शहरं
Join us  
Trending Stories
1
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
2
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
3
"विविहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
4
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
5
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
6
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
7
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
8
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
9
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
10
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
11
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
12
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
13
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
14
याला म्हणतात ढासू स्टॉक...! पॉवर कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 30% नं वधारला; दिलाय 6500% चा बंपर परतावा, करतोय मालामाल
15
"मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी
16
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
17
"मी पोहून आलो, सकाळी घरी..."; बॉन्डी बीचवर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्याचा आईला कॉल
18
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
19
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
20
Astrology: नवीन वर्षात नवीन वास्तूमध्ये प्रवेश करण्यासाठी २०२६ मधील तारखा आणि शुभ मुहूर्त 
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांना ५० पत्र पाठवली, ५० फोन केले, तरीही...; जितेंद्र आव्हाड संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2024 12:23 IST

निधी वाटपात विरोधकांना डावललं जातंय असा आरोप सातत्याने केला जातो. त्यातूनच आव्हाडांनी मला एक रुपयाही निधी मिळाला नाही असा आरोप केला आहे. 

मुंबई - विरोधी पक्षातील आमदारांना निधीसाठी डावललं जात आहे असा आरोप विरोधकांकडून सातत्याने होत आहे. त्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी संतप्त भूमिका मांडत अर्थमंत्री अजित पवारांकडून दुजाभाव होत असल्याचा आरोप केला आहे. 

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, निधी वाटपाबाबत मी उदाहरण आहे. मी अर्थमंत्र्यांना ५० पत्र पाठवली, ५० फोन त्यांच्या स्वीय सहाय्यकांना केले. मात्र अर्थमंत्री तुम्हाला भेटायला तयार नाहीत असं त्यांनी सांगितलं. निधीसाठी जावं लागतं, मतदारसंघासाठी निधी मागावा लागतो. मला ते बंगल्यातही प्रवेश देणार नाहीत. आता मुख्यमंत्र्यांकडे सांगितले त्यांनी मी बघतो असं म्हटलंय. आता विठोबा रुखमाई पावली तर निधी मिळेल असं त्यांनी सांगितले.

तसेच मला एक रूपयाही निधी नाही. हे कुठे असतं का? आमच्याकडे नागरिक नाहीत का? फक्त तुमच्या ओळखीच्या मतदारसंघाकडे नागरिक आहेत का? आमच्या इथंही साडेतीन चार लाख नागरीक आहेत. त्यांना काहीतरी द्या. तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना द्या पण आमदारांना अगदीच कटोरा घेऊन भीक मागायला लावू नका. तो आमदार आहेत. उद्या हे सरकार गेले तर तुम्हीही फक्त आमदार राहणार आहात असा टोलाही जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांना लगावला. 

दरम्यान, विठोबा रुखमाईला वेगळं करणे हे महाराष्ट्राच्या ध्यानीमनी स्वप्नी नाही. मात्र या सरकारने केवळ विठोबाची पूजा केली रुखमाई कुठे दिसली नाही. पुरुषप्रधान संस्कृतीवर या सरकारचा किती पगडा आहे हे दिसून येते. पुरुषप्रधान संस्कृतीचा विचार हा मनुस्मृतीतून येतो. त्यात महिलांना कुठेही स्थान नाही. तसे रुखमाईला कुठेही स्थान या सरकारने दिले नाही. त्यामुळे मनुस्मृती या सरकारच्या विचारात किती बसलीय हे स्पष्ट होते असा आरोपही जितेंद्र आव्हाडांनी केला. 

शिक्षणमंत्र्यांवरही हल्लाबोल

मनुस्मृतीतील ४ श्लोक चांगले, त्यातून घेणार हे शिक्षणमंत्र्यांनीच सांगितले होते. ते अजूनही त्यावर हो की नाही बोलत नाही. उच्च नीच कोण हे सांगणारा मनु, शुद्रांना जीवन नकोसे करणारा मनु, क्षत्रियांचा स्वाभिमान हिरावून घेणारा मनु, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आम्ही करणार नाही याचा जन्म मनुस्मृतीतून झाला. तीच मनुस्मृती हे सरकार परत आणणंय त्यामुळे याला महाराष्ट्रात विरोध केलाच पाहिजे असं जितेंद्र आव्हाडांनी सांगितले

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडAjit Pawarअजित पवारvidhan sabhaविधानसभा