शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

Oxygen Express: महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन आणायला गेलेल्या एक्स्प्रेसचा मुद्दामहून खोळंबा; शिवसेनेची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 16:48 IST

Oxygen Express: केंद्राकडून क्रूर आणि कपटनीतीचे राजकारण सुरू असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे.

ठळक मुद्देकेंद्राकडून क्रूर आणि कपटनीतीचे राजकारणमहाराष्ट्रात ऑक्सिजन येण्यास अजून तीन दिवस लागतीलपीयूष गोयल यांनी राजीनामा द्यावा - सावंत

मुंबई: देशभरात कोरोनाचा कहर कायम असताना दुसरीकडे रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा मोठी चणचण जाणवत आहे. ऑक्सिजनसाठी रुग्णांचे नातेवाइक वणवण करताना दिसत आहेत. अशातच भारतीय रेल्वेने पुढाकार घेत महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन एक्स्प्रेस चालवण्याचा निर्णय घेतला. मात्र, यावरून आता शिवसेनेने रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यावर टीका करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. (arvind sawant alleged that oxygen express of maharashtra purposely delay due to indian railway)

शिवसेना नेते आणि खासदार अरविंद सावंत रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यावर टीका करत ऑक्सिजन एक्स्प्रेसला होत असलेल्या विलंबाबात नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणी पीयूष गोयल यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. अरविंद सावंत पत्रकारांशी बोलत होते. ऑक्सिजन एक्स्प्रेस रेल्वे खाते फिरवत बसले आहे, असा आरोपही सावंत यांनी यावेळी केला.

भारतीयांना प्राधान्य का दिले नाही? रेमडेसिवीर, कोरोना लस निर्यातीवरून प्रियंका गांधी कडाडल्या

या गतीने कधी मिळणार ऑक्सिजन

केंद्र सरकारमुळेच महाराष्ट्रात ऑक्सिजन एक्स्प्रेस येण्यासाठी विलंब होत असल्याची टीका केली. कळंबोलीहून निघालेली ऑक्सिजन एक्सप्रेस १९ तारखेला निघाली तरी अजून मंगळवारी रात्री २४ तासानंतर अकोला स्टेशनवर होती. आता बुधवारी एक्स्प्रेस ट्रेन रायपूरजवळ आहे. ऑक्सिजन एक्स्प्रेस विशाखापट्टणमला जाणार आहे आणि ती फिरतेय कुठे माहिती नाही. त्यामुळे महाराष्ट्रात ऑक्सिजन येण्यास अजून तीन दिवस लागतील, असा दावा सावंत यांनी केला. 

केंद्राकडून क्रूर आणि कुटनीतीचे राजकारण

देशात कोरोनाचे संकट असताना केंद्र सरकार क्रूर आणि कपटनीतीचे राजकारण करत आहे. या ऑक्सिजन एक्स्प्रेसला ग्रीन कॉरिडोअर उपलब्ध करून दिला जाईल, असे रेल्वे खात्याने सांगितले होते. पण, तसे होताना दिसत नाही, अशी टीका सावंत यांनी केली आहे. 

“देशातील कोरोनाची परिस्थिती गंभीर, पंतप्रधान मोदींनी राजीनामा द्यावा”

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. ऑक्सिजनची समस्या असेल, तेथे ती दूर केली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असल्याचे सांगत असले, तरी बंगालच्या निवडणुका संपायच्या आहेत. या निवडणुका झाल्या की, पंतप्रधान मोदी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा करतील, असा दावा सावंत यांनी केला. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याArvind Sawantअरविंद सावंतShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारणBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकारIndian Railwayभारतीय रेल्वेpiyush goyalपीयुष गोयल