शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

पहाटे तीन वाजताच एटीएसची छापेमारी; ISIS चा म्होरक्या साकिब नाचणच्या गावात मोठी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 19:48 IST

ATS news Maharashtra: मुंबई नाशिक महामार्गावरील भिवंडी तालुक्यातील पडघा नजीकच्या बोरिवली या गावात हा छापा टाकण्यात आला.

१९९७ मध्ये संपूर्ण भारतात दहशतवादी हल्ले करण्याची योजना आखल्याबद्दल आणि २००२ आणि २००३ मध्ये मुंबईत दोन बॉम्बस्फोट घडवून आणल्याबद्दल शिक्षा भोगून सुटलेल्या साकिब नाचणच्या गावात मोठी कारवाई करण्यात आली आहे. गुप्त माहितीनुसार या गावातील नाचणचे काही लोक दहशतवादी हल्ल्याचा कट रचत असल्याचे समजले होते. यानंतर सुमारे ३५० हून अधिक पोलीस आणि १०० हून अधिक एटीएसच्या अधिकाऱ्यांनी नाचणच्या गावावर छापा टाकला. 

मुंबई नाशिक महामार्गावरील भिवंडी तालुक्यातील पडघा नजीकच्या बोरिवली या गावात हा छापा टाकण्यात आला. ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे ग्रामीण, रायगड ग्रामीण येथील तब्बल ३५० हून अधिक पोलिस कर्मचारी अधिकारी, शीघ्र कृती दलाच्या जवानांनी संपूर्ण गावाला वेढा दिला होता. मुंबई एटीएस पथकाचे सुमारे १०० अधिकारी कर्मचारी यांनी गावातील साकिब नाचण सह इतर अनेक घरात सर्च ऑपरेशन राबविले. 

मुंबई एटीएस पथकासह ठाणे, नाशिक येथील पथकाने या कारवाईमध्ये सहभाग घेतला होता. पहाटे ३ वाजता सुरू झालेली कारवाई दुपारी १ वाजता पूर्ण झाली. या कारवाईमध्ये बोरिवली गावातील साकिब नाचणसह एकूण २२ घरांमध्ये सर्च ऑपरेशन करून तेथील संशयित व्यक्तींचे मोबाईल व लॅपटॉप तपासण्यात आले आहेत. या कारवाईवेळी अनेक मोबाईल व सिमकार्ड हे ताब्यात घेण्यात आले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजून एटीएस पथकाने कोणालाही अटक केलेली नाही.

साकिब नाचन हा सिमीचा सक्रिय सदस्य होता आणि २०१७ मध्ये सुटका झाल्यानंतर तो आयसिसमध्ये सामील झाला आहे. डिसेंबर २०२३ मध्ये बोरिवली गावात साकिब नाचनच्या घरावर आणि इतर चौदा आरोपींच्या परिसरात एनआयएने टाकलेल्या छाप्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा, धारदार शस्त्रे आणि मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जप्त करण्यात आली होती. 

टॅग्स :Anti Terrorist SquadएटीएसterroristदहशतवादीMaharashtraमहाराष्ट्र