शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

विधानसभा : युतीचं 'टार्गेट २२०'; आघाडीला जिंकायच्या दुप्पट जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 14:02 IST

येत्या ३० तारखेपर्यंत जागावाटप होणार असल्याचे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी स्पष्ट केले. त्यानुसार आगामी काळात रणनिती आखली असून विधानसभेला आघाडीने १७५ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

मुंबई - लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतर विरोधीपक्ष आता अंगात आवसान आणून विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीत जागा जिंकण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात येत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीने एकूण २२९ जागा जिंकण्याचे टार्गेट ठेवले आहे. तर आघाडीने दुप्पट जागा जिंकण्याचे लक्ष्य निश्चित केल्याचे समजते.

२०१४ लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत सर्वच पक्षांना दारुण पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीतही भाजपला या लाटेचा फायदा झाला. कधी नव्हे ते भाजपला राज्यात अभूतपूर्व यश मिळाले. भाजपने राज्यात सरकार स्थापन केले. तसेच पाच वर्षे यशस्वीरित्या चालवले. गेल्यावेळी सर्वच पक्ष स्वबळावर लढले होते. त्यात सर्वाधिक १२२ जागा भाजपला मिळाल्या होत्या. तर शिवसेनाल ६३ जागा मिळाल्या होत्या.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ३०३ जागा मिळावल्या. तसेच स्वबळावर केंद्रात सत्ता मिळवली. तर भाजप प्रणीत एनडीएला एकूण ३५० हून अधिक जागा मिळाल्या. या विजयानुसार भाजपने राज्यात देखील खडतर लक्ष्य समोर ठेवले आहे. विधानसभेला युतीने २२० जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले. त्यानुसार भाजप आणि शिवसेना राज्यभर दौरे करत आहे.

दरम्यान विरोधक देखील निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. येत्या ३० तारखेपर्यंत जागावाटप होणार असल्याचे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी स्पष्ट केले. त्यानुसार आगामी काळात रणनिती आखली असून विधानसभेला आघाडीने १७५ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले. २०१४ मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीला ८२ जागा मिळाल्या होत्या. यावेळी आघाडीने दुप्पट अर्थात १७५ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे.