शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

न्यायालयाच्या निकालापर्यंत सरपंचांची संपते मुदत; तुलनेत ग्रामसेवकावर होते वेगाने कारवाई

By समीर देशपांडे | Updated: February 5, 2025 12:07 IST

सर्व पातळ्यांवर आर्थिक देवाणघेवाण

समीर देशपांडेकोल्हापूर : गटविकास अधिकाऱ्यांच्या अहवालाने सुरू झालेला सरपंच अपात्रतेचा प्रवास हा अनेकदा उच्च न्यायालयापर्यंत जातो. दरम्यानच्या काळात निकाल लागेपर्यंत सरपंच किंवा सदस्य पदावर राहतोच आणि त्याचा कारभाही ही सुरू असतो. जरी आर्थिक अपहार झाला म्हणून पद गेल्यानंतर कारवाई करणे शक्य असले, तरी तितकी इच्छाशक्ती अनेकदा तक्रारदार, अधिकारी दाखवत नाहीत असे दिसून येते. सरपंच, सदस्यांच्या तुलनेत ग्रामसेवकावर मात्र तातडीने कारवाई होते.

ग्रामसेवकाशिवाय ग्रामपंचायतींचा कारभार होत नाही. अनेक ग्रामसेवक दबावाखाली, सरपंच धुवायला लागलेत तर आपण का मागे राहायचे म्हणून सहभागी होतात. सहभागी न झाल्यास, तडजोडी न केल्यास अनेकदा आमदारांना सांगून बदली करण्याची धमकीही दिली जाते. प्रत्येक गावात तेच. त्यामुळे ग्रामसेवकही मग तडजोडीची भूमिका घेतात आणि सांगतील तशी बिले काढण्यापासून सांगतील तसे प्रोसिडिंग लिहिण्यापर्यंत काम करतात.ग्रामसेवकांविरोधात तक्रार असेल तर स्वरूपानुसार पहिल्यांदा सक्त ताकीद देणे, ठपका ठेवणे, तात्पुरतीनंतर कायमची वेतनवाढ रोखणे अशी कारवाई केली जाते. विभागीय चौकशीसाठी १ ते ४ आरोपपत्र दाखल करण्यात येते. ६/२ ची नोटीस देऊन आरोपपत्राच्या आधारे त्याच्याकडून खुलासा मागवला जातो. त्यामध्ये आरोप मान्य केले असतील तर त्यानुसार विभागीय चौकशी लावून निलंबनापर्यंतची कारवाई केली जाते; परंतु या सर्व प्रक्रियेलाही खूप विलंब लागतो. दरम्यान, तक्रार आहे म्हणून बदली केली तर मनाविरुद्ध बदली केल्याने अनेकदा ग्रामसेवक दुसऱ्या गावात मनापासून प्रभावी करत नाहीत.

आर्थिक अपहारानंतर थेट गुन्ह्याचे परिपत्रक मागेसरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्याने, ग्रामसेवकाने अपहार केला तर त्याच्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्याचे ग्रामविकास विभागाने वर्ष २०१७ मध्ये परिपत्रक काढले होते; परंतु त्याचा राजकीय कारणातून फारच वापर वाढल्याने वर्ष २०१९ मध्ये हे परिपत्रक रद्द करून विभागीय आयुक्तांच्या अहवालानंतर गुन्हा दाखल करावा, अशी सुधारणा त्यात करण्यात आली.

मुदत संपल्यानंतर कशी करणार कारवाई?सरपंच, सदस्य अपात्र होण्यासाठीच्या प्रक्रियेतच दीड, दोन वर्षे जातात. अनेकदा या कालावधीत सरंपच, सदस्याची मुदतच संपते. अपहार सिद्ध झाला तर पदावरून गेल्यानंतरसुद्धा त्यांच्या मालमत्तेतून वसुली करता येते; परंतु तोपर्यंत अधिकारीही बदलेले असतात. काही वेळा तक्रारदारही शांत झालेले असतात. मंत्री, खासदार, आमदारांनी अधिकाऱ्यांना निरोप दिलेले असतात. त्यामुळे इतक्या टोकाला अधिकारी फार कमी वेळा जातात असे दिसून येते आणि अखेर शासनाचे नुकसान होते.

सर्व पातळ्यांवर आर्थिक देवाणघेवाणतक्रारदार, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विभागीय आयुक्त कार्यालय ते थेट मंत्रालय अशा सर्व पातळ्यांवर प्रकरण किती गंभीर आणि कोणत्या नेत्याचा कोणता बडा कार्यकर्ता त्यात गुंतला आहे, यावर आर्थिक देवाणघेवाणीचे दर ठरवले जातात. मोघमात अहवाल देण्यासाठी, स्वयंस्पष्ट अहवाल देण्यासाठी, न देण्यासाठी, निकाल लांबवण्यासाठी, सुनावणी न घेण्यासाठी सगळ्यासाठी बहुतांशी वेळा पैसे मागितले जात आणि दिलेही जातात, अशा राज्यभर तक्रारी आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरgram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंचCourtन्यायालय