शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Lockdown: ५० टक्के लसीकरण पूर्ण झालं तरच लॉकडाऊन उठू शकतो, पण...; अस्लम शेख यांचे सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2021 20:19 IST

Lockdown: मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी भाष्य केले असून, टास्क फोर्स आणि मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील, असे ते म्हणाले.

मुंबई: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा परिणाम देशभरात झाला आहे. मात्र, महाराष्ट्रात त्याचा सर्वाधिक फटका बसल्याचे दिसून येत आहे. मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक ठिकाणची नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. मात्र, कोरोना मृत्यूचे वाढते प्रमाण चिंतेत भर टाकणारे आहे. कोरोनावरील नियंत्रणासाठी राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र, १ जूननंतर लॉकडाऊन उठवणार का, यासंदर्भात काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. यातच आता मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी भाष्य केले असून, टास्क फोर्स आणि मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील, असे ते म्हणाले. (aslam shaikh make statement over lockdown in maharashtra)

लॉकडाऊन शिथीलतेसंदर्भात कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला जाईल. ५० टक्के लसीकरण पूर्ण झाले, तरच लॉकडाऊन उठू शकतो. पण, सध्याच्या येणाऱ्या नवीन एसओपी प्रमाणे हॉटेल्स, इंडस्ट्री, सलून, इलेक्ट्रॉनिक्स व्यावसायिकांना दिलासा देण्यासंदर्भात टास्क फोर्स आणि मुख्यमंत्री निर्णय घेतील, असे अस्लम शेख म्हणाले. 

पदोन्नतीतील आरक्षण कायम राहिले पाहिजे; ‘तो’ जीआर रद्द करायला भाग पाडू: नाना पटोले

तिसऱ्या लाटेसाठी सज्ज

तिसरी लाट येणार असून, त्याची पूर्वतयारी म्हणून बालचिकित्सा गृह प्रत्येक कोविड सेंटरमध्ये आरक्षित करीत आहोत. तसेच ब्लॅक फंगस, येलो फंगस यासंदर्भात आम्ही दक्षता घेऊन उपचार सुरू केलेले आहेत, अशी माहितीही अस्लम शेख यांनी दिली. लॉकडाऊन एकदम उघडला जाणार नाही. परंतु, सर्वसामान्यांना दिलासा देणाचा विचार सरकारचा आहे. याबाबतची नियमावली कॅबिनेटनंतर जाहीर करण्यात येईल, असे शेख यांनी सांगितले.

भाजपवाल्यांच्या घरात मुलांचे विवाह करणार नाही; शेतकऱ्यांचा निर्धार!

राज्यात १ जूननंतरही कडक निर्बंध राहतील

रुग्णसंख्या नियंत्रणात येत असली, तरी कोरोनाविरुद्धच्या लढाईत अद्याप पूर्ण यश आलेले नाही. संभाव्य तिसरी लाट व त्याचे लहान मुलांवरील परिणामांबाबत सध्या अंदाजच आहेत. कोरोनाचा धोका अद्यापही पूर्णतः टळला नसल्याचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी ‘माझा डॉक्टर’ या संवादाच्या कार्यक्रमात दिला. मुख्यमंत्र्यांनी दिलेला इशारा म्हणजे राज्यात १ जूननंतरही कडक निर्बंध राहतील, याचे संकेत असल्याचे मानले जात आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लस