शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
2
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
3
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
4
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
5
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
6
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
7
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
8
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
9
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
10
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
11
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
12
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
13
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
14
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
15
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
16
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
17
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
18
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
19
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
20
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
Daily Top 2Weekly Top 5

जोवर अन्नात भेसळ आहे, तोवर आरोग्याची दिवाळखोरी आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 10:35 IST

उत्सव काळात गोडधोड खाणे हा संस्कृतीचा भाग झाला आहे.

महेश झगडे, माजी आयुक्त, अन्न व औषध प्रशासन

दिवाळी हा भेसळखोरांचा सुवर्णकाळ असतो. खवा, तूप, साखर, तेल सर्वांत भेसळ. फॉर्मालिन, डिटर्जंट, सिंथेटिक कलर, स्टार्च यांचा मुक्त वापर. ‘एफडीए’ मात्र या काळात झोपलेले असते! उत्सव काळात गोडधोड खाणे हा संस्कृतीचा भाग झाला आहे. विशेषतः दिवाळीत गोड अन्नपदार्थांची रेलचेल असते. दिवाळीच्या  थोड्याशा कालावधीत मोठ्या प्रमाणात गोडधोड आणि स्निग्ध पदार्थ खाल्ले जातात. 

या काळात मोठ्या प्रमाणात मिठाई तयार करण्यासाठी लागणारा खवा, तूप, अन्य कच्चा माल आणि मिठाईची मागणी वाढते. अर्थात, या मागणीच्या प्रमाणात कच्चा माल उपलब्ध नसेल तर गुन्हेगारी तत्त्वे कच्च्या मालात भेसळ करून त्याची विक्री करतात किंवा भेसळयुक्त मिठाई बनवून नफा कमावतात. मग, प्रसार माध्यमांमध्ये एफडीएच्या अधिकाऱ्यांनी इतका भेसळयुक्त खवा जप्त करून नष्ट केला, इतके भेसळयुक्त लोणी पकडले, मिठाईत कर्करोगास निमंत्रित करणारे रंग सापडल्यामुळे व्यापाऱ्यावर कारवाई केली अशा प्रकारच्या बातम्या येतात आणि दिवाळी संपली की सर्वांच्या विस्मृतीत जातात. 

आपल्या भागातील अन्न निरीक्षक कोण आहे, हे कुणी जाणतो का? कुणीही नाही. पोलिस स्टेशन माहीत असते, पण अन्नसुरक्षा कार्यालय माहीत नसते. या अन्न निरीक्षकाचे कर्तव्य असते नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करणे. पण, प्रत्यक्षात ते काम करतात का?

भेसळयुक्त कच्चा माल, मिठाई किंवा अन्य अन्न पदार्थ विकलेच जाऊ नयेत म्हणून आपल्या देशात ठोस असा ‘अन्नसुरक्षा व मानके अधिनियम’ २०११पासून लागू आहे. या कायद्याचा मूळ उद्देश हा आहे की शेतीपासून ते ताटापर्यंतच्या सर्व अन्नपदार्थांवर काटेकोरपणे लक्ष ठेवणे. ही वैधानिक रचना इतकी भक्कम आहे की यंत्रणेने जर ठरविले तर निकृष्ट किंवा भेसळयुक्त अन्नपदार्थ विकलेच जाणार नाहीत. पण तसे आहे का? अजिबात नाही! आपण जे अन्न खातो त्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो, हे विचारणारा कोणीच नाही.  

मानवी जीवनात अन्न हे जगण्यासाठी पाण्याइतकेच महत्त्वाचे आहे, पण आता अन्न हे केवळ शेतीउत्पादन न राहता ते एक प्रचंड मोठ्या कारखानदारीचा आणि मार्केट इकॉनॉमीचा अविभाज्य भाग झाले आहे... आणि त्याची किंमत शेतमालापेक्षा कैक पटीने जास्त असते. इकॉनॉमीमध्ये मग चुकीच्या मार्गाने पैसा कमावणारी तत्त्वे निर्माण होतात आणि ती इतकी ताकदवान होतात की त्यांच्या हाती कायदे आणि प्रशासकीय यंत्रणा निष्प्रभ करण्याची आर्थिक शक्ती येते.

अन्न भेसळीने होणारी दुर्दशा थांबवण्यासाठी देशपातळीवर अन्न सुरक्षा प्राधिकरण, राज्यस्तरावर अन्न सुरक्षा आयुक्त, प्रयोगशाळा, अधिकारी, निधी सर्व काही आहे. पण भेसळ थांबली का? नाही. कायदे आहेत, पण नीती नाही. यंत्रणा आहे, पण जबाबदारी नाही आणि त्यांना जाब विचारणारे मंत्री नाहीत! भेसळ रोखण्यासाठी बनवलेले कायदेच भेसळखोरांना संरक्षण देणारी शस्त्रे बनली आहेत. मुंबई, ठाणे, पुणे या शहरांत अन्न व्यावसायिकांची संख्या प्रचंड आहे. त्यांचा व्यवसायदेखील प्रचंड आहे. तेथे पोस्टिंग मिळविण्यासाठी अन्न निरीक्षकांमध्ये स्पर्धा असते. लोकांना चांगले अन्न मिळावे यासाठी ही धडपड असते की अन्य कारणासाठी?  

२०१८मध्ये एका निरीक्षकाने सहा महिन्यांसाठी नऊ लाख रुपयांचा हप्ता मागितला. साडेसात लाखांवर ‘तडजोड’ झाली असे वृत्त आले होते. पुढे चौकशी झाली किंवा नाही, ते खरे होते की खोटे हे अद्याप गुलदस्त्यात आहे.    

अन्नभेसळ ही फक्त कायद्याची समस्या नाही, तर ती मानवी अध:पतनाची खूण आहे. कायदे, अधिकारी, निधी, प्रयोगशाळा सर्व काही आहे, पण जोपर्यंत प्रशासन निष्क्रिय आणि जनता उदासीन आहे, तोपर्यंत प्रत्येक दिवाळी गोड नव्हे, घातकच ठरेल. कारण “जोपर्यंत अन्नात भेसळ आहे, तोपर्यंत आरोग्यात दिवाळखोरी आहे.”    

English
हिंदी सारांश
Web Title : Adulterated food equals health bankruptcy: A deep dive into food adulteration.

Web Summary : Food adulteration thrives during festivals, enabled by corruption and weak enforcement. Despite laws, adulteration persists due to systemic issues and lack of accountability, jeopardizing public health. Active administration and public awareness are crucial for change.
टॅग्स :FDAएफडीए