शहरं
Join us  
Trending Stories
1
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
2
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
3
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
4
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
5
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
6
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
7
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
8
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
9
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
10
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
11
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
12
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
13
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
14
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
15
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
16
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
17
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
18
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
19
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
20
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!

MahaVikas Aghadi: “काँग्रेसचा वाटा मोठा, आम्ही आहोत म्हणून महाविकास आघाडीची सत्ता आहे”: अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 12:00 IST

आम्ही आहोत म्हणून सत्ता आहे, हे मुद्दाम सांगितले पाहिजे, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

जालना:महाविकास आघाडीमधील अंतर्गत वाद अधूनमधून चव्हाट्यावर येत असल्याचे यापूर्वीही दिसून आले आहे. महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) सरकार स्थापन झाल्यापासून काही ना काही कुरबुरी समोर येत असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा नवीन वाद पेटण्याची चिन्हे असल्याचे सांगितले जात आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचा वाटा मोठा आहे. आम्ही आहोत म्हणून महाविकास आघाडीची सत्ता आहे, असा पुनरुच्चार अशोक चव्हाण यांनी केला आहे. 

जालना जिल्ह्यातील मंठा नगरपंचायतीच्या प्रचारासाठी अशोक चव्हाण आले होते. एका प्रचारसभेत ते बोलत होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसचा मोठा वाटा असून, हे सरकार मजबूत राहिले पाहिजे, हीच आमची प्रमाणिक भूमिका आहे, असेही अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. 

महाविकास आघाडीचा विचारपूर्वक निर्णय आपण घेतला

लोकांचा जीव वाचवला पाहिजे, यासाठी राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात मेहनत घेण्यात आली. या सर्व कामांवर लक्ष एकत्रित करुन राज्याच्या विकासाचा गाडा पुढे चालत राहिला पाहिजे या अनुषंगाने महाविकास आघाडीने निश्चित प्रयत्न केला आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचा मोठा वाटा आहे. आम्ही आहोत म्हणून सत्ता आहे हे मुद्दाम सांगितले पाहिजे. काँग्रेसच्या ताकदीनेच या महाविकास आघाडीचा विचारपूर्वक निर्णय आपण घेतला, असे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. 

त्या निर्णयाने आमची सर्वांचीच निराशा

ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयान जो निर्णय दिला आहे, त्या निर्णयाने आमची सर्वांचीच निराशा झाली. भाजपला देशातील, राज्यातील आरक्षण संपून टाकायचे आहे. त्यामुळेच भाजप असहकार्याची भूमिका दाखवत आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीत केंद्र सरकारने योग्य भूमिका घेतली नाही. केंद्र सरकारने ५० टक्क्यांची अट न काढता अधिकार राज्यांना दिले. त्यांनी कायद्यात बदल केला नाही. संसदेत कायदा केला असता तर मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागला असता. मात्र, केंद्र सरकारला ५० टक्क्यांच्या वर आरक्षण द्यायचेच नाही, असा दावा अशोक चव्हाण यांनी केला. 

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीAshok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेस