शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
2
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
3
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
4
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
5
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
6
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
7
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
8
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
9
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
10
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
12
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
13
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
14
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
15
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
16
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
17
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
18
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
19
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
20
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ

आश्रमशाळेत मिळेना पोटभर जेवण

By admin | Updated: August 6, 2016 00:44 IST

आश्रमशाळेला अन्नधान्य पुरवठा करण्याची निविदाप्रक्रिया पूर्ण केलेली नसल्याने मुलांना पोटभर जेवणही मिळत नसल्याचे भयानक वास्तव आश्रमशाळेत दिसत आहे.

घोडेगाव : शाळा सुरू होऊन दोन महिने झाले, तरी आदिवासी विकास विभागाने आश्रमशाळेला अन्नधान्य पुरवठा करण्याची निविदाप्रक्रिया पूर्ण केलेली नसल्याने मुलांना पोटभर जेवणही मिळत नसल्याचे भयानक वास्तव आश्रमशाळेत दिसत आहे. राज्यातील आश्रमशाळा विविध समस्यांनी ग्रासलेल्या असताना या वर्षी आदिवासी विभागाने नवीन समस्या निर्माण करून ठेवली आहे. राज्यातील सर्व आश्रमशाळांमध्ये अन्नधान्य पुरवठा करण्याची निविदाप्रक्रिया आदिवासी अप्पर आयुक्त कार्यालयाकडून निश्चित झाली नसल्याने मुलांना धान्य, भाज्या, फळे यांचा पुरवठा बंद आहे. त्यामुळे सध्या मुलांचे प्रचंड हाल होत आहेत. पोटभर जेवण मिळेनासे झाले आहे. मुलांना वरणभात, पिठलंभात खाऊन दिवस काढावे लागत आहेत. सध्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावर मुख्याध्यापकांना किरकोळ खरेदीचे अधिकारी देऊन आश्रमशाळा सुरू ठेवल्या आहेत. मुख्याध्यापकही बाजारातून ५ किलो बेसनपीठ, १० किलो तांदूळ अशा स्वरूपात साहित्य आणून मुलांना जेवण देत आहेत. पालेभाज्या, फळे तर शाळा सुरू झाल्यापासून मुलांना मिळालेलीच नाहीत. आदिवासी विकास विभागाच्या भोंगळ कारभारामुळे आज मुलांना अपुरे जेवण मिळत आहे. यापूर्वी आदिवासी आयुक्त कार्यालयात निविदाप्रक्रिया होत होती; मात्र तेथील प्रक्रियेबाबत तक्रारी व गोंधळ झाल्याने अप्पर आयुक्त कार्यालयात निविदा प्रक्रिया ठेवण्यात आली. पण, येथेही ठेकेदारांमधील स्पर्धेतून आपापसात झालेल्या तक्रारी, आदिवासी कार्यालयाच्या काही त्रुटी, त्यातून ठेकेदारांनी न्यायालयात धाव घेतल्याने ही प्रक्रिया पूर्ण अडचणीत आली. त्यामुळे ठेकेदारांनी निविदा सादर करूनही अप्पर आयुक्त त्या निश्चित करू शकलेले नाहीत. आंबेगाव तालुक्यातील आश्रमशाळांत निर्माण झालेल्या अडचणीबाबत पंचायत समिती उपसभापती सुभाष तळपे, माजी सभापती कैलासबुवा काळे, बाजार समितीचे सभापती प्रकाश घोलप, पिंपरगणेचे सरपंच भीमा गवारी यांनी प्रकल्प अधिकारी आर. आर. सोनकवडे यांची भेट घेतली. (वार्ताहर)>या वेळी प्रकल्प अधिकारी आर. आर. सोनकवडे यांनी सांगितले, की आदिवासी आयुक्त कार्यालयांतर्गत सुरू असलेलया निविदाप्रक्रियेतील अडचणींमुळे अन्नधान्य पुरवठा करण्याच्या निविदा रखडल्या आहेत. सध्या सात-सात दिवसांचे साहित्य खरेदी करण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत. आसाणे, आहुपे शाळेतील मुख्याध्यापकांनी अहवाल व्यवस्थित दिले नसल्याने येथे कडधान्ये, भाजीपाला कमी पडला होता. मात्र, त्यांना खरेदीचे पूर्ण अधिकार दिले असून, दि. १५ आॅगस्टपर्यंची खरेदी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आश्रमशाळांना अन्नधान्य कमी पडू नये, याची पूर्ण दक्षता आम्ही घेत आहेत, असे ते म्हणाले. >आसाणे, आहुपे आश्रमशाळांत मुलांना पिठलंभात खाऊन दिवस काढावे लागत आहेत. तसेच, त्यांना जेवणात गेले अनेक दिवस चपाती मिळालेली नाही. आश्रमशाळांत भाजीपाला नाही, डाळी- कडधान्येही संपली आहेत, अशा तक्रारी मांडल्या.>शालेय साहित्यवाटपाच्या निविदाप्रक्रियेतही गोंधळ झाल्याने मागील वर्षापासून शैक्षणिक साहित्य मिळालेले नाही. त्यामुळे अजूनही मुलांना बूट, गणवेश, वह्या, पुस्तके शासन देऊ शकलेले नाही.