शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

Oxygen Express: महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन आणायला गेलेल्या एक्स्प्रेसचा मुद्दामहून खोळंबा; शिवसेनेची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 16:48 IST

Oxygen Express: केंद्राकडून क्रूर आणि कपटनीतीचे राजकारण सुरू असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे.

ठळक मुद्देकेंद्राकडून क्रूर आणि कपटनीतीचे राजकारणमहाराष्ट्रात ऑक्सिजन येण्यास अजून तीन दिवस लागतीलपीयूष गोयल यांनी राजीनामा द्यावा - सावंत

मुंबई: देशभरात कोरोनाचा कहर कायम असताना दुसरीकडे रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा मोठी चणचण जाणवत आहे. ऑक्सिजनसाठी रुग्णांचे नातेवाइक वणवण करताना दिसत आहेत. अशातच भारतीय रेल्वेने पुढाकार घेत महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन एक्स्प्रेस चालवण्याचा निर्णय घेतला. मात्र, यावरून आता शिवसेनेने रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यावर टीका करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. (arvind sawant alleged that oxygen express of maharashtra purposely delay due to indian railway)

शिवसेना नेते आणि खासदार अरविंद सावंत रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यावर टीका करत ऑक्सिजन एक्स्प्रेसला होत असलेल्या विलंबाबात नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणी पीयूष गोयल यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. अरविंद सावंत पत्रकारांशी बोलत होते. ऑक्सिजन एक्स्प्रेस रेल्वे खाते फिरवत बसले आहे, असा आरोपही सावंत यांनी यावेळी केला.

भारतीयांना प्राधान्य का दिले नाही? रेमडेसिवीर, कोरोना लस निर्यातीवरून प्रियंका गांधी कडाडल्या

या गतीने कधी मिळणार ऑक्सिजन

केंद्र सरकारमुळेच महाराष्ट्रात ऑक्सिजन एक्स्प्रेस येण्यासाठी विलंब होत असल्याची टीका केली. कळंबोलीहून निघालेली ऑक्सिजन एक्सप्रेस १९ तारखेला निघाली तरी अजून मंगळवारी रात्री २४ तासानंतर अकोला स्टेशनवर होती. आता बुधवारी एक्स्प्रेस ट्रेन रायपूरजवळ आहे. ऑक्सिजन एक्स्प्रेस विशाखापट्टणमला जाणार आहे आणि ती फिरतेय कुठे माहिती नाही. त्यामुळे महाराष्ट्रात ऑक्सिजन येण्यास अजून तीन दिवस लागतील, असा दावा सावंत यांनी केला. 

केंद्राकडून क्रूर आणि कुटनीतीचे राजकारण

देशात कोरोनाचे संकट असताना केंद्र सरकार क्रूर आणि कपटनीतीचे राजकारण करत आहे. या ऑक्सिजन एक्स्प्रेसला ग्रीन कॉरिडोअर उपलब्ध करून दिला जाईल, असे रेल्वे खात्याने सांगितले होते. पण, तसे होताना दिसत नाही, अशी टीका सावंत यांनी केली आहे. 

“देशातील कोरोनाची परिस्थिती गंभीर, पंतप्रधान मोदींनी राजीनामा द्यावा”

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. ऑक्सिजनची समस्या असेल, तेथे ती दूर केली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असल्याचे सांगत असले, तरी बंगालच्या निवडणुका संपायच्या आहेत. या निवडणुका झाल्या की, पंतप्रधान मोदी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा करतील, असा दावा सावंत यांनी केला. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याArvind Sawantअरविंद सावंतShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारणBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकारIndian Railwayभारतीय रेल्वेpiyush goyalपीयुष गोयल