शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी  खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर; विज्ञान कथालेखकाला पहिल्यांदाच मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2021 02:29 IST

यंदाचे साहित्य संमेलन नाशिकच्या गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कॅम्पसमध्ये होणार असून रसिकांच्या सोयीचा विचार करून २६ ते २८ मार्च या काळात संमेलन होईल

नाशिक : दीड दशकानंतर यंदा नाशिकला होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान कथालेखक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड करण्यात आली आहे. साहित्य संमेलनाच्या आतापर्यंतच्या इतिहासात प्रथमच एका विज्ञान कथालेखक आणि संशोधकाची संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्याने नाशिकचे संमेलन सर्वार्थाने वेगळे ठरणार आहे.   

अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी पत्रकार परिषदेत संमेलनाध्यक्षांच्या निवडीची घोषणा केली. महामंडळाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत डॉ. नारळीकर यांच्या नावाला बहुमताने पसंती देण्यात आली. महामंडळाच्या पुणे विभागीय कार्यालयाने डॉ. जयंत नारळीकर यांच्या नावाचा प्रस्ताव पाठविला होता. तेव्हापासूनच डॉ. नारळीकर यांच्या नावाची चर्चा होऊन रविवारी त्यावर मोहोर उमटवण्यात आल्याचे ठाले पाटील यांनी नमूद केले.    तिन्ही दिवस उपस्थिती डॉ. नारळीकर हे तिन्ही दिवस संमेलनाला उपस्थित राहणार असून त्यांचे संमतीपत्र महामंडळाला प्राप्त झाले आहे. संमेलनाचे उद्घाटन राजकीय क्षेत्रातील मान्यवरांपेक्षा एखाद्या मोठ्या लेखकाच्याच हस्ते केले जाणार असल्याचे ठाले पाटील यांनी स्पष्ट केले.

२६ मार्चला संमेलनाची सुरुवात  यंदाचे साहित्य संमेलन नाशिकच्या गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कॅम्पसमध्ये होणार असून रसिकांच्या सोयीचा विचार करून २६ ते २८ मार्च या काळात संमेलन होईल, असे ठाले पाटील यांनी सांगितले. २६ मार्चला कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या निवासस्थानापासून ग्रंथदिंडीने या संमेलनाची सुरुवात होईल.    

किर्लोस्करांचे ते भाकीत खरे ठरले!‘खूप वर्षांपूर्वी ‘किर्लोस्कर’ मासिकात माझी कथा छापून आली होती; तेव्हा मुकुंदराव किर्लोस्कर म्हणाले होते की, तुम्ही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व्हाल; तेव्हा मी म्हणालो की, ‘मी स्वत:ला साहित्यिक समजत नाही. साहित्यातील माझा अनुभव कमी आहेे.’ पण आज किर्लोस्करांचे ते भाकीत खरे ठरले. 

टॅग्स :Jayant Narlikarजयंत नारळीकर