शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

विधानसभा : युतीचं 'टार्गेट २२०'; आघाडीला जिंकायच्या दुप्पट जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 14:02 IST

येत्या ३० तारखेपर्यंत जागावाटप होणार असल्याचे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी स्पष्ट केले. त्यानुसार आगामी काळात रणनिती आखली असून विधानसभेला आघाडीने १७५ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

मुंबई - लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतर विरोधीपक्ष आता अंगात आवसान आणून विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीत जागा जिंकण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात येत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीने एकूण २२९ जागा जिंकण्याचे टार्गेट ठेवले आहे. तर आघाडीने दुप्पट जागा जिंकण्याचे लक्ष्य निश्चित केल्याचे समजते.

२०१४ लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत सर्वच पक्षांना दारुण पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीतही भाजपला या लाटेचा फायदा झाला. कधी नव्हे ते भाजपला राज्यात अभूतपूर्व यश मिळाले. भाजपने राज्यात सरकार स्थापन केले. तसेच पाच वर्षे यशस्वीरित्या चालवले. गेल्यावेळी सर्वच पक्ष स्वबळावर लढले होते. त्यात सर्वाधिक १२२ जागा भाजपला मिळाल्या होत्या. तर शिवसेनाल ६३ जागा मिळाल्या होत्या.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ३०३ जागा मिळावल्या. तसेच स्वबळावर केंद्रात सत्ता मिळवली. तर भाजप प्रणीत एनडीएला एकूण ३५० हून अधिक जागा मिळाल्या. या विजयानुसार भाजपने राज्यात देखील खडतर लक्ष्य समोर ठेवले आहे. विधानसभेला युतीने २२० जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले. त्यानुसार भाजप आणि शिवसेना राज्यभर दौरे करत आहे.

दरम्यान विरोधक देखील निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. येत्या ३० तारखेपर्यंत जागावाटप होणार असल्याचे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी स्पष्ट केले. त्यानुसार आगामी काळात रणनिती आखली असून विधानसभेला आघाडीने १७५ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले. २०१४ मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीला ८२ जागा मिळाल्या होत्या. यावेळी आघाडीने दुप्पट अर्थात १७५ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे.