरकर म्हणाले, "आदित्य ठाकरे यांच्याबद्दल जे बोलले जाते आणि वस्तुस्थिती यामध्ये जमीन-आस्मानाचा फरक आहे. ही वस्तुस्थिती आहे की, सुशातसिंह राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्या बदनामीचा प्रयत्न करण्यात आला. यात भाजपचे नेते आणि मंत्री नारायण राणे यांचाही सहभाग होता. ठाकरे कुटुंबीयांवर आमच्यासारखे लोक जे प्रेम करतात, ते यामुळे दुखावले गेले होते. भाजपच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांचे माझे जवळचे संबंध आहेत. त्यामुळे मी त्यांना विचारले होते की, तुम्ही तुमचा प्लॅटफॉर्म तुम्ही कसा वापरु देता. त्यावेळी त्यांनी मला सांगितले होते की, आमच्या बहुतांश आमदारांचा अशा प्रकारच्या बदनामीला विरोध आहे."

याचबरोबर, मला कोणीही सांगितले नव्हे तरी मी स्वतःच्या संपर्काने पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संपर्क केला आणि त्यानंतर त्यांनी माझे म्हणणे ऐकून घेतले आणि त्याला व्यवस्थित प्रतिक्रिया दिली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांचा संपर्क सुरु झाला. त्यानंतर त्यांची भेटही झाली. त्यावेळी मला पंतप्रधानांबाबत हे कळाले की कुटुंब प्रमुख कसा असावा? त्यांच्यामध्ये ठाकरे कुटुंबियांप्रती असलेले प्रेम प्रतित होत होते. त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले होते की, मला माझ्या पदापेक्षा तुमच्याशी असलेले कौटुंबिक संबंध जपण्यात मी जास्त महत्व देतो. त्याचवेळी ते आपल्यापदाचा त्याग करणार होते, असा  गौप्यस्फोट सुद्धा दीपक केसरकर यांनी केला. 

यानंतर उद्धव ठाकरे मुंबईत आल्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांच्या याबाबत कानावर घालणार होते. ही गोष्ट फक्त उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि मलाच माहिती होती. मोदी आणि ठाकरे यांच्याच संवाद सुरु होता. पण, मधल्या काळात 12 आमदारांचे निलंबन झाले. नंतर नारायण राणे यांना केंद्रात घेतले गेले. यामुळे उद्धव ठाकरे नाराज झाले. यानंतर उद्धव ठाकरे आणि पंतप्रधानांची बोलणी थांबली. मी जे बोललो ते सर्व सत्य आहे. यातील एकही शब्द खोटा असेल तर मी सार्वजनिक जीवनातून निवृत्त होईन, असेही दीपक केसरकर म्हणाले.

दरम्यान, महाराष्ट्रातील सत्तांतराबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. याबाबत दीपक केसरकर म्हणाले, पक्षांतर्गत लोकशाही असावी की नाही हेही या निकालावरुन समजेल. राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला वेळ झाला तरी चालेल, पण सर्वोच्च न्यायालयाचा आदर राखणे गरजेचे आहे आणि तो आमच्याकडून राखला जातोय. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार केला नाही. सोमवारी अंतरीम आदेश येईल आणि त्यानंतर विस्तार होईल. 

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Narayan Raneनारायण राणे Aaditya Thackerayआदित्य ठाकरेSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूत