शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

मुख्यमंत्र्यांविरुद्ध काँग्रेसचा 'पटोले पॅटर्न'; 'या' नेत्याला दिली उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2019 3:20 PM

लोकसभा निवडणुकीत नाना पटोले यांनी गडकरींविरुद्ध लढा दिला होता. गडकरी आणि पटोले यांचे संबंध चांगले होते. त्याचप्रमाणे आशिष देशमुख आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संबंधही मैत्रीपूर्ण आहे. परंतु, निवडणुकीच्या निमित्ताने दोघेही एकमेकांसमोर उभे ठाकले आहे.

- रवींद्र देशमुख

मुंबई - भाजपच्या प्रमुख नेत्याविरुद्ध तगडा उमेदवार देण्याचा पायंडा काँग्रेसमध्ये पडल्याचे दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत एक अनोखा प्रयोग करत काँग्रेसकडून महाराष्ट्रातील भाजपचे वजनदार नेते नितीन गडकरी यांच्याविरुद्ध भाजपचेच बंडखोर खासदार नाना पटोले यांना उमेदवारी देण्यात आली होती. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध भाजपचे बंडखोर आमदार आशिष देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे नागपूर नैऋत्य मतदार संघात मुख्यमंत्र्यांविरुद्ध पटोले पॅटर्न राबविला जातोय का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

2014 मध्ये आशिष देशमुख भाजपकडून निवडून आले होते. परंतु, वेगळा विदर्भ आणि शेतकरी समस्या यावरून देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांवरच टीका केली होती. त्यानंतर त्यांनी भाजप सोडून काँग्रेसचा हात धरला होता. देशमुख यांचे घराणे मुळाचे काँग्रेसी. वडिल रणजीत देशमुख काँग्रेसमध्ये मंत्री होती. तर 2014 मध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांना टक्कर दिली होती. तर आशिष देशमुख 2014 मध्ये भाजपकडून लढले होते. मात्र ते भाजपमध्ये जास्त काळ रमले नाही.

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या दिल्लीतीन नेत्यांनीच आशिष देशमुख यांना मुख्यमंत्र्यांविरोधात उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. विदर्भात तरी मुख्यमंत्र्यांना टक्कर देऊ शकेल, असा नेता काँग्रेसमध्ये नसल्याची भावना पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे नागपूर नैऋत्यमधील लढत राज्यासाठी चर्चेचा विषय होणार आहे.

दरम्यान भाजपच्या तगड्या उमेदवाराला त्यांच्याच बंडखोरांकडून प्रत्युत्तर देण्याचा पॅटर्न काँग्रेसने गडकरी यांच्याविरुद्ध राबवला होता. आता तोच पॅटर्न मुख्यमंत्र्यांविरुद्ध वापरला जातोय. लोकसभा निवडणुकीत नाना पटोले यांनी गडकरींविरुद्ध लढा दिला होता. परंतु, त्यांना पराभव पत्करावा लागला . आता भाजपचे बंडखोर आमदार आशिष देशमुख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देत आहे. मात्र काँग्रसच्या या पटोले पॅटर्नला कितपत यश येईल, हे येणारा काळच सांगणार आहे.