शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

पंकजा मुंडेंचे पंख छाटण्याचे प्रयत्न, एकनाथ खडसे यांचा आरोप

By अतुल कुलकर्णी | Updated: May 14, 2020 07:13 IST

एकीकडे आम्ही ओबीसी समाजातील नेत्यांना उमेदवारी देतो असे दाखवायचे आणि दुसरीकडे जे नेते समाजावर पकड ठेवून आहेत त्यांचे पंख छाटले जात आहेत

- अतुल कुलकर्णीमुंबई : भाजपमध्ये जाणीवपूर्वक पंकजा मुंडे यांचे पंख छाटण्याचे प्रयत्न होत आहेत. माझ्यासह पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, प्रकाश मेहता, राज पुरोहित अशा बहुजन समाज व ओबीसी नेत्यांना दूर करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. एकीकडे आम्ही ओबीसी समाजातील नेत्यांना उमेदवारी देतो असे दाखवायचे आणि दुसरीकडे जे नेते समाजावर पकड ठेवून आहेत त्यांचे पंख छाटले जात आहेत, असा गंभीर आरोप भाजप नेते एकनाथ खडसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.आपल्याला राज्यसभेच्या वेळी उमेदवारी देता येणार नाही, पण विधानपरिषदेच्यावेळी नक्की विचार करु असे सांगण्यात आले. मात्र ज्यांनी कायम भाजपला शिव्या दिल्या, आमच्या नेत्यांविषयी वाईट उद्गार काढले त्यांना उमेदवारी दिली गेली आणि जे पक्षात निष्ठावंत होते त्यांना डावलले गेल, असा दावाही खडसे यांनी केला.भाजपमधील घराणेशाहीबद्दल खडसे म्हणाले, आपल्यावर घराणेशाहीचा आरोप होतो. पण माझ्या घरात फक्त सुनेला उमेदवारी दिली गेली. माझी पत्नी सहकार क्षेत्रातील महानंदवर आहे. जेथे भाजपचे फक्त दोन सदस्य आहेत. पण देवेंद्र फडणवीस यांचे वडील आमदार होते, त्यांच्या काकू शोभाताई आमदार होत्या, मंत्री होत्या, ते स्वत: मुख्यमंत्री होते, आता विरोधी पक्ष नेते आहेत, रावसाहेब दानवे आणि त्यांचे चिरंजीव, राधाकृष्ण विखे आणि त्यांचे चिरंजीव देखील सत्तेत आहेत.खडसेंचा राग नेमका कोणावर? प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील की देवेंद्र फडणवीस यांच्यावर? पक्षात किती नाराजी आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे खडसे यांनी दिली आहेत.

टॅग्स :BJPभाजपाPankaja Mundeपंकजा मुंडेEknath Khadaseएकनाथ खडसे