शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
4
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
5
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
6
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
7
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
8
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
9
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
10
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
11
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
12
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
13
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
14
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
15
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
16
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
17
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
18
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
19
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
20
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणावरून विधिमंडळात गदारोळ, तीनवेळा विधानसभा तहकूब

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 04:58 IST

विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मराठा आरक्षणाच्या विषयावरून प्रचंड गदारोळ झाला.

नागपूर : विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मराठा आरक्षणाच्या विषयावरून प्रचंड गदारोळ झाला. विधानसभा तीनवेळा तहकूब झाली. विरोधी बाकावरील सदस्य आक्रमक होत वेलमध्ये उतरले. अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या दालनात सर्व पक्षाच्या गटनेत्यांची बैठक झाली. शेवटी १६ टक्के जागा मराठा समाजासाठी राखीव ठेवण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली आणि हा गोंधळ शांत झाला.मराठा आरक्षणावरून परळीला सगळे तरुण एकत्र आले आहेत. लेखी आश्वासन मिळेपर्यंत हटणार नाही अशी त्यांची भूमिका आहे. आरक्षणावरून सरकार वेळकाढूपणा करत आहेत. सत्तेत येण्यापूर्वी आरक्षण देण्याची घोषणा केली होती आता मराठा समाजाच्या भावनेशी सरकार खेळत आहे असे आक्षेप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतले. तर आषाढी दिवशी पंढरपुरात आंदोलन करण्याचा इशारा मराठा समाजाने दिला आहे. लाखाचे मोर्चे निघाले तरी सरकार निर्णय घेत नाही. मराठा समाजासाठी सहा निर्णय घेतले मात्र त्याचा काही फायदा नाही. शांततेत मोर्चे काढले, पण आता तरुण चिडले आहेत असे राष्टÑवादीचे नेते अजित पवार म्हणाले.मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचे समर्थन आहे. मात्र मराठा समाजाला मूर्ख बनवण्याचे काम काँग्रेस व राष्ट्रवादीने केले असा आरोप भाजपाचे नेते आ. आशिष शेलार यांनी केला. शिवसेनेचे आ. चंद्रदीप नरके यांनीदेखील जोरदार आक्षेप घेत सरकारने न्यायालयात आपली बाजू मांडावी अशी मागणी केली.विधानपरिषदेत बोलताना विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले, मराठा आरक्षणासाठी परळीत ३० तासांपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे, बीड जिल्ह्यात आणि राज्याच्या तालुक्या-तालुक्यात हे आंदोलन सुरू होत आहे, आंदोलनकर्ते हटायला तयार नाही. भाजपा सरकारने कूटनीती तंत्राचा वापर करून गुजरातमधील पटेलांचे, हरियाणातील जाटांचे आरक्षण संपवून टाकले, तोच प्रयोग मराठा आरक्षणाबाबत होतो. मागासवर्ग आयोगाचे काम कुठपर्यंत आले, किती दिवसात पूर्ण होणार आहे अशी विचारणा न्यायालयाला करावी लागत आहे याचा अर्थ सरकार वेळकाढूपणा करत आहे असेही मुंडे यावेळी म्हणाले. गुरुवारी विधानपरिषदेमध्ये यावर पुन्हा एकदा स्थगन प्रस्ताव दिला गेला. आम्ही बुधवारी मागणी केली होती की, बेरोजगारांची जी महाभरती केली जाणार आहे त्यामध्ये ७२ हजार भरती केली जाणार आहे. त्यामध्ये मराठा समाजाच्या १६ टक्के जागा बाजूला ठेवा आणि त्यानंतर भरती करा. त्याबाबतचे सकारात्मक उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले. मात्र यामध्ये मोठ्या शंका निर्माण होत आहेत.

टॅग्स :nagpurनागपूरNagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८