शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

पाऊणतास सोहळ्यास उशीर : मुख्यमंत्र्यांसाठी पालखी सोहळा थांबवल्याची चर्चा 

By विश्वास मोरे | Updated: June 29, 2024 20:06 IST

देहूकरांचे आदरातिथ्य स्वीकारून तुकोबारायांचा सोहळा वारीची वाट चालू लागला. मजल दर मजल करीत सोहळा पिंपरी-चिंचवड शहराच्या प्रवेशद्वारावर अर्थात भक्तीशक्ती चौकात सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास चौघडा पोहोचला.

आध्यत्मिक वारीतून हरित आणि पर्यावरणाचा संदेश विश्वास मोरे लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी  : 'ज्ञानोबा-तुकाराम' असा हरीनामाचा जयघोष करित पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आषाढीवारी पालखी सोहळा शनिवारी सव्वा पाच वाजता उद्योगनगरीत प्रवेशाला. दरवर्षीपेक्षा अर्धा तास उशिराने सोहळा शहरात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोहळ्यात उपस्थित राहणार असल्याने भक्ती- शक्ती चौकामध्ये सोहळा थांबविल्याची चर्चा रंगली होती. माहिती पुस्तिका, झाडांच्या बिया, पुष्पहार आणि श्रीफळ देऊन दिंड्याचा सत्कार केला. वृक्षारोपण, वृक्षदिंडी, हरीतवारी असे विविध उपक्रम राबविण्यात आले.

देहूकरांचे आदरातिथ्य स्वीकारून तुकोबारायांचा सोहळा वारीची वाट चालू लागला. मजल दर मजल करीत सोहळा पिंपरी-चिंचवड शहराच्या प्रवेशद्वारावर अर्थात भक्तीशक्ती चौकात सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास चौघडा पोहोचला. तर साडेसहापर्यंत सोहळा चौकातच थांबला होता. शहराच्या वतीने अतिरिक्त  अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी स्वागत केले. यावेळी नागरीकांनी पुष्पवृष्ठी केली. यावेळी स्वागतमंचावर आयुक्त चंद्रकांत इंदलकर, शहर अभियंता मकरंद निकम, यशवंत डांगे, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, डॉ. लक्ष्मण गोफने उपस्थित होते. यावेळी दिंडी प्रमुखांचा सत्कार केला.फुगडीचा आनंद!स्वागताच्या ठिकाणी पारंपरिक वेशभुषेत असलेल्या वारकरी आणि नागरिकांनी अभंगावर ठेका धरला. फुगडीचा आनंदही घेतला. यावेळी हरितवारी दिंडी काढली होती. पर्यावरणाचा संदेश, झाडे लावा झाडे जगवा, हरितवारी प्लास्टिकमुक्त वारी असा संदेश देण्यात आला. सव्वा सहाच्या सुमारास पालखी रथ महापालिका कक्षाजवळ आला असताना मोठ्या प्रमाणावर पुष्पवृष्टी करण्यात आली. एकीकडे पालखीचे दर्शन घेण्यासाठी तर दुसरीकडे सोहळ्याचा क्षण मोबाईलमध्ये टिपण्यासाठी झुंबड उडाली होती.  पावसाची हजेरी, मुख्यमंत्रीची चर्चा! सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. हलक्या सरी बरसल्या. त्यामुळे वारकरी आनंदले. पालखी सोहळा मार्गावर नदीप्रमाणे प्रवाही असतो. मात्र, सुमारे अर्धा तास सोहळा याच ठिकाणी थांबला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोहळ्यात सहभागी होणार आहेत, म्हणून सोहळा थांबला आहे, अशी चर्चाही  रंगली होती. त्यामुळे देहूरोड सुमारे तीन किलोमीटरपर्यंत वारकरी रस्त्यावर उभे होते. त्यानंतर पावणे सहाच्या सुमारास पुन्हा दिंड्या पुढे सरकू लागल्या. सोहळा का थांबला होता? याबाबतचे उत्तर मिळू शकले नाही. वारकºयांनाही आवरला नाही सेल्फीचा मोह! पालखी सोहळ्यात स्वागताच्या ठिकाणी पर्यावरणाचा संदेश दिला जात होता. तर वारीत सहभागी होऊन नागरिक  सेल्फी काढत होते. त्यामुळे येथील नूर काही औरच होता. महापालिकेच्या वतीने स्थापत्य, आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा, सुरक्षा व्यवस्थेबरोबरच यंदाची वारी पर्यावरणपूरक, प्लास्टिक मुक्त, हरितवारी करण्याच्या दृष्टीने नियोजन केल्याचे दिसले.  राजकीय पक्षांतर्फे स्वागत!पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन, पालखी मुक्काम, वारकरी निवास आणि पालखी मार्गावर सज्जता होती. आकुर्डी येथील विठ्ठल रुख्मिणी मंदीरामध्ये रात्री पावणे आठला पालखी मुक्कामासाठी विसावला. दिंड्यांच्या मुक्काम ज्या महापालिकेच्या शाळांमध्ये असतो तसेच इतर खाजगी ठिकाणी असतो, तेथे महापालिकेच्या वतीने आवश्यक सुविधा पुरविल्या आहेत. तसेच विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. त्यामुळे पालखी मार्गावर निगडीपासून तर महापालिकेपर्यंत ठिकठिकणी राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या वतीने स्वागत फलक लावले होते. स्वागतकक्षही उभारले होते. 

टॅग्स :ashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022Alandiआळंदी