शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

Oxygen Express: महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन आणायला गेलेल्या एक्स्प्रेसचा मुद्दामहून खोळंबा; शिवसेनेची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 16:48 IST

Oxygen Express: केंद्राकडून क्रूर आणि कपटनीतीचे राजकारण सुरू असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे.

ठळक मुद्देकेंद्राकडून क्रूर आणि कपटनीतीचे राजकारणमहाराष्ट्रात ऑक्सिजन येण्यास अजून तीन दिवस लागतीलपीयूष गोयल यांनी राजीनामा द्यावा - सावंत

मुंबई: देशभरात कोरोनाचा कहर कायम असताना दुसरीकडे रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा मोठी चणचण जाणवत आहे. ऑक्सिजनसाठी रुग्णांचे नातेवाइक वणवण करताना दिसत आहेत. अशातच भारतीय रेल्वेने पुढाकार घेत महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन एक्स्प्रेस चालवण्याचा निर्णय घेतला. मात्र, यावरून आता शिवसेनेने रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यावर टीका करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. (arvind sawant alleged that oxygen express of maharashtra purposely delay due to indian railway)

शिवसेना नेते आणि खासदार अरविंद सावंत रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यावर टीका करत ऑक्सिजन एक्स्प्रेसला होत असलेल्या विलंबाबात नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणी पीयूष गोयल यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. अरविंद सावंत पत्रकारांशी बोलत होते. ऑक्सिजन एक्स्प्रेस रेल्वे खाते फिरवत बसले आहे, असा आरोपही सावंत यांनी यावेळी केला.

भारतीयांना प्राधान्य का दिले नाही? रेमडेसिवीर, कोरोना लस निर्यातीवरून प्रियंका गांधी कडाडल्या

या गतीने कधी मिळणार ऑक्सिजन

केंद्र सरकारमुळेच महाराष्ट्रात ऑक्सिजन एक्स्प्रेस येण्यासाठी विलंब होत असल्याची टीका केली. कळंबोलीहून निघालेली ऑक्सिजन एक्सप्रेस १९ तारखेला निघाली तरी अजून मंगळवारी रात्री २४ तासानंतर अकोला स्टेशनवर होती. आता बुधवारी एक्स्प्रेस ट्रेन रायपूरजवळ आहे. ऑक्सिजन एक्स्प्रेस विशाखापट्टणमला जाणार आहे आणि ती फिरतेय कुठे माहिती नाही. त्यामुळे महाराष्ट्रात ऑक्सिजन येण्यास अजून तीन दिवस लागतील, असा दावा सावंत यांनी केला. 

केंद्राकडून क्रूर आणि कुटनीतीचे राजकारण

देशात कोरोनाचे संकट असताना केंद्र सरकार क्रूर आणि कपटनीतीचे राजकारण करत आहे. या ऑक्सिजन एक्स्प्रेसला ग्रीन कॉरिडोअर उपलब्ध करून दिला जाईल, असे रेल्वे खात्याने सांगितले होते. पण, तसे होताना दिसत नाही, अशी टीका सावंत यांनी केली आहे. 

“देशातील कोरोनाची परिस्थिती गंभीर, पंतप्रधान मोदींनी राजीनामा द्यावा”

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. ऑक्सिजनची समस्या असेल, तेथे ती दूर केली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असल्याचे सांगत असले, तरी बंगालच्या निवडणुका संपायच्या आहेत. या निवडणुका झाल्या की, पंतप्रधान मोदी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा करतील, असा दावा सावंत यांनी केला. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याArvind Sawantअरविंद सावंतShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारणBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकारIndian Railwayभारतीय रेल्वेpiyush goyalपीयुष गोयल