शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा : युतीचं 'टार्गेट २२०'; आघाडीला जिंकायच्या दुप्पट जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 14:02 IST

येत्या ३० तारखेपर्यंत जागावाटप होणार असल्याचे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी स्पष्ट केले. त्यानुसार आगामी काळात रणनिती आखली असून विधानसभेला आघाडीने १७५ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

मुंबई - लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतर विरोधीपक्ष आता अंगात आवसान आणून विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीत जागा जिंकण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात येत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीने एकूण २२९ जागा जिंकण्याचे टार्गेट ठेवले आहे. तर आघाडीने दुप्पट जागा जिंकण्याचे लक्ष्य निश्चित केल्याचे समजते.

२०१४ लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत सर्वच पक्षांना दारुण पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीतही भाजपला या लाटेचा फायदा झाला. कधी नव्हे ते भाजपला राज्यात अभूतपूर्व यश मिळाले. भाजपने राज्यात सरकार स्थापन केले. तसेच पाच वर्षे यशस्वीरित्या चालवले. गेल्यावेळी सर्वच पक्ष स्वबळावर लढले होते. त्यात सर्वाधिक १२२ जागा भाजपला मिळाल्या होत्या. तर शिवसेनाल ६३ जागा मिळाल्या होत्या.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ३०३ जागा मिळावल्या. तसेच स्वबळावर केंद्रात सत्ता मिळवली. तर भाजप प्रणीत एनडीएला एकूण ३५० हून अधिक जागा मिळाल्या. या विजयानुसार भाजपने राज्यात देखील खडतर लक्ष्य समोर ठेवले आहे. विधानसभेला युतीने २२० जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले. त्यानुसार भाजप आणि शिवसेना राज्यभर दौरे करत आहे.

दरम्यान विरोधक देखील निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. येत्या ३० तारखेपर्यंत जागावाटप होणार असल्याचे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी स्पष्ट केले. त्यानुसार आगामी काळात रणनिती आखली असून विधानसभेला आघाडीने १७५ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले. २०१४ मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीला ८२ जागा मिळाल्या होत्या. यावेळी आघाडीने दुप्पट अर्थात १७५ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे.