शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
4
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
5
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
6
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
7
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
8
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
9
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
10
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
11
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
12
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
13
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
14
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
15
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
16
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
17
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
18
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
19
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
20
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळेत मिळेना पोटभर जेवण

By admin | Updated: August 6, 2016 00:44 IST

आश्रमशाळेला अन्नधान्य पुरवठा करण्याची निविदाप्रक्रिया पूर्ण केलेली नसल्याने मुलांना पोटभर जेवणही मिळत नसल्याचे भयानक वास्तव आश्रमशाळेत दिसत आहे.

घोडेगाव : शाळा सुरू होऊन दोन महिने झाले, तरी आदिवासी विकास विभागाने आश्रमशाळेला अन्नधान्य पुरवठा करण्याची निविदाप्रक्रिया पूर्ण केलेली नसल्याने मुलांना पोटभर जेवणही मिळत नसल्याचे भयानक वास्तव आश्रमशाळेत दिसत आहे. राज्यातील आश्रमशाळा विविध समस्यांनी ग्रासलेल्या असताना या वर्षी आदिवासी विभागाने नवीन समस्या निर्माण करून ठेवली आहे. राज्यातील सर्व आश्रमशाळांमध्ये अन्नधान्य पुरवठा करण्याची निविदाप्रक्रिया आदिवासी अप्पर आयुक्त कार्यालयाकडून निश्चित झाली नसल्याने मुलांना धान्य, भाज्या, फळे यांचा पुरवठा बंद आहे. त्यामुळे सध्या मुलांचे प्रचंड हाल होत आहेत. पोटभर जेवण मिळेनासे झाले आहे. मुलांना वरणभात, पिठलंभात खाऊन दिवस काढावे लागत आहेत. सध्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावर मुख्याध्यापकांना किरकोळ खरेदीचे अधिकारी देऊन आश्रमशाळा सुरू ठेवल्या आहेत. मुख्याध्यापकही बाजारातून ५ किलो बेसनपीठ, १० किलो तांदूळ अशा स्वरूपात साहित्य आणून मुलांना जेवण देत आहेत. पालेभाज्या, फळे तर शाळा सुरू झाल्यापासून मुलांना मिळालेलीच नाहीत. आदिवासी विकास विभागाच्या भोंगळ कारभारामुळे आज मुलांना अपुरे जेवण मिळत आहे. यापूर्वी आदिवासी आयुक्त कार्यालयात निविदाप्रक्रिया होत होती; मात्र तेथील प्रक्रियेबाबत तक्रारी व गोंधळ झाल्याने अप्पर आयुक्त कार्यालयात निविदा प्रक्रिया ठेवण्यात आली. पण, येथेही ठेकेदारांमधील स्पर्धेतून आपापसात झालेल्या तक्रारी, आदिवासी कार्यालयाच्या काही त्रुटी, त्यातून ठेकेदारांनी न्यायालयात धाव घेतल्याने ही प्रक्रिया पूर्ण अडचणीत आली. त्यामुळे ठेकेदारांनी निविदा सादर करूनही अप्पर आयुक्त त्या निश्चित करू शकलेले नाहीत. आंबेगाव तालुक्यातील आश्रमशाळांत निर्माण झालेल्या अडचणीबाबत पंचायत समिती उपसभापती सुभाष तळपे, माजी सभापती कैलासबुवा काळे, बाजार समितीचे सभापती प्रकाश घोलप, पिंपरगणेचे सरपंच भीमा गवारी यांनी प्रकल्प अधिकारी आर. आर. सोनकवडे यांची भेट घेतली. (वार्ताहर)>या वेळी प्रकल्प अधिकारी आर. आर. सोनकवडे यांनी सांगितले, की आदिवासी आयुक्त कार्यालयांतर्गत सुरू असलेलया निविदाप्रक्रियेतील अडचणींमुळे अन्नधान्य पुरवठा करण्याच्या निविदा रखडल्या आहेत. सध्या सात-सात दिवसांचे साहित्य खरेदी करण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत. आसाणे, आहुपे शाळेतील मुख्याध्यापकांनी अहवाल व्यवस्थित दिले नसल्याने येथे कडधान्ये, भाजीपाला कमी पडला होता. मात्र, त्यांना खरेदीचे पूर्ण अधिकार दिले असून, दि. १५ आॅगस्टपर्यंची खरेदी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आश्रमशाळांना अन्नधान्य कमी पडू नये, याची पूर्ण दक्षता आम्ही घेत आहेत, असे ते म्हणाले. >आसाणे, आहुपे आश्रमशाळांत मुलांना पिठलंभात खाऊन दिवस काढावे लागत आहेत. तसेच, त्यांना जेवणात गेले अनेक दिवस चपाती मिळालेली नाही. आश्रमशाळांत भाजीपाला नाही, डाळी- कडधान्येही संपली आहेत, अशा तक्रारी मांडल्या.>शालेय साहित्यवाटपाच्या निविदाप्रक्रियेतही गोंधळ झाल्याने मागील वर्षापासून शैक्षणिक साहित्य मिळालेले नाही. त्यामुळे अजूनही मुलांना बूट, गणवेश, वह्या, पुस्तके शासन देऊ शकलेले नाही.