शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
2
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
3
PM Modi Birthday : जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
4
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
5
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
6
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
7
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
8
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
9
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
10
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
11
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
12
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
13
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
14
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
15
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
16
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
17
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
18
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
19
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
20
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली

जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 13:33 IST

कालांतराने डोक्यावर पश्चातापाचा हात मारावा लागेल. तुमच्या प्रत्येकाकडे पैसे आले पाहिजे. कुटुंब उभी राहिली पाहिजे पण महाराष्ट्र विकून नाही असंही राज ठाकरे यांनी सांगितले.  

पनवेल - विकत घेता येणारी माणसे अशी प्रतिमा आपली महाराष्ट्राबाहेर उभी करण्यात येत आहे. मराठी माणसं विकाऊ आहे असं सांगितले जाते त्याची लाज वाटते. महाराष्ट्रात आपण आपली भाषा विसरतोय, आपली तत्वे घालवतोय, जमिनी घालवतोय. स्वाभिमानी माणसे विकली गेली तर जिवंत प्रेते उरतात. देशाला दिशा देणारा हा महाराष्ट्र आहे. तुम्ही मोठे झाले पाहिजे, पण महाराष्ट्र विकून नाही. इतरांच्या आहारी जाऊन जमिनी देऊन टाकायच्या, बाहेरची माणसे येतायेत. जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका अशी कळकळीचं आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जनतेला केले आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या ७८ व्या वर्धापन दिनी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. 

राज ठाकरे म्हणाले की, शेकापच्या व्यासपीठावर मी दुसऱ्यांदा येतोय. पक्षाचा विचार न करता मराठीचा मुद्दा समजून घेतला पाहिजे. जेव्हा जेव्हा चांगले रस्ते आले आहेत तेव्हा राज्य सरकारचे लक्ष नसेल तर तो प्रदेश बर्बाद व्हायला वेळ लागत नाही. महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात लहान मुलांना हिंदी कशी आणता येईल, शिकवता येईल याचा विचार करतोय. महाराष्ट्रात कामधंदा करायला जे येतायेत त्यांना मराठी कशी येईल याचा विचार करत नाही. महाराष्ट्रातला मराठी माणूस, भूमिपूत्र याचा विचारच राज्य सरकारला नाही. याचे भीषण वास्तव रायगड जिल्ह्यात आहे. रायगडातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी चालल्या आहेत. कुठे चालल्यात माहिती नाही. जमिनीचे व्यवहार करणारे आपलेच, कुंपनच शेत खातायेत. उद्योगधंदे इथे येतायेत आणि लोक बाहेरून आणले जातील. शेतकरी आणि कामगार दोन्ही उद्ध्वस्त होतोय. रायगड जिल्ह्याची जबाबदारी जयंत पाटील यांनी हाती घेतली पाहिजे. इथला मराठी माणूस, इथला शेतकरी, उद्योगधंदे यावर मराठी माणसाने लक्ष ठेवणे गरजेचे आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री दोघेही गुजरातचे आहेत. अमित शाह स्वत: एका मुलाखतीत मी गुजराती आहे, हिंदी भाषिक नाही असं सांगतात. महाराष्ट्रातले अनेक प्रकल्प आज गुजरातला जातायेत. प्रत्येकाला आपल्या राज्याबद्दल प्रेम असते मग आम्ही संकुचित कसे? हिंदी गुजरातमध्ये सक्तीची नाही मग महाराष्ट्रात का? भाषा संपली आणि जमीन गेली की जगाच्या पाठीवर तुम्हाला कसलेही स्थान नाही. गुजरातमध्ये कायद्यानुसार जे गुजराती नाहीत, अधिवासी भारतीयांना थेट शेत जमीन विकत घेता येत नाही. ज्या राज्याचे पंतप्रधान, गृहमंत्री गुजरातचे आहेत, तिथली शेतजमीन भारतातील कुठलाही नागरीक विकत घेऊ शकत नाही. जर जमीन विकत घ्यायची असेल तर एक विशिष्ट कायदा आहे त्यानुसार परवानगी घ्यावी लागते. आज आपल्याकडे कुणीही जमीन विकत घेतंय. आमचेच लोक जमिनी विकतायेत. यातून आपणच संपणार हे आपल्या लोकांच्या लक्षात येत नाही अशी खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली. 

दरम्यान, आज सर्वाधिक डान्सबार रायगड जिल्ह्यात कसे?, रायगड जिल्हा ही शिवछत्रपतींची राजधानी आहे. कल्याणच्या सूभेदाराची सून खणानारळाने ओटी भरणाऱ्या आपल्या राजा शिवछत्रपतींची राजधानी इथे आहे तिथे डान्सबार सुरू आहे. महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य संमेलन भरवतंय, हे नुसते गुजराती माणसाबद्दल प्रेम नाही. त्यातून मराठी माणूस आणि गुजराती माणसांमध्ये भांडण लावावी यासाठी केलेले हे उद्योग आहे. तुम्हाला हवे ते आम्ही करणार नाही परंतु  ज्यावेळी समजेल तुमच्या कृतीतून महाराष्ट्राला नख लागतंय त्यावेळी अंगावर येऊ. कान बंद ठेवू नका, डोळे बंद ठेवू नका. आपल्या आजूबाजूला काय सुरू आहे त्यावर बारीक लक्ष ठेवले पाहिजे. तुम्ही विकले जातायेत, पायाखालची जमीन निसटतेय. भाषा जातेय मग कालांतराने डोक्यावर पश्चातापाचा हात मारावा लागेल. तुमच्या प्रत्येकाकडे पैसे आले पाहिजे. कुटुंब उभी राहिली पाहिजे पण महाराष्ट्र विकून नाही असंही राज ठाकरे यांनी सांगितले. 

जनसुरक्षा कायद्यावर राज ठाकरेंची टीका 

यापुढे उद्योगधंद्यासाठी, जमिनीसाठी लोक आले तर जमिनी नुसत्या विकायच्या नाहीत तर तुमच्या कंपन्यांमध्ये पार्टनर म्हणून घ्या असं सांगायचे. आपण या गोष्टी वाचवायला नाहीत तर यापुढे रायगडमध्ये अमराठी नगरसेवक, आमदार, खासदार निवडून येतील. अख्खा ठाणे जिल्ह्याला हा विळखा पडला आहे. सगळ्या पक्षांनी येऊन याचा विचार केला पाहिजे. नवी मुंबई विमानतळावर १०० टक्के मराठी मुले कामाला लागली पाहिजेत. बाहेरून येऊन जमिनी विकत घेणार आणि वाटेल तसं थैमान घालणार हे चालणार नाही. आता सरकारने कायदा आणला आहे जो आंदोलन करेल तो अर्बन नक्षल...एखाद्या प्रकल्पाला तुम्ही विरोध केला तर सरकार तुम्हाला अटक करू शकते. अटक करूनच पाहा, मराठी माणसाच्या थडग्यावर उद्योग उभे राहू देणार नाही. उद्योग आणायचे असतील तर मराठी माणसांना त्यात सामावून घ्यावे लागेल असं सांगत राज ठाकरे यांनी जनसुरक्षा कायद्यावर टीकास्त्र सोडले. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेAmit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदीmarathiमराठीMahayutiमहायुती